शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

पावसाची दडी, खरीप धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:00 IST

यंदाचा ४० टक्के पावसाळा आटोपला असताना ४५ टक्के पावसाची तूट आहे. सध्या दोन आठवड्यांपासून पेरण्या थबकल्या असल्याने किमान दोन लाख हेक्टर क्षेत्र नापेर आहे. पेरणी झालेल्या तीन लाख हेक्टरमध्ये दुबार पेरणीची सावट आहे. सोयाबीन फुलोरावर यायच्या काळात पेरणी होणार असल्याने सरासरी उत्पादनात निश्चित घट होेणार आहे. यंदाच्या खरिपासाठी हा आपदा स्थितीचा काळ आहे. कृषिमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात पिकांचे आपत्कालीन नियोजन देण्यास गाफील कृषी विभाग ही शोकांतिका आहे.

ठळक मुद्देदुबार पेरणीचे सावट : दोन आठवड्यांपासून पाऊस गायब, दोन लाख हेक्टर नापेर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाचा ४० टक्के पावसाळा आटोपला असताना ४५ टक्के पावसाची तूट आहे. सध्या दोन आठवड्यांपासून पेरण्या थबकल्या असल्याने किमान दोन लाख हेक्टर क्षेत्र नापेर आहे. पेरणी झालेल्या तीन लाख हेक्टरमध्ये दुबार पेरणीची सावट आहे. सोयाबीन फुलोरावर यायच्या काळात पेरणी होणार असल्याने सरासरी उत्पादनात निश्चित घट होेणार आहे. यंदाच्या खरिपासाठी हा आपदा स्थितीचा काळ आहे. कृषिमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात पिकांचे आपत्कालीन नियोजन देण्यास गाफील कृषी विभाग ही शोकांतिका आहे.यंदाच्या खरिपात रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले. त्यानंतर आर्द्राच्या मध्यात दाखल झालेल्या मान्सूनने दडी मारली ती सध्याही कायम आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे आगमन झाल्यानंतर मान्सून सक्रिय झाल्याची हाकाटी हवामान विभागाने उठवली. मात्र, पावसाने या भाकितांना दाद दिलेली नाही. पाऊस येण्याच्या आशेने जिल्ह्यातील पाच लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. मात्र, चार दिवसांतच पावसाने दडी मारली. १५ दिवसानंतरही कायम आहे. त्यामुळे दोन लाख हेक्टर क्षेत्र अद्यापही नापेर आहे, पेरलेल्या तीन लाख हेक्टर क्षेत्रातील पेरण्या उलटण्याची भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे आपत्कालीन नियोजन करणे महत्त्वाचे आहे, अन्यथा सरासरी उत्पन्न घटण्याची शक्यता आहे.यंदा १ जून ते १६ जुलै या कालावधीत पावसाची २८८.७ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १५७ मिमी पाऊस झालेला आहे. म्हणजेच ४६ दिवसांत १३२ मिमी पाऊस कमी झालेला आहे. जिल्ह्यात पावसाची ५४ टक्के सरासरी आहे. सद्यस्थितीत चौदाही तालुके पावसाच्या सरासरीत माघारले आहेत. वरूड, भातकुली तालुक्यात पावसाची ३५ टक्क्यांच्या आत सरासरी आहे. काही तालुक्यांत २ जुलै, तर काही तालुक्यांत ४ जुलैपासून पावसात खंड राहिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, २५ जुलैनंतर मान्सून पुन्हा जिल्ह्यासह विदर्भात सक्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र, या अवधीत पिकांना व पेरणी झालेल्या क्षेत्रात मोड येण्याची शक्यता आहे. ही आगामी दुष्काळ अन् नापिकीची चाहूल असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.आपत्कालीन पीक नियोजन महत्त्वाचेपावसाळा १६ जुलैनंतर सुरू झाल्यास २५ टक्के बियाण्यांचा वापर जास्त करावा आणि रासायनिक खताचा वापर २५ टक्क्यांनी कमी करावा. संकरित वाणाखालील क्षेत्र कमी करून सुधारित वाणांचा वापर करावा. मूग व उडिदाची पेरणी टाळावी. देशी कपाशीचे सरळ वाण वापरावे. कपाशीच्या ओळी कमी करून त्यामध्ये एक किंवा दोन ओळी तुरीच्या घ्याव्यात. २५ जुलैपर्यत सोयाबीनची पेरणी व त्यात तुरीचे आंतरपीक घेता येईल.कृत्रिम पाऊस पाडणार केव्हा?पावसाचा खंड असल्यास शासन कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार. यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली असल्याचे सुतोवाच कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केले. विशेष म्हणजे, त्यांच्याच गृहजिल्ह्यात पाऊस ४६ टक्क्यांनी माघारला. वरूड मतदारसंघात आतापर्यंत फक्त ३१ टक्के पाऊस झाला. असे असताना कृषिमंत्री अन् जिल्हाधिकारी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत, असा नागरिकांचा सवाल आहे.