शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

पीक कर्जातून साडेतीन टक्के कपात

By admin | Updated: June 14, 2015 00:15 IST

मागील ३ वर्षांपासून राज्यात दुष्काळी वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत.

शेतकऱ्यांची लूट : शासनाच्या आदेशाला तिलांजलीप्रभाकर भगोले चांदूररेल्वेमागील ३ वर्षांपासून राज्यात दुष्काळी वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. मात्र, अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही. त्यात भर म्हणून नवीन कर्ज देताना प्रोसेसिंग चार्ज लावून शेतकऱ्यांच्या हातात मिळालेल्या तुटपुंज्या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रकार येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेने सुरू केला आहे. कर्जातून तब्बल साडेतीन टक्के कपात करण्याचा हा प्रकार तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरात सुरू असून यामुळे शेतकरी संतप्त आहेत. चारही बाजूने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीककर्जातूनही साडेतीन टक्क्यांची कपात होत असल्याने त्यांना तोटा सहन करावा लागत आहे. इतर खासगी कंपन्याप्रमाणे महाराष्ट्र बँकेनेही पीक कर्जातून प्रोसेसिंग चार्ज कापण्याचा प्रकार सुरू केला आहे. कर्जासाठी लागणारी सर्व कागदपत्रे शेतकऱ्याने गोळा केलेली असतात. साधी रेव्हेन्यू तिकिटही बँक लावत नाही. मग प्रोसेसिंग चार्ज कशाचा? असे बँक व्यवस्थापक भगत यांना विचारले असता त्यांनी संबंधित प्रतिनिधीला टोलवाटोलवीची उत्तरे दिली. तालुक्यातील इतर बँकांकडून अशी कुठलीही कपात केली जात नसल्याची चर्चा असल्याने बँक आॅफ महाराष्ट्रला ही कपात करण्याचे अधिकार कोणी दिले, असा संतप्त सवाल परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. हा प्रकार शेतकऱ्यांची लूट करणारा असल्याने तालुक्यातील सामाजिक संस्था व संघटनांनी या प्रकाराविरूध्द दंड थोपटले असून बँकेच्या या कारवाईचा जाब विचारण्याचा पवित्रा घेतला आहे. मुख्य अधिकाऱ्यांच्या आदेशावरुन आम्ही तीन टक्के प्रोसेसिंग चार्जची कपात करतो. याबाबत सविस्तर माहितीसाठी अमरावतीच्या क्षेत्रीय शाखेशी संपर्क साधू शकता. - प्रकाश भगत,शाखाप्रबंधक, बँक आॅफ महाराष्ट्र, चांदूररेल्वे