शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
5
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
6
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
7
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
8
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
9
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
10
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
11
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."
12
Operation Sindoor: मोठी बातमी! कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
13
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट
15
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
16
तुम्हीही वारंवार पर्सनल लोन घेता? मग 'हे' ५ मोठे तोटे समजून घ्या; अनेकजण करतात दुर्लक्ष
17
Mumbai: पत्नीची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवला, मुंबईतील गोरेगाव येथील धक्कादायक प्रकार
18
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
19
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
20
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!

आरक्षणाचा फटका, इच्छूक हिरमुसले, पर्यायी गटांची चाचपणी

By admin | Updated: October 6, 2016 00:28 IST

राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचे असलेल्या जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्र्श्वभूमीवर बुधवारी काढण्यात आलेल्या आरक्षणाचा फटका अनेक प्रस्थापितांना बसला आहे.

हादरा : काहींना नव्या घरोब्याचा शोध तर काहींना मिळणार राजकीय विश्रांतीअमरावती : राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचे असलेल्या जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्र्श्वभूमीवर बुधवारी काढण्यात आलेल्या आरक्षणाचा फटका अनेक प्रस्थापितांना बसला आहे. निवडणूक लढविण्यासाठी काहींना गट (सर्कल) नसल्यामुळे त्यांना राजकीय दृष्ट्या विश्रांती घेण्याचा प्रसंग ओढावला आहे. तर काहींना नव्या घरोब्यासाठी चाचपणी करावी लागणार आहे.जिल्हा परिषद सर्वसाधारण निवडणूक होणार असल्याच्या धर्तीवर आरक्षण काढल्या जाणार असल्या बाबतची चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. नेमके आरक्षणात काय होणार, याकडे वेध लागले असताना बुधवारी गटाच्या आरक्षणानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. बुधवारच्या आरक्षण सोडतीनंतर सोडतीनंतर ईच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या गटाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर विद्यमान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर या पदाधिकांऱ्यासह कॉग्रेसचे गटनेता तथा माजी अध्यक्ष बबलू देशमुख, सुरेखा ठाकरे, सुधीर सुर्यवंशी, प्रताप अभ्यंकर, मोहन सिंगवी, मोहन पाटील, उमेश केने, ज्योती आरेकर, प्रवीण घुईखेडकर, ममता भांबुरकर, महेंद्रसिंग गैलवार, सदाशिव खडके, श्रीपाल पाल, विक्रम ठाकरे, मंदा गवई, विनोद डांगे आदींना आरक्षणाचा फटका बसला आहे. नव्या आरक्षणामुळे जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये ‘कहीं खुशी कहीं गम’ हे चित्र अनुभवता आले. विशेष म्हणजे आगामी जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गटाची फेररचना करण्यात आली आहे. सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्या प्राधान्य क्रमानुसार अनेक गटांमध्ये काहे गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये अंजनगाव सुर्जी व भातकुली या दोन तालुक्यातील प्रत्येकी एक या प्रमाणे दोन गट कमी झाले आहेत. तर अमरावती आणि धारणी या दोन तालुक्यात दोन गट नव्याने वाढले आहेत. या बदल्याचा फटका पदाधिकाऱ्यांना बसला आहे. तर अनेक ईच्छुकांना या आरक्षण बदल्याने संधी चालून आली आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. (प्रतिनिधी)विद्यमान सदस्य घेणार नव्या घराचा शोधआरक्षण सोडतीमध्ये बबलू देशमुख यांचा कुऱ्हा मतदार संघ राखीव झाल्याने ते चांदुरबाजार मधील घाटलाडकी सर्कल मधून लढण्याची शक्यता आहे. रवींद्र मुंदे याचा वाढोणा रामनाथ गट राखीव झाल्याने त्यांनी नांदगाव मधील लोणी टाकळी गटातून निवडणूक लढण्याची तयारी केल्याची माहिती आहे. सुरेखा ठाकरे यांचा आसेगाव मतदार संघ राखीव असल्यामुळे त्या कांडली गटातून निवडणूृक लढण्याची शक्यता आहे. प्रताप अभ्यकंर हे धामणगाव गढी येथून नशीब अजमावण्याची शक्यता आहे. तसेच सुधीर सुर्यवंशी, महेंद्रसिंग गैलवार, गिरीश कराळे, सतीश हाडोळे, मंदा गवई, सदाशिव खडके आदी काही विद्यमान पदाधिकारी व सदस्य नव्या घरोब्याच्या शोधात आहेत. तर काहीनी कुटूंबातील महिलांना रिंगणात लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे खरे चित्र हे निवडणूक कार्यक्रमानंतरच स्पष्ट होणार आहे.