शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बहुजनांच्या अस्मिता बनल्या तुरूंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 21:22 IST

बहुजन समाज व नेत्यांना एकत्र येण्यासाठी धार्मिक अस्मितेची मोठी बाधा ठरत आहे. त्यांच्या अस्मिता या तुरूंग बनल्या आहेत. या अस्मितेने आमच्यातील माणुसकी मारली. हजारो वर्षे आपली हानी याच अस्मितेने केली. जाती धर्माच्या अस्मितेसाठी आम्ही महापुरूषांना वाटून घेतले, अशी टीका ज्येष्ठ साहित्यीक डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.

ठळक मुद्देयशवंत मनोहर : कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बहुजन समाज व नेत्यांना एकत्र येण्यासाठी धार्मिक अस्मितेची मोठी बाधा ठरत आहे. त्यांच्या अस्मिता या तुरूंग बनल्या आहेत. या अस्मितेने आमच्यातील माणुसकी मारली. हजारो वर्षे आपली हानी याच अस्मितेने केली. जाती धर्माच्या अस्मितेसाठी आम्ही महापुरूषांना वाटून घेतले, अशी टीका ज्येष्ठ साहित्यीक डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.मातोश्री विमलबाई देशमुख सभागृहात नवव्या कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन कामगार नंदू नेतनवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर साहित्यिक उत्तम कांबळे, भालचंद्र कानगो, नरेशचंद्र ठाकरे उपस्थित होते.मनोहर म्हणाले, खोटारडेपणा, पोरकटपणा करणारे जर सत्तेत पुन्हा २०१९ निवडून आले तर ते फक्त आपल्या बौद्धिक दुर्बलतेमुळेच शक्य होईल. २०१९ हे तुमचे, माझे मृत्यू वर्ष ठरेल. बहुजनांना धार्मिक अस्मिता बाजुला सारून सत्तेसाठी एकत्र यावे लागेल. हेच या संमेलनाचे फलित असेल. २०१४ मध्ये त्यांची सत्ता येण्याचे कारण म्हणजे आम्ही बौद्धिक दृष्ट्या पांगळे झालो होतो. हे पांगळेपण त्यावेळी हा माझा नेता, ही माझी जात, हा माझा धर्म, हा माझा पक्ष या संकुचित अस्मितेमुळेच आले होते. ते आता पुन्हा होता कामा नये, यासाठी बहुजनांनी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक काशीनाथ बुºहाटे, संचालन प्रसेजित तेलन यांनी केले. आभार विजय रोडगे यांनी मानले.दलितांमधील मार्क्सवाद्यांबद्दलची तेढ अनाकलनीयमार्क्सवादी आणि कम्युनिस्ट पक्षांनी इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत दलितांच्या हिताची नेहमीच बाजू घेतली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक आंदोलनात, मोर्चात डाव्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. कम्युनिस्टांवरील खटले बाबासाहेब लढले. असा इतिहास असतानाही दलित आणि मार्क्सवादी यांच्या असलेली तेढ मात्र अनाकलनीय आहे, असे प्रतिपादन विचारवंत उद्धव कांबळे यांनी केले. संमेलनाच्या उद्घाटन सत्रानंतर ‘आंबेडकर आणि मार्क्स : नवे आकलन, नव्या दिशा’ या विषयावर उद्धव कांबळे यांचे विशेष व्याख्यान पार पडले. यावेळी अमरावती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यांकन विभागाचे माजी संचालक, सिनेट सदस्य बी. आर. वाघमारे अध्यक्षस्थानी होते.