शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
5
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
6
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
7
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
8
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
9
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
10
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
11
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
12
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
13
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
14
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
15
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
16
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
17
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
18
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
19
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

१९८१ टंचाईग्रस्त गावातील कृषी कर्जाचे होणार पुनर्गठन

By admin | Updated: January 25, 2015 23:07 IST

अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी असल्याचे आढळून आलेल्या १९८१ टंचाईसदृश गावांमधील पीक कर्जाचे दीर्घ मुदतीत रुपांतर करण्याचे

अमरावती : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी असल्याचे आढळून आलेल्या १९८१ टंचाईसदृश गावांमधील पीक कर्जाचे दीर्घ मुदतीत रुपांतर करण्याचे आदेश राज्याच्या सहकार विभागाने जारी केले आहे. थकीत पीक कर्जाच्या वसुलीला या आदेशामुळे स्थगिती देण्यात आली आहे.जिल्ह्यात दुष्काळाच्या छायेमुळे खरीप व रबी हंगाम अपुऱ्या पर्जन्यमानामुळे पूर्ण बाधित झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकत्याच जाहीर झालेल्या खरीप हंगामात जिल्ह्यात १९८१ गावांमधील पिकांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांनी लागवडीसाठी केलेला खर्चही वसूल होणार नाही, अशी परिस्थिती आहे. यामुळे हंगामासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने आठ प्रकारच्या उपाययोजनांमध्ये सूट दिली आहे. यात सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्ज वसुली स्थगिती आदींचा समावेश आहे. यासंदर्भात आदेश जारी झाला असून भीषण संकटातही शेतकऱ्यांना बँकांचा कर्जपुरवठा होत नाही. त्यामुळे कर्जवसुलीच्या तगाद्याला सामोरे जावे लागते. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थोडा का होईना मात्र दिलासा मिळणार आहे, हे निश्चित. याचा लाभ जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमधील बहुतांश शेतकऱ्यांना होणार आहे. (प्रतिनिधी)