शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
2
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
3
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
4
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
5
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
6
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
7
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
8
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
9
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
10
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
11
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
12
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
13
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
14
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
15
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
16
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
17
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
18
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
19
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

रेल्वे स्थानक की कचऱ्याचे आगार?

By admin | Updated: July 12, 2014 00:40 IST

अमरावती ‘मॉडेल’ रेल्वे स्थानक झाले. बडनेरा हे पूर्वीपासूनच जंक्शन आहे. त्यामुळे दोन्ही रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची वर्दळ प्रचंड वाढली आहे.

श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेराअमरावती ‘मॉडेल’ रेल्वे स्थानक झाले. बडनेरा हे पूर्वीपासूनच जंक्शन आहे. त्यामुळे दोन्ही रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. बडनेऱ्याहून देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्याकरिता रेल्वे गाड्यांची सोेय असल्याने दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी या दोन्ही स्थानकांवरून ये-जा करतात. प्रवाशांशिवाय या दोन्ही स्थानकांवर भिकारी, भामटे, खाद्यपदार्थ विक्रेत्यांचासुध्दा मोठा वावर असतो. मात्र या दोन्ही रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक फलाटावरील कचरा, दुर्गंधी व पानाच्या पिचकाऱ्यांकडेच आधी लक्ष वेधले जाते. रेल्वे प्रशासन नाही म्हणायला आपल्यापरीने स्वच्छतेकडे लक्ष पुरविते. परंतु प्रवाशांच्या सोईसाठी असलेल्या या स्थानकाचे मूळ रूप कायम ठेवण्यासाठी केवळ प्रशासनावरच अवलंबून न राहता साफसफाईची नैतिक जबाबदारी प्रवाशांचीदेखील नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कचरा कंटनेरचा वापर करण्यास टाळाटाळबडनेरा रेल्वे स्थानकावर दररोज हजारो प्रवाशांचे आवागमन होते. रेल्वे स्थानक म्हटले की, खाद्यपदार्थ विक्रेत्यांची वर्दळ आलीच. बडनेरा जंक्शनवर प्रवेश करताच विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या विशिष्ट लयबद्ध आरोळ्या कानावर पडतात. प्रवाशांच्या आणि रेल्वेच्या गदारोळात या खाद्यपदार्थ विक्रेत्यांचीही लगबग सुरू असते. प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांची खरेदी केली जाते. परंतु पदार्थांवरील प्लास्टिकचे आवरण, चहाचे ग्लासेस, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, उरलेले खाद्यपदार्थ, नासलेले अन्नदेखील चक्क रेल्वे ट्रॅकवर टाकले जातात. वास्तविक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने कचरा कंटेनरची सोय केली आहे. मात्र, प्रवाशांकडून आणि व्यावसायिकांकडूनही या कचरा कंटेनरचा वापर पाहिजे तसा केला जात नाही. प्रवाशांनी हा कचरा कंटेनरमध्ये टाकण्याची तसदी घेतल्यास रेल्वे फलाटांवरील साफसफाईचा ५० टक्के प्रश्न आपोआपच सुटू शकतो, हे मात्र निश्चित.