शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

रबीचे २७४ कोटी कर्जवाटप रखडले

By admin | Updated: March 23, 2017 00:07 IST

यंदाचा रबी हंगाम संपण्यात असतानाही बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवाटपास निरुत्साह दाखविला आहे.

बँकांचा निरुत्साह : जिल्हा बँकेचा वाटपास ठेंगा अमरावती : यंदाचा रबी हंगाम संपण्यात असतानाही बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवाटपास निरुत्साह दाखविला आहे. जिल्ह्यात ३८६ कोटी २२ लाख रुपयांचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ११५ कोटी ८१ लाखांचे कर्ज वाटप झाले. विशेष म्हणजे हे कर्ज केवळ राष्ट्रीयकृत बँकांनी वाटप केले आहे. यात शेतकऱ्यांची म्हणविणाऱ्या जिल्हा बँकेसह ग्रामीण बँकेने ठेंगा दाखविला आहे. खरीप व रबी हंगाम २०१६-१७ करिता २१४५ कोटी ६८ लाख रुपयांचे लक्ष्यांक जिल्ह्यास देण्यात आले होते. यामध्ये खरीप हंगामासाठी १७६९ कोटी ४६ लाखांचा लक्ष्यांक होते. या तुलनेत एक लाख ६० हजार ९४० शेतकऱ्यांना १२९५ कोटी ४३ लाख रुपयांचे वाटप बँकांनी केले. ही ७४ टक्केवारी आहे. यामध्ये जिल्हा बँकेने ३९३ कोटी ३३ लाख, राष्ट्रीयकृत बँकांनी ८८८ कोटी ५० लाख व ग्रामीण बँकेद्वारा १३ कोटी ६० लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. रबी हंगामासाठी ३८६ कोटी २२ लाख रुपयांचे लक्ष्यांक जिल्ह्यास होते. यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना २५८ कोटी ६४ लाखांचे लक्ष्यांक असताना १ मार्चपर्यंत ४,८३१ शेतकऱ्याना ११५ कोटी ८१ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले. जिल्हा सहकारी बँकेस १२५ कोटी ४२ लाखांचे व ग्रामीण बँकांना १६ कोटीचे लक्षांक असताना या दोन्ही बँकांचे कर्जवाटप निरंक आहे. असे आहे राष्ट्रीयकृत बँकेचे रबी कर्ज वाटप यंदाच्या हंगामात अलाहाबाद बँकेने ३.९५ कोटी, आंध्रा बँकेने ३५ लाख, बँक आॅफ बडोदा ५६ लाख, बँक आॅफ इंडिया ५.८९ कोटी, बँक आॅफ महाराष्ट्र २०.११ कोटी , कॅनरा बँक १.३५ कोटी, सेंट्रल बँक २१.२५कोटी, कारर्पोरेशन बँक ४० लाख, देना बँक ७.८१ कोटी, आयडीबीआय बँक १.७८ कोटी, इंडियन बँक १.८६ कोटी, इंडियन ओव्हरसीज बँक ६८ लाख, पंजाब नॅशनल बँक १.८कोटी, स्टेट बँक २३.२१ कोटीचे वाटप केले.