शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

अमरावती जिल्ह्यात युरोपीय निकषांप्रमाणे विषमुक्त डाळिंबाचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 14:48 IST

तिवसा तालुक्यातील कुºहा या गावाचे युवा शेतकरी सचिन देशमुख यांनी आपल्या शेतात सलग दुसऱ्या वर्षी विषमुक्त (रेसिड्यू फ्री) डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे. ही फळे युरोपीय निकष (नॉर्म्स) नुसार असल्याचा अहवाल नागपूर येथील प्रयोगशाळेने दिला आहे.

ठळक मुद्देशेतकरी ते थेट ग्राहक विक्री सुरू अभियंता ते शेतकरी झालेल्या युवकाच्या प्रयत्नांना यश

रितेश नारळे ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तिवसा तालुक्यातील कुऱ्हा या गावाचे युवा शेतकरी सचिन देशमुख यांनी आपल्या शेतात सलग दुसऱ्या वर्षी विषमुक्त (रेसिड्यू फ्री) डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे. ही फळे युरोपीय निकष (नॉर्म्स) नुसार असल्याचा अहवाल नागपूर येथील प्रयोगशाळेने दिला आहे.सचिन देशमुख यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर २५ वर्षे मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी केली. भरपूर वेळ विदेशवारीत गेला. पण, ठरावीक वयानंतर शेती करायची, हा त्यांचा निश्चय होता. यामुळे गलेलठ्ठ पगाराची नोकरीला सोडून जन्मगावी शेती करण्यास आले. त्यांनी २०१४ साली घरच्या तीन एकर शेतात दोन हजार डाळिंबाची झाडे लावली. २०१७ ला पहिल्याच प्रयत्नात युरोपीय नियमानुसार फळे मिळवण्यात ते यशस्वी ठरले. अशा विषमुक्त फळांना युरोपीय बाजारपेठांमध्ये मागणी राहते.विदेशात रसायनयुक्त शेतीला थारा नसल्याचे निरीक्षण सचिन देशमुख यांनी युरोपीय वास्तव्यात नोंदवले होते. त्यामुळे स्थानिकांना अशी फळे उपलब्ध करण्याचे ध्येय त्यांनी निश्चित केले. यंदा २०१८ मध्ये एक हजार झाडांवर फळे घेतली आणि ती प्रयोगशाळेने रेसिड्यू फ्री असल्याचे अहवाल दिला आहे. त्यांना नाशिक येथील डाळिंब उत्पादक व अभ्यासक बाळासाहेब म्हैसकर मार्गदर्शन करतात. यावर्षी हजार झाडांवर तीन लाखांचा खर्च झाला असून, सात लाखांचे उत्पादन मिळण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीडाळिंबाचे उत्पादन व्यापाऱ्यांला न विकता सचिन देशमुख हे स्वत: मार्केटिंग करतात. त्यांच्याशी संपर्क करून हवी तेवढी फळे होम डिलिव्हरीने मागवता येतात. त्यांच्या या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमरावती, नागपूर, पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळूर आदी शहरांमध्ये त्यांनी डाळिंब कुरियर केले आहेत. काही मेट्रो शहरांत सेंद्रिय फळ, भाजी मॉलसोबत बोलणी झाली असून, तेथेही माल पाठवित आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा विक्रीसाठी वापरव्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक, इन्स्टाग्राम आदी साधनांचा वापर विक्रीसाठी केला जातो. दिवसेन्दिवस त्यांच्याकडील सेंद्रिय डाळिंबाची मागणी वाढत चालली आहे. डाळिंब तोडणे, पॅकिंग यामधून चार कामगारांना कायमस्वरूपी रोजगार दिला आहे.

टॅग्स :agricultureशेती