शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

ऊर्ध्व वर्धा कार्यालयाचा प्रस्ताव धूळ खात

By admin | Updated: May 24, 2015 00:35 IST

जुना धामणगावसह सहा कार्यालये सिंचन कार्यालय म्हणून घोषित करण्यात यावे, यासाठी अप्पर वर्धा ..

उदासीनता : सहा उपविभागांना हवा सिंचन कार्यालयांचा दर्जाधामणगाव रेल्वे : जुना धामणगावसह सहा कार्यालये सिंचन कार्यालय म्हणून घोषित करण्यात यावे, यासाठी अप्पर वर्धा विभागाच्या अधीक्षक अभियंत्याला मागील १० वर्षांपूर्वी प्रस्ताव मागितला असताना अद्यापही हा प्रस्ताव शासनाला पाठविला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़मध्य विदर्भातील अमरावती जिल्ह्यासाठी अप्पर वर्धा प्रकल्प भाग्यलक्ष्मी ठरावा म्हणून तब्बल १३७६़६४ कोटी रुपयांमध्ये हा प्रकल्प ८४ किलो मीटर अंतरात विस्तारला आहे? जुना धामणगाव येथे सन १९८१ मध्ये उर्ध्व वर्धा विभाग क्रमांक तीनची स्थापना करण्यात आली़ आसेगाव, देवगाव, मंगरूळ दस्तगीर, धामणगाव, शेंदूरजना खुर्द असे पाच उपविभाग त्यावेळी तयार करण्यात आले़ उपविभागीय अभियंता, पाच शाखा अभियंता, पाच तांत्रीक सहाय्यक, एक वरिष्ठ लिपिक, एक कनिष्ठ लिपिक, शिपाई, मजूर वर्ग असे प्रत्येक उपविभागीय कार्यालयांना कर्मचारी देण्यात आले होते.अंजनसिंगी ते रायपूर कासारखेडा, भातकुलीपर्यंत उर्ध्व वर्धा कालव्याचा परिसर येतो. १९९८ पासून या भागाला सिंचनाचे पाणी मिळत आहे़ खरीप हंगामात सोयाबीन, कपाशी हे पीक घेतल्यानंतर तालुक्यातील शेतकरी रबी हंगामात गहू व हरभरा ही पिके घेतात. मागील दहा वर्षांत परिसरातील शेतकरी दोन पिके एका वर्षात घेत आहे. आर्थिक स्थिती मजबूत होत असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीत येत असलेल्या गहू, हरबऱ्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते़धामणगाव रेल्वे तालुक्यात अनेक गावातील शेतकरी हे अप्पर वर्धाच्या कालव्याचे पाणी शेतीसाठी वापरतात. या पाण्याच्या भरवशावर येथील शेतकरी रबीचे पीक घेतात. दरवर्षी खरिपातील सोयाबीनचे पीक निघाल्यानंतर हरभरा किंवा गव्हाची पेरणी येथे करण्यात येते. जुना धामणगाव विभागाचा कारभार सुरळीत सुरू असताना सर्वात प्रथम शेंदूरजनाखुर्द येथील उपविभागीय कार्यालय अमरावती येथे हलवून उर्ध्व वर्धा विभाग क्र मांक एक ला जोडण्यात आले़ मागील तीन वर्षांपासून येथील जुना धामणगाव विभागीय कार्यालयाला निधी देण्यात आला नाही़ उलट धामणगाव परिसरात झालेल्या कालव्याच्या दुरूस्ती करण्याचे काम दुसरीकडे वळविण्यात आले आहे़ परिसरातील अनेक कालवे व पाटचऱ्यांची साफसफाई करण्यात आली नसल्याने हे पाणी थेट वाहत नाही. त्यामुळे कालव्याची साफसफाई होणे गरजेचे आहे. धामणगाव तालुक्यातील अनेक कालव्यांची थातूर-मातूर डागडूजी करण्यात आली आहे. परंतु कायमस्वरुपी दुरुस्तीसाठी निधीच नसल्याने हे काम रखडले आहे. जुना धामणगाव येथील विभागीय कार्यालयासाठी सत्तारुढ भाजपा सरकारने निधी द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)कृती आराखड्यात ७८ ते ८० कर्मचारी हवेतजुना धामणगाव अंतर्गत येणाऱ्या उपविभागात केवळ शाखा अभियंता कामकाज पाहत असून कालव्याचे पाणी सोडल्यानंतर या शाखा अभियंत्याची मोठी कसरत होते़ सिंचन क्षेत्र मोठे असल्याने अनेक शेतकऱ्यांची नाराजी ओढावून घ्यावे लागते़ त्यात कनिष्ठ अभियंता व तांत्रिक सहायक यांची पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत़ जर जुना धामणगाव विभाग मेंन्टनन्स म्हणजे सिंचन कार्यालय म्हणून घोषित झाले तर शाखा अभियंता, कालवे निरीक्षक, लिपिक, मजूर यांच्यासह कृती आराखड्याप्रमाणे प्रत्येक कार्यालयात ७८ ते ८० कर्मचारी शासनाला नियुक्त करावे लागणार आहे़ आतातरी प्रशासनाने शासनाला पत्र व्यवहार करून जुना धामणगाव कार्यालय म्हणून सिंचन कार्यालय घोषित करावे किंवा अनेक उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी पाठ पुरावा करावा, अशी मागणी होत आहे.सिंचन कार्यालयाचे भिजतघोंगडे जुना धामणगाव येथील कार्यालयाच्या क्षेत्रातील कालव्याचे काम पूर्ण झाल्याने हे कार्यालय मेंटेनन्स म्हणून घोषित करून अधिक कर्मचाऱ्यांचा भरणा करण्यासंदर्भात अधीक्षक अभियंता यांना शासनाने सन २००५ मध्ये माहिती मागविली होती़ विशेषत: नेरपिंगळाई, मोर्शी, तिवसा, देवगाव, तळेगाव, जुना धामणगाव हे विभागाचे कार्यालय सिंचन कार्यालय म्हणून घोषित करण्यात यावे, असे या पत्रात नमूद केले होते़ परंतु तत्कालीन अधीक्षक अभियंत्यांनी शासनाला ही माहिती पाठविली नसल्याने सिंचन कार्यालयाचे भिजतघोंगडे आजपर्यंत असेच राहिले आहेत़