शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
3
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
4
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
5
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
6
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
7
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
8
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
9
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
10
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
11
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
12
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
13
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
14
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
15
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
16
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
17
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
18
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
19
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४११ गावांचा स्वच्छता आराखडा तयार

By admin | Updated: June 20, 2016 00:02 IST

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ४११ गावांच्या स्वच्छताविषयक कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.

उपक्रम : जिल्हा परिषदेच्या पाणी, स्वच्छता मिशनचा पुढाकारअमरावती : जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ४११ गावांच्या स्वच्छताविषयक कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्याच्या माध्यमातून संबंधित गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. त्यानुसार आतापर्यंत ५० गावांचा कृती आराखडा तयार करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे लोकसहभागातून स्वच्छतेच्या कामांना गती दिली जात आहे. ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे यासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील चवदाही तालुक्यांतील ४११ गावांमध्ये स्वच्छतेसह हागणदारी निर्मूलन कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्यात निवडण्यात आलेल्या गावांत जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन आणि संबंधित पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी प्रबोधन सुरू केले आहे. यासाठी पंचायत समिती, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे. जुलैअखेरपर्यंत सर्वच गावांचा आराखडा तयार करण्यात येऊन ग्रामस्थांना स्वच्छतेसाठी प्रेरित केले जाणार आहे. यासाठी संबंधित गावांचे सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नागरिकांची मदत घेतली जात आहे. गावातील भौगोलिक स्थितीचा नकाशा तयार करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)प्रत्येकांवर जबाबदारीकृती आराखड्यानुसार गावात कोणती कामे करायची, हे निश्चित केले जाते. शिवाय गावाची लोकसंख्या व कुटुंबसंख्या गृहित धरली जाते. त्यामुळे स्वच्छतेच्या कामाची गती कशी असावी, याची कल्पना येते. शिवाय प्रत्यक्षात स्वच्छतेला कुठून सुरुवात करायची यावर चर्चा होईल. गावातील प्रत्येक घटकावर स्वच्छतेची जबाबदारी निश्चित करण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागात या मोहिमेला बळ मिळणार आहे.