शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
2
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
3
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
4
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
5
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
6
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
7
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
8
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
9
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
10
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
11
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
12
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
13
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
14
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
15
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
16
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
17
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
18
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
19
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
20
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!

पावसाची दडी, खरीप धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:00 IST

यंदाचा ४० टक्के पावसाळा आटोपला असताना ४५ टक्के पावसाची तूट आहे. सध्या दोन आठवड्यांपासून पेरण्या थबकल्या असल्याने किमान दोन लाख हेक्टर क्षेत्र नापेर आहे. पेरणी झालेल्या तीन लाख हेक्टरमध्ये दुबार पेरणीची सावट आहे. सोयाबीन फुलोरावर यायच्या काळात पेरणी होणार असल्याने सरासरी उत्पादनात निश्चित घट होेणार आहे. यंदाच्या खरिपासाठी हा आपदा स्थितीचा काळ आहे. कृषिमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात पिकांचे आपत्कालीन नियोजन देण्यास गाफील कृषी विभाग ही शोकांतिका आहे.

ठळक मुद्देदुबार पेरणीचे सावट : दोन आठवड्यांपासून पाऊस गायब, दोन लाख हेक्टर नापेर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाचा ४० टक्के पावसाळा आटोपला असताना ४५ टक्के पावसाची तूट आहे. सध्या दोन आठवड्यांपासून पेरण्या थबकल्या असल्याने किमान दोन लाख हेक्टर क्षेत्र नापेर आहे. पेरणी झालेल्या तीन लाख हेक्टरमध्ये दुबार पेरणीची सावट आहे. सोयाबीन फुलोरावर यायच्या काळात पेरणी होणार असल्याने सरासरी उत्पादनात निश्चित घट होेणार आहे. यंदाच्या खरिपासाठी हा आपदा स्थितीचा काळ आहे. कृषिमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात पिकांचे आपत्कालीन नियोजन देण्यास गाफील कृषी विभाग ही शोकांतिका आहे.यंदाच्या खरिपात रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले. त्यानंतर आर्द्राच्या मध्यात दाखल झालेल्या मान्सूनने दडी मारली ती सध्याही कायम आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे आगमन झाल्यानंतर मान्सून सक्रिय झाल्याची हाकाटी हवामान विभागाने उठवली. मात्र, पावसाने या भाकितांना दाद दिलेली नाही. पाऊस येण्याच्या आशेने जिल्ह्यातील पाच लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. मात्र, चार दिवसांतच पावसाने दडी मारली. १५ दिवसानंतरही कायम आहे. त्यामुळे दोन लाख हेक्टर क्षेत्र अद्यापही नापेर आहे, पेरलेल्या तीन लाख हेक्टर क्षेत्रातील पेरण्या उलटण्याची भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे आपत्कालीन नियोजन करणे महत्त्वाचे आहे, अन्यथा सरासरी उत्पन्न घटण्याची शक्यता आहे.यंदा १ जून ते १६ जुलै या कालावधीत पावसाची २८८.७ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १५७ मिमी पाऊस झालेला आहे. म्हणजेच ४६ दिवसांत १३२ मिमी पाऊस कमी झालेला आहे. जिल्ह्यात पावसाची ५४ टक्के सरासरी आहे. सद्यस्थितीत चौदाही तालुके पावसाच्या सरासरीत माघारले आहेत. वरूड, भातकुली तालुक्यात पावसाची ३५ टक्क्यांच्या आत सरासरी आहे. काही तालुक्यांत २ जुलै, तर काही तालुक्यांत ४ जुलैपासून पावसात खंड राहिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, २५ जुलैनंतर मान्सून पुन्हा जिल्ह्यासह विदर्भात सक्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र, या अवधीत पिकांना व पेरणी झालेल्या क्षेत्रात मोड येण्याची शक्यता आहे. ही आगामी दुष्काळ अन् नापिकीची चाहूल असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.आपत्कालीन पीक नियोजन महत्त्वाचेपावसाळा १६ जुलैनंतर सुरू झाल्यास २५ टक्के बियाण्यांचा वापर जास्त करावा आणि रासायनिक खताचा वापर २५ टक्क्यांनी कमी करावा. संकरित वाणाखालील क्षेत्र कमी करून सुधारित वाणांचा वापर करावा. मूग व उडिदाची पेरणी टाळावी. देशी कपाशीचे सरळ वाण वापरावे. कपाशीच्या ओळी कमी करून त्यामध्ये एक किंवा दोन ओळी तुरीच्या घ्याव्यात. २५ जुलैपर्यत सोयाबीनची पेरणी व त्यात तुरीचे आंतरपीक घेता येईल.कृत्रिम पाऊस पाडणार केव्हा?पावसाचा खंड असल्यास शासन कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार. यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली असल्याचे सुतोवाच कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केले. विशेष म्हणजे, त्यांच्याच गृहजिल्ह्यात पाऊस ४६ टक्क्यांनी माघारला. वरूड मतदारसंघात आतापर्यंत फक्त ३१ टक्के पाऊस झाला. असे असताना कृषिमंत्री अन् जिल्हाधिकारी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत, असा नागरिकांचा सवाल आहे.