शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

राणा समर्थकांकडूनच हल्ला

By admin | Updated: April 16, 2016 00:04 IST

‘आम्ही नि:शस्त्र होतो. हल्ला करण्याचा उद्देश असता तर किमान काठ्या नेल्या असत्या. परंतु आम्ही लोकशाही मार्गाने केवळ निषेध नोंदविण्यासाठी आणि आ. राणांनी माफी मागावी, ...

पत्रपरिषद : दिनेश सूर्यवंशी यांचा आरोपअमरावती : ‘आम्ही नि:शस्त्र होतो. हल्ला करण्याचा उद्देश असता तर किमान काठ्या नेल्या असत्या. परंतु आम्ही लोकशाही मार्गाने केवळ निषेध नोंदविण्यासाठी आणि आ. राणांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेलो. हल्ल्याची सुरूवात राणा समर्थकांकडूनच झाली’, असा आरोेप भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी पत्रपरिषदेतून केला. पुढे बोलताना ते म्हणाले, राणा समर्थकांनी खुर्ची मारून भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष विवेक कलोती यांचे डोके फोडले. त्यामुळेच आमचे कार्यकर्ते बिथरले आणि हाणामारीला सुरूवात झाली.आ. राणा यांनी भीमटेकडीवरील डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या पुतळा अनावरणाच्या मुद्यावरुन मुद्दामच पालकमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा वापरली. वास्तविक या प्रकरणाशी पालकमंत्र्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध नाही. कला संचालनालयाने पुतळ्याच्या बनावटीवर आक्षेप नोंदविला होता. निळ्या झेंड्यांची गरज काय?अमरावती : आक्षेप नोंदविणारी मंडळी भाजपची नाही. नियमांची पूर्तता करण्याऐवजी राणा यांनी त्या मुद्याचा जाणीवपूर्वक राजकीय वापर केला. त्यांनी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून एकप्रकारे मुख्यमंत्र्यांनाच ‘टार्गेट’ केले.आ. रवि राणा यांची आजवरची कारकीर्द बघता ते नेहमीच चुकीच्या मुद्यांचा बाऊ करतात. नौटंकी करणे हा त्यांचा स्वभाव आहे. कायदेमंडळाच्या सभागृहाचे सदस्य असलेल्या व्यक्तिला वागणुकीचे किमान भान तरी असायलाच हवे. बाबासाहेबांच्या अस्थी असलेल्या नया अकोला येथील स्मृतीस्थळी भाजपच्या जिल्हाध्यक्षांना सन्मानपूर्वक मंचावर बोलावले गेले. भगवे आणि निळे फेटे एकत्र आल्याचे सुंदर चित्र या शहरात असताना राणांनी निळे झेंडे घेऊन लोकांना कशासाठी बोलावले? कार्यकर्त्यांना बोलावून काय ते सांगता आले असते. घटनेला धार्मिक रंग देण्याची गरज होती काय? आम्हालाही पक्षाचे झेंडे हाती घेता आले असते; पण आम्ही तसे केले नाही, असेही सूर्यवंशी म्हणाले.