शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

जिल्ह्यात ४११ गावांचा स्वच्छता आराखडा तयार

By admin | Updated: June 20, 2016 00:02 IST

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ४११ गावांच्या स्वच्छताविषयक कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.

उपक्रम : जिल्हा परिषदेच्या पाणी, स्वच्छता मिशनचा पुढाकारअमरावती : जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ४११ गावांच्या स्वच्छताविषयक कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्याच्या माध्यमातून संबंधित गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. त्यानुसार आतापर्यंत ५० गावांचा कृती आराखडा तयार करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे लोकसहभागातून स्वच्छतेच्या कामांना गती दिली जात आहे. ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे यासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील चवदाही तालुक्यांतील ४११ गावांमध्ये स्वच्छतेसह हागणदारी निर्मूलन कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्यात निवडण्यात आलेल्या गावांत जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन आणि संबंधित पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी प्रबोधन सुरू केले आहे. यासाठी पंचायत समिती, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे. जुलैअखेरपर्यंत सर्वच गावांचा आराखडा तयार करण्यात येऊन ग्रामस्थांना स्वच्छतेसाठी प्रेरित केले जाणार आहे. यासाठी संबंधित गावांचे सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नागरिकांची मदत घेतली जात आहे. गावातील भौगोलिक स्थितीचा नकाशा तयार करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)प्रत्येकांवर जबाबदारीकृती आराखड्यानुसार गावात कोणती कामे करायची, हे निश्चित केले जाते. शिवाय गावाची लोकसंख्या व कुटुंबसंख्या गृहित धरली जाते. त्यामुळे स्वच्छतेच्या कामाची गती कशी असावी, याची कल्पना येते. शिवाय प्रत्यक्षात स्वच्छतेला कुठून सुरुवात करायची यावर चर्चा होईल. गावातील प्रत्येक घटकावर स्वच्छतेची जबाबदारी निश्चित करण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागात या मोहिमेला बळ मिळणार आहे.