शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

१९८१ टंचाईग्रस्त गावातील कृषी कर्जाचे होणार पुनर्गठन

By admin | Updated: January 25, 2015 23:07 IST

अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी असल्याचे आढळून आलेल्या १९८१ टंचाईसदृश गावांमधील पीक कर्जाचे दीर्घ मुदतीत रुपांतर करण्याचे

अमरावती : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी असल्याचे आढळून आलेल्या १९८१ टंचाईसदृश गावांमधील पीक कर्जाचे दीर्घ मुदतीत रुपांतर करण्याचे आदेश राज्याच्या सहकार विभागाने जारी केले आहे. थकीत पीक कर्जाच्या वसुलीला या आदेशामुळे स्थगिती देण्यात आली आहे.जिल्ह्यात दुष्काळाच्या छायेमुळे खरीप व रबी हंगाम अपुऱ्या पर्जन्यमानामुळे पूर्ण बाधित झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकत्याच जाहीर झालेल्या खरीप हंगामात जिल्ह्यात १९८१ गावांमधील पिकांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांनी लागवडीसाठी केलेला खर्चही वसूल होणार नाही, अशी परिस्थिती आहे. यामुळे हंगामासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने आठ प्रकारच्या उपाययोजनांमध्ये सूट दिली आहे. यात सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्ज वसुली स्थगिती आदींचा समावेश आहे. यासंदर्भात आदेश जारी झाला असून भीषण संकटातही शेतकऱ्यांना बँकांचा कर्जपुरवठा होत नाही. त्यामुळे कर्जवसुलीच्या तगाद्याला सामोरे जावे लागते. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थोडा का होईना मात्र दिलासा मिळणार आहे, हे निश्चित. याचा लाभ जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमधील बहुतांश शेतकऱ्यांना होणार आहे. (प्रतिनिधी)