शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

अमरावती जिल्ह्यात युरोपीय निकषांप्रमाणे विषमुक्त डाळिंबाचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 14:48 IST

तिवसा तालुक्यातील कुºहा या गावाचे युवा शेतकरी सचिन देशमुख यांनी आपल्या शेतात सलग दुसऱ्या वर्षी विषमुक्त (रेसिड्यू फ्री) डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे. ही फळे युरोपीय निकष (नॉर्म्स) नुसार असल्याचा अहवाल नागपूर येथील प्रयोगशाळेने दिला आहे.

ठळक मुद्देशेतकरी ते थेट ग्राहक विक्री सुरू अभियंता ते शेतकरी झालेल्या युवकाच्या प्रयत्नांना यश

रितेश नारळे ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तिवसा तालुक्यातील कुऱ्हा या गावाचे युवा शेतकरी सचिन देशमुख यांनी आपल्या शेतात सलग दुसऱ्या वर्षी विषमुक्त (रेसिड्यू फ्री) डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे. ही फळे युरोपीय निकष (नॉर्म्स) नुसार असल्याचा अहवाल नागपूर येथील प्रयोगशाळेने दिला आहे.सचिन देशमुख यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर २५ वर्षे मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी केली. भरपूर वेळ विदेशवारीत गेला. पण, ठरावीक वयानंतर शेती करायची, हा त्यांचा निश्चय होता. यामुळे गलेलठ्ठ पगाराची नोकरीला सोडून जन्मगावी शेती करण्यास आले. त्यांनी २०१४ साली घरच्या तीन एकर शेतात दोन हजार डाळिंबाची झाडे लावली. २०१७ ला पहिल्याच प्रयत्नात युरोपीय नियमानुसार फळे मिळवण्यात ते यशस्वी ठरले. अशा विषमुक्त फळांना युरोपीय बाजारपेठांमध्ये मागणी राहते.विदेशात रसायनयुक्त शेतीला थारा नसल्याचे निरीक्षण सचिन देशमुख यांनी युरोपीय वास्तव्यात नोंदवले होते. त्यामुळे स्थानिकांना अशी फळे उपलब्ध करण्याचे ध्येय त्यांनी निश्चित केले. यंदा २०१८ मध्ये एक हजार झाडांवर फळे घेतली आणि ती प्रयोगशाळेने रेसिड्यू फ्री असल्याचे अहवाल दिला आहे. त्यांना नाशिक येथील डाळिंब उत्पादक व अभ्यासक बाळासाहेब म्हैसकर मार्गदर्शन करतात. यावर्षी हजार झाडांवर तीन लाखांचा खर्च झाला असून, सात लाखांचे उत्पादन मिळण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीडाळिंबाचे उत्पादन व्यापाऱ्यांला न विकता सचिन देशमुख हे स्वत: मार्केटिंग करतात. त्यांच्याशी संपर्क करून हवी तेवढी फळे होम डिलिव्हरीने मागवता येतात. त्यांच्या या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमरावती, नागपूर, पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळूर आदी शहरांमध्ये त्यांनी डाळिंब कुरियर केले आहेत. काही मेट्रो शहरांत सेंद्रिय फळ, भाजी मॉलसोबत बोलणी झाली असून, तेथेही माल पाठवित आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा विक्रीसाठी वापरव्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक, इन्स्टाग्राम आदी साधनांचा वापर विक्रीसाठी केला जातो. दिवसेन्दिवस त्यांच्याकडील सेंद्रिय डाळिंबाची मागणी वाढत चालली आहे. डाळिंब तोडणे, पॅकिंग यामधून चार कामगारांना कायमस्वरूपी रोजगार दिला आहे.

टॅग्स :agricultureशेती