शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

साहित्यिकांच्या शब्दात बंदुकीची शक्ती

By admin | Updated: November 30, 2014 22:56 IST

साहित्यिकांना बंदूक घेण्याची गरज नाही, त्यांच्या शब्दातच ती शक्ती असते. बंदूक घेणाऱ्यांना धैर्य देण्याचे काम ते करत असतात, असे मत सुप्रसिध्द भागवतकार किशोरजी व्यास यांनी व्यक्त केले.

किशोरजी व्यास : स्व. राम शेवाळकरांच्या स्मारकाचे लोकार्पणअचलपूर : साहित्यिकांना बंदूक घेण्याची गरज नाही, त्यांच्या शब्दातच ती शक्ती असते. बंदूक घेणाऱ्यांना धैर्य देण्याचे काम ते करत असतात, असे मत सुप्रसिध्द भागवतकार किशोरजी व्यास यांनी व्यक्त केले.येथील माळवेशपुऱ्यातील शेवाळकर सभागृहात साहित्यिक राम शेवाळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण किशोरजी व्यास यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृष्णाशास्त्री आर्वीकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून स्वानंद पुंड, अधिव्यख्याता किशोर फुले उपस्थित होते. किशोरजी व्यास हे आपल्या भाषणात भावविवश झाले होते. ते म्हणाले की, याच ठिकाणी मी भागवत कथेवर प्रवचन करीत होतो. ते श्रोता म्हणून ऐकत होते. ते सात दिवस आनंदाचे होते. इतक्या लवकर हा प्रसंग येईल, असे वाटत नव्हते. परंतु स्थित प्रज्ञेप्रमाणे परमेश्वर जे करेल ते पहावे लागते. नानासाहेब (राम शेवाळकर) पूज्य साहित्यिक होते. महान परंपरेचे पाईक होते. हे त्यांच्या नसातच नव्हते, तर त्यांच्या डीएनएतही होते. नानासाहेब मोठे व्यक्ते होते. मोठे साहित्यिक होते हे मान्य, पण ते स्वच्छ माणूस होते. त्यांचा एक पैलू म्हणजे सत्य व संस्कृती यासाठी ते ठाम होते.वेळ पडेल तेव्हा साहित्यिकांनी आक्रमक व्हावे, याचे उदाहरण देताना व्यास म्हणाले की, मुंबईच्या एका नेत्याने जेव्हा साहित्यिकाविषयी अनुद्गार काढले तेव्हा दुसऱ्याच दिवशी नानासाहेब उपाख्य राम शेवाळकरांनी शासनाने दिलेला पुरस्कार परत केला. तेव्हा ऐन दिवाळीच्या दिवशी कांची कोठीच्या शंकराचार्यांना अटक करण्यात आली. तेव्हा त्याचा निषेध करण्यासाठी नागपूरच्या रस्त्यावर झालेल्या आंदोलनात ते अग्रस्थानी होते. असे सत्याकरिता, धर्मासाठी नीतीमूल्य जोपासणारे साहित्यिक फार कमी आहेत. नानासाहेब गुणांची खाण होते. आपले सद्गुण कोठे वापरावे हा विवेक लागतो, तो त्यांच्यात होता. समाजातील वातावरण बदलण्यासाठी साहित्यिकांची फळी निर्माण करण्यासाठी त्यांनी एक तशी फळी उभी केली आहे. त्यांचा महाभारताचा व्यासंग व संस्कृत भाषेचे पांडित्य असे ते चालते-बोलते विद्यापीठ होते. भाषणातून त्यांनी नानासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. नानासाहेब शब्दप्रभू- किशोर फुलेकिशोर फुले म्हणाले, त्यांच्या जगण्यातून महाराष्ट्रात सुगंध पसरला. शब्दांचा सामर्थ्य असणारे ते शब्दप्रभू होते. त्यांच्या शब्दांना रांगोळीची जोड नव्हती, जगण्याची ओढ होती.