शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
4
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
5
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
6
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
7
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
8
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
10
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
11
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
12
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
13
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
14
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
15
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
16
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
17
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
18
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
19
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
20
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

अमरावती जिल्ह्यात युरोपीय निकषांप्रमाणे विषमुक्त डाळिंबाचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 14:48 IST

तिवसा तालुक्यातील कुºहा या गावाचे युवा शेतकरी सचिन देशमुख यांनी आपल्या शेतात सलग दुसऱ्या वर्षी विषमुक्त (रेसिड्यू फ्री) डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे. ही फळे युरोपीय निकष (नॉर्म्स) नुसार असल्याचा अहवाल नागपूर येथील प्रयोगशाळेने दिला आहे.

ठळक मुद्देशेतकरी ते थेट ग्राहक विक्री सुरू अभियंता ते शेतकरी झालेल्या युवकाच्या प्रयत्नांना यश

रितेश नारळे ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तिवसा तालुक्यातील कुऱ्हा या गावाचे युवा शेतकरी सचिन देशमुख यांनी आपल्या शेतात सलग दुसऱ्या वर्षी विषमुक्त (रेसिड्यू फ्री) डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे. ही फळे युरोपीय निकष (नॉर्म्स) नुसार असल्याचा अहवाल नागपूर येथील प्रयोगशाळेने दिला आहे.सचिन देशमुख यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर २५ वर्षे मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी केली. भरपूर वेळ विदेशवारीत गेला. पण, ठरावीक वयानंतर शेती करायची, हा त्यांचा निश्चय होता. यामुळे गलेलठ्ठ पगाराची नोकरीला सोडून जन्मगावी शेती करण्यास आले. त्यांनी २०१४ साली घरच्या तीन एकर शेतात दोन हजार डाळिंबाची झाडे लावली. २०१७ ला पहिल्याच प्रयत्नात युरोपीय नियमानुसार फळे मिळवण्यात ते यशस्वी ठरले. अशा विषमुक्त फळांना युरोपीय बाजारपेठांमध्ये मागणी राहते.विदेशात रसायनयुक्त शेतीला थारा नसल्याचे निरीक्षण सचिन देशमुख यांनी युरोपीय वास्तव्यात नोंदवले होते. त्यामुळे स्थानिकांना अशी फळे उपलब्ध करण्याचे ध्येय त्यांनी निश्चित केले. यंदा २०१८ मध्ये एक हजार झाडांवर फळे घेतली आणि ती प्रयोगशाळेने रेसिड्यू फ्री असल्याचे अहवाल दिला आहे. त्यांना नाशिक येथील डाळिंब उत्पादक व अभ्यासक बाळासाहेब म्हैसकर मार्गदर्शन करतात. यावर्षी हजार झाडांवर तीन लाखांचा खर्च झाला असून, सात लाखांचे उत्पादन मिळण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीडाळिंबाचे उत्पादन व्यापाऱ्यांला न विकता सचिन देशमुख हे स्वत: मार्केटिंग करतात. त्यांच्याशी संपर्क करून हवी तेवढी फळे होम डिलिव्हरीने मागवता येतात. त्यांच्या या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमरावती, नागपूर, पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळूर आदी शहरांमध्ये त्यांनी डाळिंब कुरियर केले आहेत. काही मेट्रो शहरांत सेंद्रिय फळ, भाजी मॉलसोबत बोलणी झाली असून, तेथेही माल पाठवित आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा विक्रीसाठी वापरव्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक, इन्स्टाग्राम आदी साधनांचा वापर विक्रीसाठी केला जातो. दिवसेन्दिवस त्यांच्याकडील सेंद्रिय डाळिंबाची मागणी वाढत चालली आहे. डाळिंब तोडणे, पॅकिंग यामधून चार कामगारांना कायमस्वरूपी रोजगार दिला आहे.

टॅग्स :agricultureशेती