शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्य विकासावर आधारित मनुष्यबळ निर्मितीमुळे देशाची प्रगती

By admin | Updated: April 12, 2015 00:33 IST

भारत आज जगामध्ये सर्वात तरुण असलेला देश आहे. ..

सिपना अभियांत्रिकीत परिसंवाद : मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादनअमरावती : भारत आज जगामध्ये सर्वात तरुण असलेला देश आहे. जगाचे सरासरी आयुर्मान वृद्धत्वाकडे झुकत असताना आपल्या देशात मात्र ते तरूण होत आहे. या तरूण पिढीची कौशल्य विकासावर आधारित मनुष्यबळ निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यामुळे देशाची प्रगती वेगाने होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले. येथील सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कै. अरविंद ऊर्फ भाऊ अनंत लिमये सभागृहात ‘तंत्रज्ञानाच्या कौशल्य विकासावर होणारा परिणाम’ या विषयावर दोन दिवसीय ४६ व्या मिड टर्म परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादाचे उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दि इन्स्टीट्यूट आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्सच्या अध्यक्ष स्मृती डागर, टीपीपीसीचे अध्यक्ष एम. एच. कोरी, जे. डब्ल्यू. बाकल, पी. के. जागिया, अजय ठाकरे, एस. ए. लढके आदी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमस्थळी पालकमंत्री प्रवीण पोटे, माजी मंत्री जगदीश गुप्ता, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार अनिल बोंडे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते आदी उपस्थित होते. जगामध्ये आपल्या देशात तरुणांची असलेली सर्वात जास्त संख्या ही एक संधी असून या संधीचे रुपांतर देशापुढील आव्हाने यशस्वीपणे पेलण्यासाठी करावे, असे आवाहन करीत मुख्यमंत्री म्हणाले, समाजातील बहुतांश टक्का आज कार्यरत असणाऱ्या वयोगटात मोडतो. या गटाचे कौशल्य विकासावर आधारित मनुष्यबळ निर्मितीमध्ये रुपांतर केल्यास आपला देश विकसित होण्यास विलंब लागणार नाही. या कौशल्य विकासासाठी उच्च शिक्षणाची आवश्यकता आहे. तरूण लोकसंख्येला पुरेल एवढ्या उच्च शिक्षणाची व्यवस्था आपणाकडे असली पाहिजे, तरच कौशल्य विकासावर आधारित मनुष्यबळ निर्माण होऊ शकेल. ही लोकसंख्या रोजगारक्षम असणार आहे, असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाच्या वेळी स्मृती डागर यांनी भाषणातून आय. ई. टी. ई. या संस्थेच्या कार्याचा मागोवा घेतला. तसेच कोरी, लढके यांनीही याप्रसंगी आपले विचार मांडले. प्रास्ताविक अजय ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. संचालन डिखू खालसा व राखी गुप्ता यांनी तर आभार प्रदर्शन जे. डब्ल्यू. बाकल यांनी केले.युवकांनो, देशसेवेसाठी पुढे या...केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन जीवनाचे सार्थक होत नाही. कौशल्य विकासावर आधारित ज्ञान घेऊन युवकांनी देशसेवेसाठी पुढे यावे, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.