शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
7
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
8
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
9
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
10
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
11
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
12
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
13
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
14
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
15
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
16
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
17
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
18
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
19
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
20
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली

१९८१ टंचाईग्रस्त गावातील कृषी कर्जाचे होणार पुनर्गठन

By admin | Updated: January 25, 2015 23:07 IST

अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी असल्याचे आढळून आलेल्या १९८१ टंचाईसदृश गावांमधील पीक कर्जाचे दीर्घ मुदतीत रुपांतर करण्याचे

अमरावती : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी असल्याचे आढळून आलेल्या १९८१ टंचाईसदृश गावांमधील पीक कर्जाचे दीर्घ मुदतीत रुपांतर करण्याचे आदेश राज्याच्या सहकार विभागाने जारी केले आहे. थकीत पीक कर्जाच्या वसुलीला या आदेशामुळे स्थगिती देण्यात आली आहे.जिल्ह्यात दुष्काळाच्या छायेमुळे खरीप व रबी हंगाम अपुऱ्या पर्जन्यमानामुळे पूर्ण बाधित झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकत्याच जाहीर झालेल्या खरीप हंगामात जिल्ह्यात १९८१ गावांमधील पिकांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांनी लागवडीसाठी केलेला खर्चही वसूल होणार नाही, अशी परिस्थिती आहे. यामुळे हंगामासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने आठ प्रकारच्या उपाययोजनांमध्ये सूट दिली आहे. यात सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्ज वसुली स्थगिती आदींचा समावेश आहे. यासंदर्भात आदेश जारी झाला असून भीषण संकटातही शेतकऱ्यांना बँकांचा कर्जपुरवठा होत नाही. त्यामुळे कर्जवसुलीच्या तगाद्याला सामोरे जावे लागते. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थोडा का होईना मात्र दिलासा मिळणार आहे, हे निश्चित. याचा लाभ जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमधील बहुतांश शेतकऱ्यांना होणार आहे. (प्रतिनिधी)