शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

परतीचा पाऊस उडदाच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2016 00:21 IST

परतीच्या पावसाचा वाढलेला मुक्काम सोयाबीन, तूर, कपाशीला पोषक असला तरी उडीद पिकाच्या मुळावर उठला आहे.

यंदा विक्रमी ४९२ टक्के क्षेत्र : ७० हजार एकरांत उडीद काढणीला ‘ब्रेक’अमरावती : परतीच्या पावसाचा वाढलेला मुक्काम सोयाबीन, तूर, कपाशीला पोषक असला तरी उडीद पिकाच्या मुळावर उठला आहे. यंदा उडीद पिकाचे विक्रमी क्षेत्र आहे. सततच्या पावसामुळे उडदाच्या सवंगणीला ब्रेक लागल्याने पीक करपत आहे. ज्यांची सवंगणी करून ढीग लागले आहे, तेथे शेंगामधील दाने अंकुरत आहे. यंदाच्या खरीप हंगामात पेरणीपासून समाधानकारक पाऊस असल्याने जिल्ह्यात अपेक्षित सरासरीच्या ४९२ टक्के म्हणजेच १३ हजार एकरांच्या तुलनेत ७० हजार हेक्टरमध्ये उडदाची पेरणी झालेली आहे. ६२ ते ८० दिवसांचे हे उडदाचे पीक नगदी पीक म्हणून जिल्ह्याच्या सर्वच भागांत घेण्यात येते. मात्र दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यात या पिकाचे पेरणीक्षेत्र अधिक आहे व या भागात परतीचा पाऊसदेखील अधिक झाल्यामुळे उडदाचे पीक शेतातच खराब होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी सवंगणी करून ढीग लावले ते पावसात भिजून काळे पडत आहे. काही ठिकाणी शेंगांमधील दाण्याचे अंकुरण होत आहे व बियाण्यांची प्रतवारी खराब होत आहे व या सर्व प्रकारात सरासरी उत्पन्नात २५ ते ३० टक्क्यांनी घट होणार आहे. शेतकरी पाऊस उघडण्याची वाट पाहत असून नंतर उडीद पीक सवंगणीला वेग येणार आहे. गतवर्षी १२ हजार, यंदा ७ हजार भाव मागील वर्षी मान्सूनचे उशिरा आगमन व नंतर पावसाची प्रदीर्घ दडी यामुळे उडीद पिकाचे क्षेत्र कमी झाले. जेथे पेरणी केली, त्या ठिकाणी मोड येऊन दुबार पेरणीद्वारे सोयाबीन पेरावे लागले होते. उत्पादन नसल्यामुळे उडदाला १२ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. त्यामुळे यंदा उडदाची विक्रमी अशी पेरणी झाली. त्यामुळे उडदाचा हंगाम सुरू होताच व्यापाऱ्यांनी भाव पाडले आहे. त्यामुळे सध्या ७ हजार ते ७ हजार २०० रुपये असा भाव मिळत आहे. दर्यापूर, अंजनगाव तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र जिल्ह्यात यंदा २८ हजार क्षेत्रात उडदाची पेरणी झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक १०,६९१ हेक्टर क्षेत्र दर्यापूर तालुक्यात आहे. अंजनगाव सुर्जी ५,५०६, अचलपूर ८६९, चांदूरबाजार १,५६०, धामणगाव रेल्वे १,२९४, चांदूररेल्वे १९६, तिवसा ६६४, मोर्शी ६८७, वरुड ३९८, धारणी १,९२०, चिखलदरा ३३५, अमरावती ६७४, भातकुली २,९८२, नांदगाव खंडेश्वर ७६९ हेक्टर क्षेत्रात उडीद पीक आहे. कृषी सहायकांमार्फत पंचनामे करावे परतीच्या पावसामुळे उडीद पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याची सूचना कृषी कार्यालयास देणे महत्त्वाचे आहे व कृषी सहायकांमार्फत पंचनामे करावे, हा अहवाल पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी उपयुक्त ठरणार आहे. सध्या वातावरणात आर्द्रता व पाऊस जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कडक ऊन पडण्याची वाट पाहावी, ज्यांनी सोंगणी केली त्यांनी ढिग झाकून ठेवावे व उन्हात सोकवावे. - योगेश इंगळे, कृषी शास्त्रज्ञप्रादेशिक संशोधन केंद्र