शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

रमाई घरकूल योजनेला कासवगती

By admin | Updated: April 17, 2015 23:59 IST

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी सुरु करण्यात आलेली रमाई आवास योजना राबविताना ...

आॅनलाईन तरीही मरगळ : धनादेश, बीपीएल प्रमाणपत्रासाठी पायपीट सुरुचअमरावती : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी सुरु करण्यात आलेली रमाई आवास योजना राबविताना महापालिकेत कासवगतीने काम सुरुआहे. परिणामी घरकुलांसाठी अनुदान आले असतानादेखील लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्याची ओरड कायम आहे. काही दिवसांपूर्वी ही योजना आॅनलाईन सुरु करण्यात आली असून प्रशासनाने कामांना गती देण्यासाठी मरगळ झटकली नसल्याचे चित्र आहे.शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लोकांसाठी शासनाने ९ मार्च २०१० रोजी अध्यादेश काढून या योजनेची मुहूर्तमेढ रोवली. घरकुलासाठी २६९ चौरस फूट चटई क्षेत्र निश्चित करुन दोन लाख रुपये किंमत देण्याचे ठरविण्यात आले. यात बीपीएल लाभार्थ्यांना १० टक्के हिस्सा भरण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. ही योजना व्यवस्थितरीत्या सुरु राहावी, यासाठी तांत्रिक कामांसाठी महापालिकेने पुणे येथील पेव्हटेक कन्सल्टक कंपनीला जबाबदारी सोपविली आहे. शहरात घरकूल योजनेंतर्गत १९८५ घरे मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार दोन टप्प्यात १४४५ घरकूल निर्माण करुन ते लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले आहेत. त्यापैकी ५४० घरकूल निर्माण करावयाची आहेत. रमाई घरकूल योजनेचे स्वतंत्र कामकाज चालविण्यासाठी महापालिकेत दलित वस्ती विभाग कार्यरत आहे. कार्यकारी अभियंता, उपअभियंते, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा असताना रमाई घरकूल योजनतील ओरड कमी होण्याचे नाव घेत नाही, ही चिंतनीय बाब आहे. फेबु्रवारीत पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत प्रदीप दंदे, प्रकाश बनसोड, भूषण बनसोड, अजय गोंडाणे, अंबादास जावरे, निर्मला बोरकर, दीपमाला मोहोड, गुंफाबाई मेश्राम, अलका सरदार, अविनाश मार्डीकर, जयश्री मोरे, कांचन ग्रेसपुंजे आदी सदस्यांनी ही योजना व्यवस्थितरीत्या राबविली जात नसल्याचा आरोप केला. परिणामी मावळते आयुक्त अरुण डोंगरे यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते रमाई घरकूल योजना ही आॅनलाईन सुरु करुन होणारी ओरड कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ही योजना आॅनलाईन सुरु झाल्यानंतरदेखील लाभार्थ्यांना कोणत्यातरी कारणास्तव पायपीट करावीच लागत आहे. घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळेल ही आशा असताना कासवगतीने सुरु असलेल्या कामांमुळे अनेकांना वेळेत लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. ही योजना आॅनलाईन सुरु करण्यापूर्वी अनेक लाभार्थ्यांच्या फाईली गायब झाल्याच्या तक्रारीदेखील प्राप्त झाल्या होत्या. एकदा फाईल गायब झाली की, ती पुन्हा तयार करण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि पैशांचा भुर्दंड हा लाभार्थ्यांना सहन करावा लागत होता. आॅनलाईनमुळे लाभार्थ्यांची फाईल गायब होण्याची भानगड थांबली असली तरी जलदगतीने लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर न होता धनादेश, बीपीएलचे प्रमाणपत्र मिळत नसल्याची ओरड कायम आहे. (प्रतिनिधी)४०० घरकुलांचा नव्याने प्रस्तावशहरात ५४० घरकू ल निर्माण करावयाची असली तरी नव्याने ४०० घरकूल निर्माण करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ८ कोटी रुपये त्याकरिता अपेक्षित असल्याची माहिती उपअभियंता भास्कर तिरपुडे यांनी दिली. ही योजना आॅनलाईन सुरु झाल्यापासून लाभार्थ्यांची ओरड कमी झाली आहे. शासन निर्णयानुसारच प्रशासनाला कामे करावी लागत असून नियमाबाहेर काहीही करता येत नाही. या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी यंत्रणा कार्यरत असल्याचे तिरपुडे यांनी सांगितले.योजनेसाठी लागणारी कागदपत्रेरमाई घरकूल योजनेसाठी एकूण ११ प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. यात महापालिका बीपीएल प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, टॅक्स पावती, असिसमेंट पावती, १०० रुपयांचे मुद्रांक, मतदान कार्ड, बॅकेचे पासबूक, महापालिका रहिवासी दाखला, नगरसेवकाचा दाखला, शिधापत्रिका यांचा समावेश आहे.