शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

वैरणाची समस्या ऐरणीवर; १० लाखांवर पशुधन धोक्यात

By admin | Updated: July 6, 2014 23:37 IST

गेल्या हंगामात खरिपाचे सडलेले सोयाबीन, अकाली पाऊस व गारपिटीमुळे उध्वस्त झालेला गहू, हरभरा आणि काळवंडलेली तूर यामुळे जिल्ह्यात सहा महिन्यांपूर्वीच जनावरांच्या चाऱ्याची

अमरावती : गेल्या हंगामात खरिपाचे सडलेले सोयाबीन, अकाली पाऊस व गारपिटीमुळे उध्वस्त झालेला गहू, हरभरा आणि काळवंडलेली तूर यामुळे जिल्ह्यात सहा महिन्यांपूर्वीच जनावरांच्या चाऱ्याची चणचण भासू लागली होती. यंदाचा हंगाम सुरू होताच महिनाभरापासून पाऊस गायब असल्याने जनावरांसाठी हिरवा चाराच उपलब्ध नाही. शेतकऱ्यांच्या गोठ्यात बेगमी केलेले कुटारही नाही. जंगलात हिरवा चारा अन् पाणीटंचाईमुळे जिल्ह्यातील लाखावर पशुधन धोक्यात आले आहे. प्राणापलिकडे जपलेले, कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सांभाळलेले पशुधन डोळ्यांसमोर उपाशी मरताना पाहण्याचे दुर्भाग्य यंदा बळीराजाच्या वाट्याला येते की काय, अशी स्थिती आहे. ‘ह्या नभाने ह्या भूईला दान द्यावेआणि ह्या मातीतूनी चैतन्य गावे।कोणती पुण्ये अशी येती फळालाजोंधळ्याला चांदणे लखडूनी जावे।।अशा प्रकारे शेतकरी माऊलीला आर्जव करू लागला आहे. खरीप २०१३ च्या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांचे कंबरडे आधीच मोडले.जिल्ह्यात शासनाच्या दत्तक ग्राम कामधेनू योजनेचे पशुधन देखील धोक्यात आले आहे. जनावरासाठी चारा उपलब्ध होणे महत्वाचे आहे. पावसामुळे वैरण सडले असताना सुध्दा कृषी विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. वैरण विकास कार्यक्रम यापूर्वीच राबविला असता तर जनावरांसाठी पौष्टीक हिरवा चारा उपलब्ध झाला असता. तुर्तास शेतीपूरक दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळेच गायी, म्हशी, बैलजोड्या विक्रीसाठी येत आहेत. जिल्ह्यातील लाखांवर पशुधनाला लागणाऱ्या वैरणापैकी ६० टक्के वैरण सोयाबीनची मळणी झाल्यानंतर निघणाऱ्या कुटारातून मिळते. परंतु मागील हंगामात सोयाबीन व नंतर रबीचा गहू, हरभरा सडल्यामुळे जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वैरणाची समस्या असताना निकृष्ट वैरणावर युरीया प्रक्रिया करून ते वैरण पौष्टीक बनविण्यासाठी कुठलेही प्रयत्न कृषी विभागाने केलेले नाहीत. पशुसंवर्धन विभाग देखील कुंभकर्णी झोपेत आहे. वैरण विकास कार्यक्रमासोबतच वैरण प्रक्रिया कार्यक्रम राबविला असता तर वैरणाची पौष्टीकता १६ टक्क्यांनी वाढून अधिकतम प्रथिनेयुक्त चारा जनावरांना उपलब्ध झाला असता.जनावरांची प्रकृती सुदृढ राहण्यासाठी, दुभत्या जनावरांपासून अधिक उत्पन्न मिळण्यासाठी तसेच गाई, बैल, म्हशींच्या शरीरांची समाधानकारक वाढ होण्यासाठी त्यांचा आहार समतोल असणे महत्वाचे असते. मात्र, सध्या हिरवा चाराही नाही किंवा शेतकऱ्यांनी साठवणूक केलेले सोयाबीन, तूर, हरभरा व गहू यांचे कुटारही नाही. त्यामुळे वैरणाअभावी पशुधन धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. पावसाने महिन्यापासून दडी मारल्याने खरीप २०१४ चा हंगाम आधीच अडचणीत आला आहे. त्यामध्ये आता वैरणाची समस्या समोर उभी ठाकल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पशुधन वाचविण्याची कसरत बळीराजा करीत आहे