शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

जमिनीची आरोग्यपत्रिका तयार

By admin | Updated: December 4, 2015 00:38 IST

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४०० गावांमधील १७ हजार ७४७ मृद नमुन्यांची कृषी विभागाद्वारा तपासणी पूर्ण करण्यात आली.

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान : १७,७४७ मृद नमुन्यांची तपासणीअमरावती : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४०० गावांमधील १७ हजार ७४७ मृद नमुन्यांची कृषी विभागाद्वारा तपासणी पूर्ण करण्यात आली. या नमुन्यांच्या आरोग्यपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. जागतिक मृददिनाचे औचित्य साधून ५ डिसेंबर रोजी या पत्रिकांचे वितरण भातकुली येथे होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावांचे शेतीयोग्य मृद आरोग्य परीक्षण करणे जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेऊन पीकनिहाय खताच्या मात्रांची शिफारस करणे व सर्व शेतकऱ्यांना प्रत्येक तीन वर्षांनी त्यांच्या जमिनीची मृद आरोग्यपत्रिका उपलब्ध करणे, हा राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाचा उद्देश आहे. माती हे वनस्पतींच्या वाढीसाठी अन्नद्राव्यांचा पुरवठा करणारे सजीव नैसर्गिक माध्यम आहे. या नैसर्गिक साधन सामग्रीच्या व्यवस्थापनासाठी मृद परीक्षण हे खताचा वापर व व्यवस्थापनासह सहकार्य करणारा एक भाग आहे. जमिनीचे आरोग्य टिकविणे. पर्यायाने जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म टिकविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या मृद आरोग्य परीक्षणात जमिनीचे रासायनिक गुणधर्म स्थिती, प्रमुख अन्नद्रव्ये व सूक्ष्म मूलद्रव्ये कमतरता स्थितीची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरण, मृद नमुने काढण्यासाठी प्रशिक्षण, शिफारशीनुसार अन्नद्रव्यांच्या वापरास आर्थिक सहाय्य क्षमतावृध्दी, नियमित संनियंत्रण व मूल्यमापन हे घटक अपेक्षित आहेत. तसेच मृद विश्लेषणामध्ये जमिनीची क्षारता, सेंद्रिय कर्ब, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये यामध्ये तांबे, लोह, मंगल व जस्त या घटकांची तपासणी करण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)