शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

पोर्ट करूनही रेंज, कनेक्टिव्हिटी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:29 IST

चांदूर बाजार : काही दिवसांपासून तालुक्यातील मोबाइल सेवा आलटून-पालटून बंद पडत आहे. रेंज आणि कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने अनेकांनी ...

चांदूर बाजार : काही दिवसांपासून तालुक्यातील मोबाइल सेवा आलटून-पालटून बंद पडत आहे. रेंज आणि कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने अनेकांनी मोबाइल कंपनी बदलल्या. मात्र, समस्या कायम राहत असल्याने ग्राहकांची डोकेदुखी चांगलीच वाढत आहे.

फोन न लागणे, इंटरनेट सेवा बंद पडणे, वारंवार रेंज न मिळणे, फोन लागला तरी आवाज न येणे आदी प्रकार सध्या सतत घडत आहे. यामुळे काही ग्राहक या मोबाइल कंपनीची सेवा पेक्षा दुसºया कंपनीची सेवा बरी, म्हणत मोबाईल नंबर अन्य मोबाईल कंपनीत पोर्ट करीत आहे. मात्र त्यांचे तिकडेही समाधान होताना दिसत नाही.

काही बँका, पतसंस्था, कॅफे सेंटरना या विस्कळीत सेवेमुळे अडचणीत आल्या आहेत. अनेक बँकांमध्ये सर्व्हर बंद असल्याचा फलक झळकतो. मोबाईल कंपन्यांनी अनलिमिटेड डाटा फ्री या सुविधेतून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. रिचार्ज करूनही पूर्ण लाभ न मिळता त्यातील काही तास दिवस विस्कळीत सेवेमुळे ग्राहकाची वेळ फुकट वाया जात आहे. परंतु ग्राहकांना रिचार्ज मात्र तारखेवरच करावे लागते. काही कंपनीचे फोर जी चे रिचार्ज केल्यानंतरही टुजी किंवा थ्रीजी सेवा मिळते. त्यातही इंटरनेटची गती मिळत नाही. या मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून काहींनी छोटे-छोटे व्यवसाय सुरू केले. मात्र रेंज मिळत नसल्याने सर्वांनाच मोठे नुकसान सोसावे लागते.

रिचार्जचे दर वाढले

अनलिमिटेड डेटा फ्री च्या नावावर मोबाइल कंपनीने रिचार्जचे दर वाढविले आहे. त्यामुळे ग्राहकांचे कंबरडे मोडत असून आवश्यक आहे म्हणून चालू द्या, असे काही ग्राहकांतर्फे बोलले जात आहेत. रिचार्जच्या दरात वाढ करूनही ग्राहकांना सुविधा पुरविल्या जात नाहीत. मोबाइलच्या चांगल्या सेवेची हमी मात्र कोणी देत नाही, अशी सार्वत्रिक ओरड आहे.

--------------------------