शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

पालकमंत्र्यांच्या नाकर्तेपणानेच समस्या चिघळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:45 IST

खुद्द मुख्यमंत्रीच सूत्रे हलवित असताना जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने ज्यांची पालकत्वाची जबाबदारी आहे, ते प्रवीण पोटे पाटील जिल्ह्यात असतानासुद्धा आदिवासी प्रकल्पग्रस्तांना भेटले नाहीत. त्यांच्या नाकर्तेपणानेच ही समस्या चिघळली.

ठळक मुद्देरवि राणा : वनपट्ट्यांऐवजी महसूल जमीन अन् प्रत्येक सज्ञानाला १० लाख, प्रशासनाने सोडला सुटकेचा नि:श्वास

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खुद्द मुख्यमंत्रीच सूत्रे हलवित असताना जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने ज्यांची पालकत्वाची जबाबदारी आहे, ते प्रवीण पोटे पाटील जिल्ह्यात असतानासुद्धा आदिवासी प्रकल्पग्रस्तांना भेटले नाहीत. त्यांच्या नाकर्तेपणानेच ही समस्या चिघळली. अखेर मुख्यमंत्र्यांनी फोन करून काम फत्ते करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली. अधिकाऱ्यांच्या सहकार्याने बुधवारी मध्यरात्रीनंतर आम्ही आदिवासींना स्थलांतरित केले, अशी माहिती आ. रवि राणा यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच ऐतिहासिक निर्णय घेतला. व्याघ्र प्रकल्पात ज्या आदिवासी प्रकल्पग्रस्तांचे वनजमिनीचे पट्टे होते, त्या बदल्यात आता महसूल विभागाची जमीन त्यांना देण्यात येणार आहे. याविषयी लवकरच शासननिर्णय जारी होणार आहे. प्रकल्पग्रस्तांची इच्छा अमरावती जिल्ह्यातच राहण्याची असल्याने त्यांना चिखलदरा व धारणी तालुक्यात या जमिनी देण्यात येणार आहेत. यासंदर्भात प्रशासनातील सर्व संबंधित अधिकाºयांची लवकरच बैठक होईल. याव्यतिरिक्त प्रकल्पग्रस्त कुटुंबातील १८ वर्षांवरील सदस्यांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्यात येतील. या प्रमुख दोन मागण्यांसह अन्य मागण्यांवरदेखील सहानुभूतीपूर्वक विचार केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे. प्रशासनाने १५ बसगाड्यांची व्यवस्था केली होती. आदिवासी प्रकल्पग्रस्त १५ दिवसांपासून पुन्हा संरक्षित क्षेत्रात परतले असल्याची बाब वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दडवून ठेवली होती, अशीही माहिती राणा यांनी दिली. माहिती मिळताच आदिवासींच्या न्यायासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी व अन्य वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यासह सीसीएफ, डीएफओ, एसडीओ, तहसीलदार आदींची भूमिकाही महत्त्वपूर्ण होती, अशी माहिती राणा यांनी दिली.यासंबंधाने पालकमंत्र्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रियेसाठी नकार दिला. खासदारांचा संपर्क होऊ शकला नाही.खासदारांचा शोध सुरूराणा म्हणाले, १५ दिवसांपासून जिवावर उदार होऊन आदिवासी जंगलात आंदोलन करीत आहेत. या बांधवांनी खासदारांना भरभरून मते दिलीत. त्यांना मात्र या प्रकल्पग्रस्तांची भेटही घ्यावीशी वाटली नाही. खासदारांचा शोध सुरू आहे. पालकमंत्र्यांनाही शोधले पाहिजे. या मंडळींनी जराही संवेदनशीलता शिल्लक असेल, तर निदान आता तरी प्रकल्यग्रस्तांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवावे.पटेलांचा अप्रत्यक्ष सहभागचराजकुमार पटेल यांच्याशी मुख्यमंत्र्यांचा संवाद झाला. माझ्याशी व जिल्हाधिकाºयांशीदेखील त्यांचा संवाद अन् चर्चा झाली. न्यायालयीन प्रकरणामुळे त्यांनी चर्चेत प्रत्यक्ष सहभाग टाळला असल्याचे आ. राणा यांनी सांगितले. पटेलांनी या प्रकरणात शासनाला सहकार्यच केले आहे. पालकमंत्री व खासदारांकडून जे सहकार्य अपेक्षित होते, ते झाले नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाजिल्हाधिकाऱ्यांची कमालीची चिकाटीजिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी या प्रकरणात कमालीची चिकाटी दाखविली. अत्यंत संयम, पोटतिडीक व सकारात्मकपणे त्यांनी हे प्रकरण हाताळले. शासनासोबत सात्यत्याने पाठपुरावा केला. आदिवासी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनात तोडगा निघावा व ते जंगलातून सुखरूप जावेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्वतोपरी प्रयत्न झालेत. रात्री २ वाजताही ते आदिवासींशी संवाद साधत होते, अशी माहिती आ.राणा यांनी दिली.