शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

बालरोग विभागप्रमुख राजेंद्र निस्तानेंचे बयाण नोंदविले

By admin | Updated: June 10, 2017 00:06 IST

पीडीएमसीत झालेल्या तीन नवजात शिशुंच्या मृत्यू प्रकरणात गुरूवारी बालरोग विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र निस्ताने यांचे बयाण गाडगेनगर पोलिसांनी नोंदविले.

अमरावती : पीडीएमसीत झालेल्या तीन नवजात शिशुंच्या मृत्यू प्रकरणात गुरूवारी बालरोग विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र निस्ताने यांचे बयाण गाडगेनगर पोलिसांनी नोंदविले. घटनेच्या दिवशी आपण बाहेरगावी असल्याचे त्यांनी बयाणात म्हटले आहे. मात्र, एनआयसीयूची सर्वस्वी जबाबदारी सांभाळणारे निस्ताने यांच्या अधिनस्थ यंत्रणेच्या चुकीमुळे शिशुंचे मृत्यू झाले असून त्यांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थितपणे सांभाळली नाही. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हे का दाखल होऊ नयेत, असा सवाल मृत शिशुंचे नातेवाईक उपस्थित करीत आहेत. पीडीएमसीतील एनआयसीयूच्या बालरोग विभागाची जबाबदारी सांभाळणारे डॉ. राजेंद्र निस्ताने घटनेच्या वेळी अनधिकृतपणे रजेवर गेले होते. या कारणास्तव पीडीएमसीचे अधिष्ठाता राजेंद्र जाणे यांनी निस्ताने यांच्या निलंबनाचे आदेश काढले. मृत शिशुंच्या नातलंगानी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करीत डीन राजेंद्र जाणे, डॉ.राजेंद्र निस्ताने, डॉ. पंकज बारब्दे व डॉ. प्रतिभा काळे यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी रेटून धरली. मात्र, अद्याप त्यांच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पोलीस चौकशीचा भाग म्हणून पोलिसांनी राजेंद्र निस्तानेंना ठाण्यात बोलविले होते. मात्र, ते बाहेरगावी असल्यामुळे पोलिसांसमक्ष उपस्थित राहू शकले नाही. गुरूवारी निस्ताने यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात येऊन बयाण दिले. २८ मे रोजीच ते जम्मू-काश्मिरकरीता रवाना झाल्याचे त्यांनी बयाणात म्हटल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. निस्तानेंचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष याप्रकरणात सहभाग आहे किंवा नाही, ही बाब पोलीस तपासून पाहात असून चौकशीअंती पुढील कारवाईचे संकेत आहे.