शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

रेड्डींनी राष्ट्रीय बांबू अभियान मिळविले धुळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:13 IST

कॅप्शन - बांबू प्रक्रिया युनिटकरिता खरेदी करण्यात आलेल्या मशीन धूळखात पडल्या आहेत. -------------------------------------------------------------------------------------------- हायटेक नर्सरीला तिलांजली, लाखोंच्या मशीन ...

कॅप्शन - बांबू प्रक्रिया युनिटकरिता खरेदी करण्यात आलेल्या मशीन धूळखात पडल्या आहेत.

--------------------------------------------------------------------------------------------

हायटेक नर्सरीला तिलांजली, लाखोंच्या मशीन धूळखात, ७१ लाख व्याघ्र प्रतिष्ठानांत पडून

अनिल कडू

परतवाडा : महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे सोपविले गेलेल्या राष्ट्रीय बांबू अभियानास तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी यांनी धुळीस मिळविले आहे. त्यांनी तीन वर्षांपासून हे राष्ट्रीय बांबू अभियान गुंडाळून ठेवले. या अभियानांतर्गत उभारावयाच्या हायटेक बांबू नर्सरीला त्यांनी तिलांजली दिली आहे.

बांबू प्रक्रिया युनिट अंतर्गत बांबू प्रशिक्षणाकरिता खरेदी केल्या गेलेल्या लाखो रुपयांच्या मशीन एका गोडाऊनमध्ये कचऱ्यासमान धूळखात पडल्या आहेत. या नव्या मशीनसमवेत ज्या मशीन प्रादेशिक वनविभागाच्या आहेत, त्याही निर्धारित ठिकाणावरून काढून व्याघ्र प्रकल्पाच्या कस्टडीत घेण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर यांचेकडून राष्ट्रीय बांबू अभियान अंतर्गत सन २०१८-१९ मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला ८३ लाखांचा निधी दिला गेला. यात हायटेक बांबू नर्सरीकरिता ५० लाख, प्रक्रिया युनिटकरिता ३० लाख, शेतकऱ्यांना उपयोगी अशा डेमॉन्स्ट्रेशन प्लॉटकरिता ३ लाख दिले गेले. यातील प्रक्रिया युनिट अंतर्गत ११ लाख ९५ हजार २७१ रुपये बांबू प्रशिक्षण यंत्रे खरेदीवर खर्च झालेत. उर्वरित ७१ लाख ४ हजार ७२९ रुपये मेळघाट व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानात वळते केल्या गेले. हा महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून दिला गेलेला ७१ लाखांचा निधी तीन वर्षांपासून या व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानात पडून आहे.

रामदास आंबटकरांकडून लक्षवेध

विधान परिषद सदस्य रामदास आंबटकर यांनी सन २०२१ मध्ये विधान परिषद तारांकित प्रश्न क्रमांक ७,०८० अन्वये यावर लक्ष केंद्रित केले होते. महाराष्ट्र बांबू विकास मंडळातील निधीचा नियमबाह्य वापर झाल्याबाबतचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नांच्या उत्तरादाखल माहितीतून व्याघ्र प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय बांबू अभियान संबंधितांकडून दुर्लक्षित ठेवल्याचे सत्य उघड झाले आहे.