शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

By admin | Updated: December 3, 2015 00:16 IST

कृषि विभागाच्या क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत किड सर्वेक्षक व किड नियंत्रक यांचे सर्वेक्षणामध्ये तुर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या (हेलिकोव्हर्पा) या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

नवे संकट : किडीचे व्यवस्थापन करणे गरजेचेअमरावती : कृषि विभागाच्या क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत किड सर्वेक्षक व किड नियंत्रक यांचे सर्वेक्षणामध्ये तुर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या (हेलिकोव्हर्पा) या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. वातावरणातील सततच्या बदलामुळे हा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने किडीचे व्यवस्थापन करने गरजेचे आहे.जिल्ह्यात आंतरपीक म्हणून मोठ्या प्रमाणात तुरीचे पिक घेतल्या जाते. यंदाच्या हंगामात ९८ हजार ८९८ हेक्टर क्षेत्रात तुरीचे पिक आहे. खरीपाचे सोयाबीन पावसाअभावी उध्वस्त झाले. कपाशीवर लाल्याचा प्रकोप आहे. अशास्थितीत तूर पिकाची आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र वातावरणातील बदल, वाढलेले उष्ण तापमान व थंडीचा अभाव यामुळे तुर पिकांवर मोठ्या प्रमाणात किड व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सततच्या बदलत्या वातावरणामुळे सध्या तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव झाला आहे. ह्या किडीचा प्रादूर्भाव तुरीचे पिक कळी अवस्थेत आल्यावर होत असतो. त्यामुळे या अवस्थेत किडीचे व्यवस्थापन करने महत्वाचे आहे. या करीता हेक्टरी १० कामगंध सापळे पिकात उभावरावेत यामुळे शेंगा पोखरणाऱ्या हिरव्या अळीचे सर्वेक्षण करता येते व काही प्रमाणात नियंत्रण करण्यास मदत होते. तसेच पक्ष्यांसाठी हेक्टरी २० पक्षीथांबे उभारावेत जेणे करुन पक्षी पक्षीथांब्यावर बसून अळी खातो व यामुळे देखील काही प्रमाणात अळीचे नियंत्रण करता येते.असे करावे व्यवस्थापनक्विनालफॉस २५ इ.सी. २० मिली, इमामेक्टीन बेझांइट ५ टक्के एस.सी. ४.४ ग्राम इंडोक्सीकार्ब १४.५ टक्के एस.सी. ६.६ मीली, क्लोरॅनट्रेनिलीप्रोल १८.५ टक्के, एस.सी. उमीली यापैकी कोणतेही एक किटकनाशक १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे क्रॉपसॅप प्रकल्पाचे किड नियंत्रक गजानन महल्ले, वैशाली वानखडे तसेच प्रादेशिक संशोधन केंद्राचे योगेश इंगळे यांनी सांंिगतले.फवारणी करताना अशी घ्यावी काळजीफवारणी करताना एकाच किटकनाशकाची फवारणी लागोपाठ करु नये. किटकनाशकाचा वापर आलटून- पालटून करावा, फवारणीकरीता पाणी स्वच्छ वापरावे, प्रथम द्रावण भांड्यात तयार करुन मग फवारणी करीता वापरावे, चांगल्या परिणामाकरिता द्रावणात स्टिकरचा वापर करावा, असा सल्ला कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ के.पी.सिंग यांनी दिला आहे.