शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

परतीचा पाऊस उडदाच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2016 00:21 IST

परतीच्या पावसाचा वाढलेला मुक्काम सोयाबीन, तूर, कपाशीला पोषक असला तरी उडीद पिकाच्या मुळावर उठला आहे.

यंदा विक्रमी ४९२ टक्के क्षेत्र : ७० हजार एकरांत उडीद काढणीला ‘ब्रेक’अमरावती : परतीच्या पावसाचा वाढलेला मुक्काम सोयाबीन, तूर, कपाशीला पोषक असला तरी उडीद पिकाच्या मुळावर उठला आहे. यंदा उडीद पिकाचे विक्रमी क्षेत्र आहे. सततच्या पावसामुळे उडदाच्या सवंगणीला ब्रेक लागल्याने पीक करपत आहे. ज्यांची सवंगणी करून ढीग लागले आहे, तेथे शेंगामधील दाने अंकुरत आहे. यंदाच्या खरीप हंगामात पेरणीपासून समाधानकारक पाऊस असल्याने जिल्ह्यात अपेक्षित सरासरीच्या ४९२ टक्के म्हणजेच १३ हजार एकरांच्या तुलनेत ७० हजार हेक्टरमध्ये उडदाची पेरणी झालेली आहे. ६२ ते ८० दिवसांचे हे उडदाचे पीक नगदी पीक म्हणून जिल्ह्याच्या सर्वच भागांत घेण्यात येते. मात्र दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यात या पिकाचे पेरणीक्षेत्र अधिक आहे व या भागात परतीचा पाऊसदेखील अधिक झाल्यामुळे उडदाचे पीक शेतातच खराब होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी सवंगणी करून ढीग लावले ते पावसात भिजून काळे पडत आहे. काही ठिकाणी शेंगांमधील दाण्याचे अंकुरण होत आहे व बियाण्यांची प्रतवारी खराब होत आहे व या सर्व प्रकारात सरासरी उत्पन्नात २५ ते ३० टक्क्यांनी घट होणार आहे. शेतकरी पाऊस उघडण्याची वाट पाहत असून नंतर उडीद पीक सवंगणीला वेग येणार आहे. गतवर्षी १२ हजार, यंदा ७ हजार भाव मागील वर्षी मान्सूनचे उशिरा आगमन व नंतर पावसाची प्रदीर्घ दडी यामुळे उडीद पिकाचे क्षेत्र कमी झाले. जेथे पेरणी केली, त्या ठिकाणी मोड येऊन दुबार पेरणीद्वारे सोयाबीन पेरावे लागले होते. उत्पादन नसल्यामुळे उडदाला १२ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. त्यामुळे यंदा उडदाची विक्रमी अशी पेरणी झाली. त्यामुळे उडदाचा हंगाम सुरू होताच व्यापाऱ्यांनी भाव पाडले आहे. त्यामुळे सध्या ७ हजार ते ७ हजार २०० रुपये असा भाव मिळत आहे. दर्यापूर, अंजनगाव तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र जिल्ह्यात यंदा २८ हजार क्षेत्रात उडदाची पेरणी झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक १०,६९१ हेक्टर क्षेत्र दर्यापूर तालुक्यात आहे. अंजनगाव सुर्जी ५,५०६, अचलपूर ८६९, चांदूरबाजार १,५६०, धामणगाव रेल्वे १,२९४, चांदूररेल्वे १९६, तिवसा ६६४, मोर्शी ६८७, वरुड ३९८, धारणी १,९२०, चिखलदरा ३३५, अमरावती ६७४, भातकुली २,९८२, नांदगाव खंडेश्वर ७६९ हेक्टर क्षेत्रात उडीद पीक आहे. कृषी सहायकांमार्फत पंचनामे करावे परतीच्या पावसामुळे उडीद पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याची सूचना कृषी कार्यालयास देणे महत्त्वाचे आहे व कृषी सहायकांमार्फत पंचनामे करावे, हा अहवाल पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी उपयुक्त ठरणार आहे. सध्या वातावरणात आर्द्रता व पाऊस जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कडक ऊन पडण्याची वाट पाहावी, ज्यांनी सोंगणी केली त्यांनी ढिग झाकून ठेवावे व उन्हात सोकवावे. - योगेश इंगळे, कृषी शास्त्रज्ञप्रादेशिक संशोधन केंद्र