शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

पावसाची दडी, खरीप धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:00 IST

यंदाचा ४० टक्के पावसाळा आटोपला असताना ४५ टक्के पावसाची तूट आहे. सध्या दोन आठवड्यांपासून पेरण्या थबकल्या असल्याने किमान दोन लाख हेक्टर क्षेत्र नापेर आहे. पेरणी झालेल्या तीन लाख हेक्टरमध्ये दुबार पेरणीची सावट आहे. सोयाबीन फुलोरावर यायच्या काळात पेरणी होणार असल्याने सरासरी उत्पादनात निश्चित घट होेणार आहे. यंदाच्या खरिपासाठी हा आपदा स्थितीचा काळ आहे. कृषिमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात पिकांचे आपत्कालीन नियोजन देण्यास गाफील कृषी विभाग ही शोकांतिका आहे.

ठळक मुद्देदुबार पेरणीचे सावट : दोन आठवड्यांपासून पाऊस गायब, दोन लाख हेक्टर नापेर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाचा ४० टक्के पावसाळा आटोपला असताना ४५ टक्के पावसाची तूट आहे. सध्या दोन आठवड्यांपासून पेरण्या थबकल्या असल्याने किमान दोन लाख हेक्टर क्षेत्र नापेर आहे. पेरणी झालेल्या तीन लाख हेक्टरमध्ये दुबार पेरणीची सावट आहे. सोयाबीन फुलोरावर यायच्या काळात पेरणी होणार असल्याने सरासरी उत्पादनात निश्चित घट होेणार आहे. यंदाच्या खरिपासाठी हा आपदा स्थितीचा काळ आहे. कृषिमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात पिकांचे आपत्कालीन नियोजन देण्यास गाफील कृषी विभाग ही शोकांतिका आहे.यंदाच्या खरिपात रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले. त्यानंतर आर्द्राच्या मध्यात दाखल झालेल्या मान्सूनने दडी मारली ती सध्याही कायम आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे आगमन झाल्यानंतर मान्सून सक्रिय झाल्याची हाकाटी हवामान विभागाने उठवली. मात्र, पावसाने या भाकितांना दाद दिलेली नाही. पाऊस येण्याच्या आशेने जिल्ह्यातील पाच लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. मात्र, चार दिवसांतच पावसाने दडी मारली. १५ दिवसानंतरही कायम आहे. त्यामुळे दोन लाख हेक्टर क्षेत्र अद्यापही नापेर आहे, पेरलेल्या तीन लाख हेक्टर क्षेत्रातील पेरण्या उलटण्याची भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे आपत्कालीन नियोजन करणे महत्त्वाचे आहे, अन्यथा सरासरी उत्पन्न घटण्याची शक्यता आहे.यंदा १ जून ते १६ जुलै या कालावधीत पावसाची २८८.७ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १५७ मिमी पाऊस झालेला आहे. म्हणजेच ४६ दिवसांत १३२ मिमी पाऊस कमी झालेला आहे. जिल्ह्यात पावसाची ५४ टक्के सरासरी आहे. सद्यस्थितीत चौदाही तालुके पावसाच्या सरासरीत माघारले आहेत. वरूड, भातकुली तालुक्यात पावसाची ३५ टक्क्यांच्या आत सरासरी आहे. काही तालुक्यांत २ जुलै, तर काही तालुक्यांत ४ जुलैपासून पावसात खंड राहिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, २५ जुलैनंतर मान्सून पुन्हा जिल्ह्यासह विदर्भात सक्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र, या अवधीत पिकांना व पेरणी झालेल्या क्षेत्रात मोड येण्याची शक्यता आहे. ही आगामी दुष्काळ अन् नापिकीची चाहूल असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.आपत्कालीन पीक नियोजन महत्त्वाचेपावसाळा १६ जुलैनंतर सुरू झाल्यास २५ टक्के बियाण्यांचा वापर जास्त करावा आणि रासायनिक खताचा वापर २५ टक्क्यांनी कमी करावा. संकरित वाणाखालील क्षेत्र कमी करून सुधारित वाणांचा वापर करावा. मूग व उडिदाची पेरणी टाळावी. देशी कपाशीचे सरळ वाण वापरावे. कपाशीच्या ओळी कमी करून त्यामध्ये एक किंवा दोन ओळी तुरीच्या घ्याव्यात. २५ जुलैपर्यत सोयाबीनची पेरणी व त्यात तुरीचे आंतरपीक घेता येईल.कृत्रिम पाऊस पाडणार केव्हा?पावसाचा खंड असल्यास शासन कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार. यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली असल्याचे सुतोवाच कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केले. विशेष म्हणजे, त्यांच्याच गृहजिल्ह्यात पाऊस ४६ टक्क्यांनी माघारला. वरूड मतदारसंघात आतापर्यंत फक्त ३१ टक्के पाऊस झाला. असे असताना कृषिमंत्री अन् जिल्हाधिकारी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत, असा नागरिकांचा सवाल आहे.