शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

मुख्याधिकाऱ्यांविना नगरपंचायतींचा कारभार

By admin | Updated: December 2, 2015 00:07 IST

जिल्ह्यात नवनिर्मित चार नगरपंचायतींची प्रशासकीय राजवट सोमवारी ३० नोव्हेंबरला संपुष्टात आली.

जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष : सोमवारी संपली, प्रशासकीय राजवटअमरावती : जिल्ह्यात नवनिर्मित चार नगरपंचायतींची प्रशासकीय राजवट सोमवारी ३० नोव्हेंबरला संपुष्टात आली. मात्र, जिल्हा प्रशासनाने या नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती केली नाही किंवा अन्य अधिकाऱ्यांना प्रभारही दिलेला नसल्याने नगरपंचायतींचा पहिला दिवस मुख्याधिकाऱ्यांना विनाच पार पडला. जिल्ह्यात तिवसा, भातकुली, धारणी व नांदगाव खंडेश्वर या चार तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायती स्थापन करण्यात आल्यात. एप्रिल महिन्यात या ग्रामपंचायती बरखास्त करून शासनाने संबंधित तहसीलदारांची नगरपंचायतींचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली व प्रशासकीय राजवटीच्या सहा महिन्यांच्या आत सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहे.त्याअनुषंगाने १ नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. तसेच ३० नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूकदेखील पार पडली. या निवडणुकीनंतर प्रशासकीय राजवट संपली. तहसीलदार प्रशासकाच्या जबाबदारीतून मुक्त झाले. वास्तविक नगरपंचायतींवर तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे नगरपंचायतींना मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे होते. मात्र, सहा महिने उलटूनही मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. आता तर प्रशासकांचा कार्यकाळ देखील संपुष्टात आला आहे. मात्र, मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती अथवा अन्य अधिकाऱ्यांकडे प्रभार न दिल्यामुळे नगरपंचायतींचा प्रशासकीय कारभार ठप्प पडला आहे. यासंदर्भात नगर प्रशासन विभागाच्या जिल्हा प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते नागपूरला गेल्याचे सांगण्यात आले.