शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
3
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
4
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
5
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
6
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
7
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
8
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
9
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
10
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
11
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
12
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
13
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
14
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
15
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
16
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
17
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
18
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
19
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
20
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना

कौशल्य विकासावर आधारित मनुष्यबळ निर्मितीमुळे देशाची प्रगती

By admin | Updated: April 12, 2015 00:33 IST

भारत आज जगामध्ये सर्वात तरुण असलेला देश आहे. ..

सिपना अभियांत्रिकीत परिसंवाद : मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादनअमरावती : भारत आज जगामध्ये सर्वात तरुण असलेला देश आहे. जगाचे सरासरी आयुर्मान वृद्धत्वाकडे झुकत असताना आपल्या देशात मात्र ते तरूण होत आहे. या तरूण पिढीची कौशल्य विकासावर आधारित मनुष्यबळ निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यामुळे देशाची प्रगती वेगाने होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले. येथील सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कै. अरविंद ऊर्फ भाऊ अनंत लिमये सभागृहात ‘तंत्रज्ञानाच्या कौशल्य विकासावर होणारा परिणाम’ या विषयावर दोन दिवसीय ४६ व्या मिड टर्म परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादाचे उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दि इन्स्टीट्यूट आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्सच्या अध्यक्ष स्मृती डागर, टीपीपीसीचे अध्यक्ष एम. एच. कोरी, जे. डब्ल्यू. बाकल, पी. के. जागिया, अजय ठाकरे, एस. ए. लढके आदी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमस्थळी पालकमंत्री प्रवीण पोटे, माजी मंत्री जगदीश गुप्ता, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार अनिल बोंडे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते आदी उपस्थित होते. जगामध्ये आपल्या देशात तरुणांची असलेली सर्वात जास्त संख्या ही एक संधी असून या संधीचे रुपांतर देशापुढील आव्हाने यशस्वीपणे पेलण्यासाठी करावे, असे आवाहन करीत मुख्यमंत्री म्हणाले, समाजातील बहुतांश टक्का आज कार्यरत असणाऱ्या वयोगटात मोडतो. या गटाचे कौशल्य विकासावर आधारित मनुष्यबळ निर्मितीमध्ये रुपांतर केल्यास आपला देश विकसित होण्यास विलंब लागणार नाही. या कौशल्य विकासासाठी उच्च शिक्षणाची आवश्यकता आहे. तरूण लोकसंख्येला पुरेल एवढ्या उच्च शिक्षणाची व्यवस्था आपणाकडे असली पाहिजे, तरच कौशल्य विकासावर आधारित मनुष्यबळ निर्माण होऊ शकेल. ही लोकसंख्या रोजगारक्षम असणार आहे, असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाच्या वेळी स्मृती डागर यांनी भाषणातून आय. ई. टी. ई. या संस्थेच्या कार्याचा मागोवा घेतला. तसेच कोरी, लढके यांनीही याप्रसंगी आपले विचार मांडले. प्रास्ताविक अजय ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. संचालन डिखू खालसा व राखी गुप्ता यांनी तर आभार प्रदर्शन जे. डब्ल्यू. बाकल यांनी केले.युवकांनो, देशसेवेसाठी पुढे या...केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन जीवनाचे सार्थक होत नाही. कौशल्य विकासावर आधारित ज्ञान घेऊन युवकांनी देशसेवेसाठी पुढे यावे, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.