शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

बहुजनांच्या अस्मिता बनल्या तुरूंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 21:22 IST

बहुजन समाज व नेत्यांना एकत्र येण्यासाठी धार्मिक अस्मितेची मोठी बाधा ठरत आहे. त्यांच्या अस्मिता या तुरूंग बनल्या आहेत. या अस्मितेने आमच्यातील माणुसकी मारली. हजारो वर्षे आपली हानी याच अस्मितेने केली. जाती धर्माच्या अस्मितेसाठी आम्ही महापुरूषांना वाटून घेतले, अशी टीका ज्येष्ठ साहित्यीक डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.

ठळक मुद्देयशवंत मनोहर : कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बहुजन समाज व नेत्यांना एकत्र येण्यासाठी धार्मिक अस्मितेची मोठी बाधा ठरत आहे. त्यांच्या अस्मिता या तुरूंग बनल्या आहेत. या अस्मितेने आमच्यातील माणुसकी मारली. हजारो वर्षे आपली हानी याच अस्मितेने केली. जाती धर्माच्या अस्मितेसाठी आम्ही महापुरूषांना वाटून घेतले, अशी टीका ज्येष्ठ साहित्यीक डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.मातोश्री विमलबाई देशमुख सभागृहात नवव्या कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन कामगार नंदू नेतनवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर साहित्यिक उत्तम कांबळे, भालचंद्र कानगो, नरेशचंद्र ठाकरे उपस्थित होते.मनोहर म्हणाले, खोटारडेपणा, पोरकटपणा करणारे जर सत्तेत पुन्हा २०१९ निवडून आले तर ते फक्त आपल्या बौद्धिक दुर्बलतेमुळेच शक्य होईल. २०१९ हे तुमचे, माझे मृत्यू वर्ष ठरेल. बहुजनांना धार्मिक अस्मिता बाजुला सारून सत्तेसाठी एकत्र यावे लागेल. हेच या संमेलनाचे फलित असेल. २०१४ मध्ये त्यांची सत्ता येण्याचे कारण म्हणजे आम्ही बौद्धिक दृष्ट्या पांगळे झालो होतो. हे पांगळेपण त्यावेळी हा माझा नेता, ही माझी जात, हा माझा धर्म, हा माझा पक्ष या संकुचित अस्मितेमुळेच आले होते. ते आता पुन्हा होता कामा नये, यासाठी बहुजनांनी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक काशीनाथ बुºहाटे, संचालन प्रसेजित तेलन यांनी केले. आभार विजय रोडगे यांनी मानले.दलितांमधील मार्क्सवाद्यांबद्दलची तेढ अनाकलनीयमार्क्सवादी आणि कम्युनिस्ट पक्षांनी इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत दलितांच्या हिताची नेहमीच बाजू घेतली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक आंदोलनात, मोर्चात डाव्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. कम्युनिस्टांवरील खटले बाबासाहेब लढले. असा इतिहास असतानाही दलित आणि मार्क्सवादी यांच्या असलेली तेढ मात्र अनाकलनीय आहे, असे प्रतिपादन विचारवंत उद्धव कांबळे यांनी केले. संमेलनाच्या उद्घाटन सत्रानंतर ‘आंबेडकर आणि मार्क्स : नवे आकलन, नव्या दिशा’ या विषयावर उद्धव कांबळे यांचे विशेष व्याख्यान पार पडले. यावेळी अमरावती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यांकन विभागाचे माजी संचालक, सिनेट सदस्य बी. आर. वाघमारे अध्यक्षस्थानी होते.