शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचार्‍यांनी केली शेतकर्‍यांची फसवणूक

By admin | Updated: May 27, 2014 23:23 IST

शेतीचे विद्युत कनेक्शन देण्यासाठी विद्युत कर्मचार्‍याने पदाचा दुरुपयोग करुन घाटलाडकी येथील शेतकर्‍याजवळून रितसर रकमेचा भरणा करुन अवैधरीत्या शुल्क वसूल करुन

चांदूरबाजार : शेतीचे विद्युत कनेक्शन देण्यासाठी विद्युत कर्मचार्‍याने पदाचा दुरुपयोग करुन घाटलाडकी येथील शेतकर्‍याजवळून रितसर रकमेचा भरणा करुन अवैधरीत्या शुल्क वसूल करुन त्यांना विद्युत कनेक्शन दिले. परंतु कनेक्शन मिळून दोन वर्षांचा अवधी झाल्यावरही शेतकर्‍याला कृषी पंपाचे विद्युत देयक मिळाले नाही. शेतकर्‍यांची दिशाभूल करणार्‍या कर्मचार्‍यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍याने केली आहे.

घाटलाडकी येथील मोतीराम धोंडूजी डोमाळे या शेतकर्‍याने कृषी पंपासाठी वीज पुरवठा मिळण्यासाठी रितसर अर्ज केला होता. परंतु शेतकर्‍याच्या अज्ञानाचा फायदा घेत वीज कंपनीत लाईनमन पदावर कार्यरत असलेले रामहरी भगवान चरपे यांनी मोतीराम धोंडुजी डोमाळे यांना वीज कनेक्शनसाठी १५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर १८ ऑक्टोबर २0१२ रोजी शेतात कृषी पंपाचे कनेक्शन दिले. परंतु तेव्हापासून तर आजपर्यंंत त्या शेतकर्‍याला विद्युत वितरण कंपनीकडून कृषी पंपाचे बिल देण्यात आले नाही.

बिल येत नसल्याची सूचना शेतकरी मोतीराम डोमाळे यांनी वीज कंपनीला केली होती. परंतु तक्रारीचा काहीच फायदा झाला नाही.

तक्रारकर्ता मोतीराम डोमाळे यांनी वीज कर्मचारी रामहरी भगवान चरपे हे विद्युत कार्यालयातून सेवानवृत्त झाले. त्यानंतर ते वीज कंपनीतील ओळखीचा फायदा घेऊन ठेकेदार म्हणून गावात काम करतात तसेच काही विहिरींना पाणी नाही, काही विहिरींचा शेतकरी उपयोग घेत नाही अशा विद्युत पोल तार खोदून काढून नेतात. ज्या शेतकर्‍यास गरज आहे अशा शेतकर्‍यांचे पैसे घेऊन त्यांना विद्युत कनेक्शन देत असल्याची तक्रार मोतीराम डोमाडे यांनी संबंधित कार्यालयाला दिली आहे.

अवैधरीत्या शेतीचे विद्युत कनेक्शन देणारे रामहरी भगवान चरपे यांच्या नातेवाईकांना कशा प्रकारचे विद्युत कनेक्शन देण्यात आले त्या सर्वांंची कार्यालयामार्फत चौकशी करुन गैरअर्जदारांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारासुध्दा मोतीरामजी डोमाडे यांचे चिरंजीव दशरथ मोतीराम डोमाडे यांनी राज्य विद्युत वितरण कंपनीला दिला आहे. तक्रारीच्या प्रतिलिपी संबंधित कार्यालयाला देण्यात आल्या आहेत. शेतकर्‍याच्या या इशार्‍यामुळे विद्युत कंपनीतील कर्मचार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. शहर प्रतिनिधी )