शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

आय.पी.डी.एस.मधील प्रलंबित कामाला तात्काळ निधी उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:13 IST

पान ४ बॉटम आज आवश्यक ऊर्जामंत्र्यांचे निर्देश, शहरातील वीजविषयक प्रश्नांवर माजी मंत्री सुनील देशमुख यांची व्हीसीद्वारे चर्चाअमरावती : शहरात ...

पान ४ बॉटम आज आवश्यक

ऊर्जामंत्र्यांचे निर्देश, शहरातील वीजविषयक प्रश्नांवर माजी मंत्री सुनील देशमुख यांची व्हीसीद्वारे चर्चाअमरावती : शहरात राबविण्यात आलेल्या एकात्मिक ऊर्जा विकास योजना (आयपीडीएस) अंतर्गत प्रलंबित कामाला आवश्यक २.३१ कोटींचा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश डॉ. राऊत यांनी महावितरणला दिले. याबाबत माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी त्यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वाद साधून मागणी केली.

डॉ. सुनील देशमुख यांनी केलेल्या मागणीवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी एक बैठक ऊर्जामंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. ऊर्जामंत्र्यांच्या निर्देशानंतर महावितरणच्या अंतर्गत निधीतून २.३१ कोटींची तरतूद या प्रकल्पासाठी केली जाईल, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. या बैठकीला महावितरणचे संचालक प्रकल्प भालचंद्र खंडाईत, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, ऊर्जा सचिव दिनेश वाघमारे हे उपस्थित होते, तर डॉ. सुनील देशमुख,

अमरावती परिमंडळाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे, दीपक देवहाते, कार्यकारी अभियंता आनंद काटकर, भारतभूषण औगड हे आभासी पद्धतीने बैठकीला उपस्थित होते. अमरावती शहरात एकात्मिक ऊर्जा विकास योजना राबविण्यात आली. ८४.७० कोटी रुपयांच्या या योजनेत ३३ केव्हीची दसरा मैदान व शंकर नगर येथे दोन उपकेंद्रे कार्यान्वित करण्यात आली तसेच या योजनेंतर्गत १८५ किमी उच्च दाब व ११० किमी लघुदाब वाहिन्या भूमिगत करण्यात आल्या आहेत. १०५ किमीची एरियल बंच केबल टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले. परंतु, भूमिगत झालेल्या वाहिन्यांवरील ओवरहेड लाईन काढण्याचे व भूमिगत वाहिनी चार्ज करण्याचे काम समाविष्ट नसल्याने एकात्मिक ऊर्जा विकास योजनेचे काम पूर्ण होऊनही भूमिगत वाहिन्या चार्ज करण्यात आल्या नव्हत्या.

दरम्यान, जिल्हा नियोजन व महावितरणच्या प्रत्येकी ५० लाख निधीतून काही भागात भूमिगत वीजवाहिनी वापरात आणली आहे. परंतु, उर्वरित कामासाठी २.३१ कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याने सदर निधी उपलब्ध करून देण्याबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी अमरावती शहरातील वीजविषयक प्रश्नांवर चर्चा करून वितरण हानी कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.