शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

आरक्षणाचा फटका, इच्छूक हिरमुसले, पर्यायी गटांची चाचपणी

By admin | Updated: October 6, 2016 00:28 IST

राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचे असलेल्या जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्र्श्वभूमीवर बुधवारी काढण्यात आलेल्या आरक्षणाचा फटका अनेक प्रस्थापितांना बसला आहे.

हादरा : काहींना नव्या घरोब्याचा शोध तर काहींना मिळणार राजकीय विश्रांतीअमरावती : राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचे असलेल्या जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्र्श्वभूमीवर बुधवारी काढण्यात आलेल्या आरक्षणाचा फटका अनेक प्रस्थापितांना बसला आहे. निवडणूक लढविण्यासाठी काहींना गट (सर्कल) नसल्यामुळे त्यांना राजकीय दृष्ट्या विश्रांती घेण्याचा प्रसंग ओढावला आहे. तर काहींना नव्या घरोब्यासाठी चाचपणी करावी लागणार आहे.जिल्हा परिषद सर्वसाधारण निवडणूक होणार असल्याच्या धर्तीवर आरक्षण काढल्या जाणार असल्या बाबतची चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. नेमके आरक्षणात काय होणार, याकडे वेध लागले असताना बुधवारी गटाच्या आरक्षणानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. बुधवारच्या आरक्षण सोडतीनंतर सोडतीनंतर ईच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या गटाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर विद्यमान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर या पदाधिकांऱ्यासह कॉग्रेसचे गटनेता तथा माजी अध्यक्ष बबलू देशमुख, सुरेखा ठाकरे, सुधीर सुर्यवंशी, प्रताप अभ्यंकर, मोहन सिंगवी, मोहन पाटील, उमेश केने, ज्योती आरेकर, प्रवीण घुईखेडकर, ममता भांबुरकर, महेंद्रसिंग गैलवार, सदाशिव खडके, श्रीपाल पाल, विक्रम ठाकरे, मंदा गवई, विनोद डांगे आदींना आरक्षणाचा फटका बसला आहे. नव्या आरक्षणामुळे जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये ‘कहीं खुशी कहीं गम’ हे चित्र अनुभवता आले. विशेष म्हणजे आगामी जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गटाची फेररचना करण्यात आली आहे. सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्या प्राधान्य क्रमानुसार अनेक गटांमध्ये काहे गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये अंजनगाव सुर्जी व भातकुली या दोन तालुक्यातील प्रत्येकी एक या प्रमाणे दोन गट कमी झाले आहेत. तर अमरावती आणि धारणी या दोन तालुक्यात दोन गट नव्याने वाढले आहेत. या बदल्याचा फटका पदाधिकाऱ्यांना बसला आहे. तर अनेक ईच्छुकांना या आरक्षण बदल्याने संधी चालून आली आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. (प्रतिनिधी)विद्यमान सदस्य घेणार नव्या घराचा शोधआरक्षण सोडतीमध्ये बबलू देशमुख यांचा कुऱ्हा मतदार संघ राखीव झाल्याने ते चांदुरबाजार मधील घाटलाडकी सर्कल मधून लढण्याची शक्यता आहे. रवींद्र मुंदे याचा वाढोणा रामनाथ गट राखीव झाल्याने त्यांनी नांदगाव मधील लोणी टाकळी गटातून निवडणूक लढण्याची तयारी केल्याची माहिती आहे. सुरेखा ठाकरे यांचा आसेगाव मतदार संघ राखीव असल्यामुळे त्या कांडली गटातून निवडणूृक लढण्याची शक्यता आहे. प्रताप अभ्यकंर हे धामणगाव गढी येथून नशीब अजमावण्याची शक्यता आहे. तसेच सुधीर सुर्यवंशी, महेंद्रसिंग गैलवार, गिरीश कराळे, सतीश हाडोळे, मंदा गवई, सदाशिव खडके आदी काही विद्यमान पदाधिकारी व सदस्य नव्या घरोब्याच्या शोधात आहेत. तर काहीनी कुटूंबातील महिलांना रिंगणात लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे खरे चित्र हे निवडणूक कार्यक्रमानंतरच स्पष्ट होणार आहे.