शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सापन नदीतील पीओपी मूर्तींचे पुन्हा विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:15 IST

फोटो - जावरे २२ पी (पीओपी मूर्तींचे पुन्हा विसर्जन करताना सामाजिक संघटनांचे पदाधिकारी) परतवाडा : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मातीच्या ...

फोटो - जावरे २२ पी

(पीओपी मूर्तींचे पुन्हा विसर्जन करताना सामाजिक संघटनांचे पदाधिकारी)

परतवाडा : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मातीच्या गणेशमूर्ती विकत आणण्याचे नागरिकांना विविध स्तरांवरून करण्यात आलेले आवाहन फोल ठरले आहे. त्याचा प्रत्यय सापन नदीत न बुडालेल्या गणेशमूर्तींवरून येत आहे. अशा हजारो मूर्ती पूजाअर्चा करून बुधवारी कृत्रिम जलाशयात पुन्हा विसर्जन करण्यात आल्या. मूर्तीद्वारे अविघटनशील पीओपी पाण्यात मिसळत असल्याने जलप्रदूषणाची पातळी वाढण्याची भीती कायम आहे.

आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन, कुंभार समाज, सावळी दातुरा ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते यांनी हा महत्त्वपूर्ण उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही राबविला. चार दिवसांपासून सापन नदीत गणेश विसर्जन होत आहे. परतवाडा, अचलपूर या जुळ्या शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नदीत गणेशमूर्ती विसर्जन केल्या. बुधवारी सापन नदीपात्राचे पाणी ओसरल्यानंतर उघड्या पडलेल्या पीओपीच्या हजारो मूर्त्या पाच ते सहा ट्रॅक्टरमध्ये गोळा करण्यात आल्या. त्यांचे विधिवत पूजन केल्यानंतर कृत्रिम तळ्यात विसर्जन करण्यात आले.

बॉक्स

पीओपीच्या मूर्तींवर सर्वाधिक भर

नागरिक मोठ्या प्रमाणात पीओपी मूर्ती खरेदी करत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले. पर्यावरणाला धोका असणाऱ्या मूर्ती टाळा व मातीच्या मूर्ती स्वीकारा, हा सामाजिक संदेश देत आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन, कुंभार समाज, सावळी ग्रामपंचायततर्फे दरवर्षी दिला जातो. पीओपी मूर्तींचे पूर्वीपेक्षा प्रमाण कमी असले तरी मातीच्या मूर्तींचा खप कमीच असल्याचे यंदा पुन्हा उघडकीस आले आहे.

बॉक्स

संघटना, पदाधिकारी, प्रशासन सोबत

जुळ्या शहरातील विविध संघटना, प्रशासन व पदाधिकारी नेहमीप्रमाणे या कार्यासाठी सोबत आले. सरपंच मनोहर बहुराशी, सामाजिक कार्यकर्ते गजानन कोल्हे, ठाणेदार सदानंद मानकर, गणेश बेलोकार, सुनील खानजोडे, आदिवासी पर्यावरण संघटनचे योगेश खानजोडे, संजय डोंगरे, प्यारेलाल प्रजापती, नवीन प्रजापती, मुरलीधर ठाकरे, कुंभार समाज प्रतिनिधी राजेश प्रजापती, मनोज प्रजापती, रमेश प्रजापती, रोहन प्रजापती, सूरज, शुभम, पंकज, दिनेश प्रजापती, सूरज पेंटर, प्रकाश प्रजापती, अनिल बर्डे, बाबू धोटे, राजा पानसे, संजू उईके, आनंद मनोहरे, दिलीप मनोहरे या युवकांनी श्रमदान करून सापन नदीपात्र स्वछ केले.