शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

डेंग्यूचा डास आढळल्यास घरमालकांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST

अमरावती : काही दिवसांपासून वातावरणातील बदल व त्यासाठी नागरिकांनी केलेल्या उपाययोजनांची संधी साधून डेंग्यूच्या साथीने डोकेवर काढले ...

अमरावती : काही दिवसांपासून वातावरणातील बदल व त्यासाठी नागरिकांनी केलेल्या उपाययोजनांची संधी साधून डेंग्यूच्या साथीने डोकेवर काढले आहे. ज्या नागरिकांच्या घरी लार्व्हा डेंग्यूचा डास आढळून येईल, त्या घरमालकांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे.

सध्या पावसाळा सुरू असला तरी उकाड्यामुळे नागरिकांनी बंद केलेले कूलर पुन्हा बाहेर काढले आहे. त्यामुळे टपात साचलेल्या पाण्यात लारव्हा तयार होऊन डेंग्यूच्या डासांसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन त्याची पैदास वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे सीईओ अविश्यांत पंडा यांनी आरोग्य विभागाकडून लेखाजोखा जाणून घेतला. यासंदर्भात हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय ज्या तीन तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण आढळले तेथे आरोग्य यंत्रणा अलर्ट ठेवण्याचे निर्देश सीईओंनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहे. साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांसदर्भात सूचनाही दिल्या आहेत. सध्या शहरासह ग्रामीण भागातील तिवसा तालुक्यातील गुरुदेवनगर, चिखलदरा तालुक्यातील आमझरी अचलपूर तालुक्यातील चमक या तीन गावात डेंग्यूचे २५ पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहे. याशिवाय धारणी, भातकुली व इतर भागात तीनशेवर रुग्ण आढळले आहेत. या सर्व एलायझा रुग्णांची चाचणी केल्यानंतर आरोग्य यंत्रणेने त्यांना डेंग्यू झाल्याचे घोषित केले. त्यामुळे ग्रामीण भागात हा आजार आणखी वाढू नये म्हणून खबरदारी घेण्याच्या सूचना सीईओंनी दिल्या आहेत.

बॉक्स

या ठिकाणी आढळतो डेंग्यूचा डास

डेंग्यूचा डास हा स्वच्छ पाण्यात निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस पाळावा, सायकल, वाहनांच्या टायरमध्ये पाणी जमा होऊ देऊ नये, कूलरचे पाणी नियमित बदलावे किंवा कूलर शक्यतो बंद ठेवावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

बॉक्स

बीडीओंना सूचना

साथीचे आजार जुलै, ऑगस्ट महिन्यात बहुधा होतात. त्यामुळे प्रत्येक गावात स्वच्छता पाळण्यासाठी पंचायत समितीमार्फत ग्रामसेवकांना सूचना दिल्या आहेत. अशातच आता डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याने सर्व गटविकास अधिकारी (बीडीओ) यांना लेखी सूचना देऊन कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. लारव्हा सापडल्या दंडात्मक कारवाईच्या सूचना सीईओंच्या मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी दिले आहे.