शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांकडून व्याज वसुली

By admin | Updated: January 20, 2017 01:39 IST

कोण कशी शक्कल लढवेल, काही नेम नाही. शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे, यासाठी शासनाने योजना

शासनालाही ठेंगा : मनीष जाधव यांची तक्रार अमरावती : कोण कशी शक्कल लढवेल, काही नेम नाही. शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे, यासाठी शासनाने योजना काढली. निधी दिला; परंतु या कर्जमुक्तीच्या योजनेतूनच कुबडे ज्वेलर्सने व्याज कमविण्याचा नवा फंडा शोधला नि राजरोसपणे शेतकऱ्यांचे शोषण केल्याचा अफलातून मुद्दा नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सातरगाव येथील शेतकरी मनीष जाधव पाटील यांच्या तक्रारीवरून पुढे आला आहे. हा मुद्दा पोलीस तपासाला नवे वळण देऊ शकतो. ३० नोव्हेंबर २०१४ पूर्वीच्या सावकारी कर्जातून शेतकऱ्यांना मुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. युवा शेतकरी मनीष जाधव पाटील यांनी ३ जानेवारी २०१३ रोजी कुबडे ज्वेलर्स यांच्याकडे दहा हजार रूपयांसाठी सोने गहाण ठेवले होते. कर्जमुक्तीच्या योजनेसाठी ते पात्र होते. या गहाण सोन्याचे मुद्दल आणि व्याज शासनाच्यावतीने सावकार विजय कुबडे यांना अदा केले जाणार होते. संपूर्ण रक्कम दिल्यानंतर कुबडे यांच्याकडे गहाण असलेले सोने शेतकरी मनीष जाधव यांना कुठल्याही रकमेविना मिळायला हवे होते. तो त्यांच्या हक्कच होता. परंतु शासनाच्या योजनेनुसार सोने नेण्यासाठीचा निरोप कुबडे यांनी मुद्दामच सहा महिने उशिराने कळविला. आम्ही लागलीच त्यांच्या दुकानात गेला. परंतु विजय कुबडे आणि त्यांच्या चमुने गहाण सोडविण्यासाठी तीन हजार रूपये व्याजाच्या रकमेची मागणी केली. शासनाने पैसे भरले. तीन हजार रुपये कशासाठी, याप्रश्नावर- सहा महिन्यांचे व्याज आकारत असल्याचे त्यांनी सांगितले. सावकारानेच निरोप उशिरा दिला, यात आमची काय चूक, असा सवाल उपस्थित करून जाधव म्हणतात, शासनाच्या योजनेतून पळवाट काढून लाभ करवून घेण्याचा नवाच फंडा कुंबडे यांनी अवलंबिला. जामीन नाकारा, पोलिसांचा न्यायालयात 'से' ४विजय कुबडेला अटक करण्यासाठी शहर कोतवाली पोलिसांनी सापळा रचूनही आरोपी हाती लागला नाही. विजय कुबडे यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. याअर्जाच्या अनुषंगाने पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात 'से' दाखल केला. विजय कुबडे यांना जामीन देण्यात येऊ नये, असे मत पोलिसांनी नोंदविले. याप्रकरणी आवश्यक ती चौकशी करावयाची आहे. प्रकरण निर्णायक वळणावर नेण्यासाठी भक्कम पुराव्यांची गरज आहे. मोजकेच पुरावे आमच्या हाती लागले आहेत. तपासाला बराच वाव आहे. आरोपी पसार आहे. तपास त्यामुळे प्रभावित झाला आहे. जामीन देण्यात येऊ नये, अशा आशयाची विनंती पोलिसांनी न्यायालयाला केली आहे. यासंबंधाने न्यायालय काय निर्णय देते, हे स्पष्ट होईलच.