शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

वाचा गेली, पाय गेले, हात पडले लुळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:28 IST

आले कायमचे दिव्यांगत्व फोटो - राऊत, राऊत १ कायमचे अपंगत्व, दिघी महल्ले येथील तीन मुलांचे आयुष्य अंथरुणावर मोहन ...

आले कायमचे दिव्यांगत्व

फोटो - राऊत, राऊत १

कायमचे अपंगत्व, दिघी महल्ले येथील तीन मुलांचे आयुष्य अंथरुणावर

मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे

जन्म झाल्यानंतर त्यांना रडता आले, कुणी पाहिले तर हसता आले, जन्मदात्यांना ओळखता आले, मात्र जेव्हा चालण्यायोग्य झाले तेव्हा अवघ्या दोन वर्षांच्या वयात वाचा गेली. हात उचलणे बंद झाले. कंबरेपासून पाय लुळे पडले. आता तर कायमचे अपंगत्व आले आहे. अंथरुणापुरतेच त्यांचे आयुष्य सीमित झाले आहे. एकाच कुटुंबातील तिघांना हा विचित्र आजार जडला आहे.

धामणगाव तालुक्यातील वर्धा नदीकाठावरील अडीच हजार लोकवस्तीच्या दिघी महल्ले या गावी कुंभार बांधवांची आठ ते दहा कुटुंबे राहतात. यातील शेतमजुरी करणारे विठ्ठल वझे यांना दोन मुले. यश नऊ वर्षांचा, तर नीलेश सात वर्षांचा. यशचा जन्म झाल्यानंतर ते हसत-खेळत-रडत असत. त्यांच्या शरीराच्या सर्व हालचाली होत होत्या. मात्र, दोन वर्षांचा होताच अचानकपणे बोलणे बंद झाले. त्याला धडपणे पायावर उभे राहणे जमत नव्हते. लगेच हातही लुळे पडले. काही दिवसांतच खुर्चीवर बसायला शक्य झाले नाही. अखेर यशला बिछान्याचा आधार घ्यावा लागला. प्रसूतिकाळातील चूक असेल, या भावनेतून दुसऱ्यांदा योग्य काळजी घेण्यात आली. मात्र, नीलेशचेदेखील दोन वर्षांचा होताच यशप्रमाणे बोलणे, चालणे, बसणे बंद झाले.

------------------

चुलतभाऊही झाला बहुविकलांग

विठ्ठल वझे यांचा चुलतभाऊ अमोल वझे यांचा मुलगा आदित्यची स्थिती यश आणि नीलेशसारखी झाली आहे. वझे कुटूंबातील तिन्ही मुले आज बिछान्यावर आहेत.

------------------

पोटाची खळगी भरायची कशी? पालकांचा प्रश्न

विठ्ठल वझे व अमोल वझे आणि त्यांच्या पत्नींना शेतमजुरीवर गुजराण करावी लागते. दुसरीकडे मुलांचे विधी, ब्रशपासून निजेपर्यंत कुणीतरी जवळ असावेच लागते. आतापर्यंत त्यांनी अनेक दवाखाने केले. मात्र आजार कोणता, हे लक्षात आले नाही. उपचार करताना आता हात जमिनीला टेकले आहेत. त्यातच उपचारासाठी पैसा उभा करायचा की पोटाची खळगी भरायची, हा प्रश्नही निर्माण झाला आहे.

सामाजिक व शैक्षणिक प्रगती अशक्य

यश विठ्ठल वझे आज तिसऱ्या वर्गात आहे. त्याला विशेष शिक्षक वैभव गवते घरी येऊन शिकवत आहेत. यश पूर्णतः मतिमंद असल्याने मूलभूत गरजा, स्वतःचे काम स्वतः करणे अशा सामाजिक तसेच गोल काढणे, अक्षराची ओळख आदी शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न शक्य झाले नसल्याचे गवते यांनी सांगितले.

---------------------

प्रसूतीदरम्यान निष्काळजीपणा झाला, तर अपत्य मतिमंद जन्माला येऊ शकते. असे आजार आनुवंशिकतेमधून उद्भवतात. बहुविकलांगत्वावर एखादेच वेळी उपचार शक्य होतो.

- डॉ. ऋषीकेश घाटोळ, बालविकास तज्ज्ञ, अमरावती