शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

बहुजनांच्या अस्मिता बनल्या तुरूंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 21:22 IST

बहुजन समाज व नेत्यांना एकत्र येण्यासाठी धार्मिक अस्मितेची मोठी बाधा ठरत आहे. त्यांच्या अस्मिता या तुरूंग बनल्या आहेत. या अस्मितेने आमच्यातील माणुसकी मारली. हजारो वर्षे आपली हानी याच अस्मितेने केली. जाती धर्माच्या अस्मितेसाठी आम्ही महापुरूषांना वाटून घेतले, अशी टीका ज्येष्ठ साहित्यीक डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.

ठळक मुद्देयशवंत मनोहर : कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बहुजन समाज व नेत्यांना एकत्र येण्यासाठी धार्मिक अस्मितेची मोठी बाधा ठरत आहे. त्यांच्या अस्मिता या तुरूंग बनल्या आहेत. या अस्मितेने आमच्यातील माणुसकी मारली. हजारो वर्षे आपली हानी याच अस्मितेने केली. जाती धर्माच्या अस्मितेसाठी आम्ही महापुरूषांना वाटून घेतले, अशी टीका ज्येष्ठ साहित्यीक डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.मातोश्री विमलबाई देशमुख सभागृहात नवव्या कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन कामगार नंदू नेतनवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर साहित्यिक उत्तम कांबळे, भालचंद्र कानगो, नरेशचंद्र ठाकरे उपस्थित होते.मनोहर म्हणाले, खोटारडेपणा, पोरकटपणा करणारे जर सत्तेत पुन्हा २०१९ निवडून आले तर ते फक्त आपल्या बौद्धिक दुर्बलतेमुळेच शक्य होईल. २०१९ हे तुमचे, माझे मृत्यू वर्ष ठरेल. बहुजनांना धार्मिक अस्मिता बाजुला सारून सत्तेसाठी एकत्र यावे लागेल. हेच या संमेलनाचे फलित असेल. २०१४ मध्ये त्यांची सत्ता येण्याचे कारण म्हणजे आम्ही बौद्धिक दृष्ट्या पांगळे झालो होतो. हे पांगळेपण त्यावेळी हा माझा नेता, ही माझी जात, हा माझा धर्म, हा माझा पक्ष या संकुचित अस्मितेमुळेच आले होते. ते आता पुन्हा होता कामा नये, यासाठी बहुजनांनी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक काशीनाथ बुºहाटे, संचालन प्रसेजित तेलन यांनी केले. आभार विजय रोडगे यांनी मानले.दलितांमधील मार्क्सवाद्यांबद्दलची तेढ अनाकलनीयमार्क्सवादी आणि कम्युनिस्ट पक्षांनी इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत दलितांच्या हिताची नेहमीच बाजू घेतली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक आंदोलनात, मोर्चात डाव्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. कम्युनिस्टांवरील खटले बाबासाहेब लढले. असा इतिहास असतानाही दलित आणि मार्क्सवादी यांच्या असलेली तेढ मात्र अनाकलनीय आहे, असे प्रतिपादन विचारवंत उद्धव कांबळे यांनी केले. संमेलनाच्या उद्घाटन सत्रानंतर ‘आंबेडकर आणि मार्क्स : नवे आकलन, नव्या दिशा’ या विषयावर उद्धव कांबळे यांचे विशेष व्याख्यान पार पडले. यावेळी अमरावती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यांकन विभागाचे माजी संचालक, सिनेट सदस्य बी. आर. वाघमारे अध्यक्षस्थानी होते.