शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

रबीचे २७४ कोटी कर्जवाटप रखडले

By admin | Updated: March 23, 2017 00:07 IST

यंदाचा रबी हंगाम संपण्यात असतानाही बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवाटपास निरुत्साह दाखविला आहे.

बँकांचा निरुत्साह : जिल्हा बँकेचा वाटपास ठेंगा अमरावती : यंदाचा रबी हंगाम संपण्यात असतानाही बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवाटपास निरुत्साह दाखविला आहे. जिल्ह्यात ३८६ कोटी २२ लाख रुपयांचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ११५ कोटी ८१ लाखांचे कर्ज वाटप झाले. विशेष म्हणजे हे कर्ज केवळ राष्ट्रीयकृत बँकांनी वाटप केले आहे. यात शेतकऱ्यांची म्हणविणाऱ्या जिल्हा बँकेसह ग्रामीण बँकेने ठेंगा दाखविला आहे. खरीप व रबी हंगाम २०१६-१७ करिता २१४५ कोटी ६८ लाख रुपयांचे लक्ष्यांक जिल्ह्यास देण्यात आले होते. यामध्ये खरीप हंगामासाठी १७६९ कोटी ४६ लाखांचा लक्ष्यांक होते. या तुलनेत एक लाख ६० हजार ९४० शेतकऱ्यांना १२९५ कोटी ४३ लाख रुपयांचे वाटप बँकांनी केले. ही ७४ टक्केवारी आहे. यामध्ये जिल्हा बँकेने ३९३ कोटी ३३ लाख, राष्ट्रीयकृत बँकांनी ८८८ कोटी ५० लाख व ग्रामीण बँकेद्वारा १३ कोटी ६० लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. रबी हंगामासाठी ३८६ कोटी २२ लाख रुपयांचे लक्ष्यांक जिल्ह्यास होते. यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना २५८ कोटी ६४ लाखांचे लक्ष्यांक असताना १ मार्चपर्यंत ४,८३१ शेतकऱ्याना ११५ कोटी ८१ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले. जिल्हा सहकारी बँकेस १२५ कोटी ४२ लाखांचे व ग्रामीण बँकांना १६ कोटीचे लक्षांक असताना या दोन्ही बँकांचे कर्जवाटप निरंक आहे. असे आहे राष्ट्रीयकृत बँकेचे रबी कर्ज वाटप यंदाच्या हंगामात अलाहाबाद बँकेने ३.९५ कोटी, आंध्रा बँकेने ३५ लाख, बँक आॅफ बडोदा ५६ लाख, बँक आॅफ इंडिया ५.८९ कोटी, बँक आॅफ महाराष्ट्र २०.११ कोटी , कॅनरा बँक १.३५ कोटी, सेंट्रल बँक २१.२५कोटी, कारर्पोरेशन बँक ४० लाख, देना बँक ७.८१ कोटी, आयडीबीआय बँक १.७८ कोटी, इंडियन बँक १.८६ कोटी, इंडियन ओव्हरसीज बँक ६८ लाख, पंजाब नॅशनल बँक १.८कोटी, स्टेट बँक २३.२१ कोटीचे वाटप केले.