शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

यंदा ४० हजार हेक्टरने रबीची क्षेत्रवाढ

By admin | Updated: October 22, 2015 00:09 IST

यंदाच्या रबी हंगामात जिल्ह्यात २ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे.

२ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र : सर्वाधिक दीड लाख हेक्टरमध्ये हरभरालोकमत विशेषअमरावती : यंदाच्या रबी हंगामात जिल्ह्यात २ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. गतवर्षीच्या १ लाख ७४ हजार ६९७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ३९ हजार ३०३ हेक्टर इतकी क्षेत्रवाढ आहे. यामध्ये ७५ टक्के हेक्टर हरभऱ्याचे विक्रमी क्षेत्र असून ६० हजार क्षेत्रात गहू राहणार आहे. खरिपाचा हंगाम कमी पावसामुळे महिनाभर माघारला होता. त्यामुळे रबीचा हंगाम देखील उशिराने सुरू झाला आहे. सद्यस्थितीत २० हजार हेक्टरमध्ये रबीची पेरणी झाली आहे. यंदा कृषी विभागाद्वारे अमरावती तालुक्यात १५ हजार ३०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. चांदूररेल्वे १० हजार ६० हेक्टर, धामणगाव २५ हजार ६०० हेक्टर, नांदगाव खंडेश्वर १४ हजार ६३० हेक्टर, भातकुली तालुक्यात १२ हजार ६७० हेक्टर, मोर्शी तालुक्यात १२ हजार ४०० हेक्टर, वरूड तालुक्यात १६ हजार ५१० हेक्टर, तिवसा १४ हजार ५७० हेक्टर, चांदूरबाजार १२ हजार ७७० हेक्टर, अचलपूर १३ हजार ७०० हेक्टर, दर्यापूर २८ हजार ७६० हेक्टर, अंजनगाव सुर्जी १२ हजार १३० हेक्टर, धारणी १७ हजार ५०० हेक्टर व चिखलदरा तालुक्यात ७ हजार ४०० हेक्टर रबीचे क्षेत्र आहे. रबीसाठी १ लाख ४८ हजार ८९० हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. मागील वर्षी ६१ हजार ८५३ हेक्टर क्षेत्रात गव्हाची पेरणी करण्यात आली होती. हरभऱ्याचे १ लाख १० हजार ५६९ हेक्टर क्षेत्र होते. ईतर २ हजार २७५ हेक्टर क्षेत्र असे १ लाख ७४ हजार ६९७ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. यंदा रबीच्या २ लाख १४ हजार हेक्टरचे नियोजन आहे. ६० हजार हेक्टरमध्ये गहू, दीड लाखमध्ये हरभरा व ४ हजार हेक्टरमध्ये ईतर पिके राहणार आहेत. ६० हजारात हेक्टरमध्ये गहूजिल्ह्यात यंदा ६० हजार हेक्टर क्षेत्रात गहू पीक राहणार आहे. सर्वाधिक १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्र धामणगाव तालुक्यात आहे. खारपाण पट्टा असणाऱ्या दर्यापूर तालुक्यात ५०० हेक्टरमध्ये सोयाबीन राहणार आहे. अशी होणार क्षेत्रवाढयंदा रबीच्या हंगामात गतवर्षीच्या तुलनेत ३९ हजार ३०३ हेक्टरने क्षेत्रवाढ होत आहे. यामध्ये अमरावती ६ हजार ७८० हेक्टर, चांदूररेल्वे ३५७८, धामणगाव ४६५१, नांदगाव ४८६२, भातकुली ४७२६, मोर्शी ४२३९, वरूड ५८४७, तिवसा ४१४८, चांदूरबाजार ४२९१, चांदूरबाजार ६२६६, अंजनगाव ५३८६, दर्यापूर ८१६८, धारणी २८२४ व चिखलदरा तालुक्यात २७८६ हेक्टर क्षेत्र वाढणार आहे. दर्यापुरात सर्वाधिक हरभरा क्षेत्रयंदा दीड लाख हेक्टरमध्ये हरभऱ्याचे क्षेत्र प्रस्तावित आहे. यामध्ये दर्यापूर तालुक्यात सर्वाधिक २८ हजार हेक्टरमध्ये हरभरा राहणार आहे. चिखलदरा तालुक्यात सर्वात कमी ४ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे.