शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

साहित्यिकांच्या शब्दात बंदुकीची शक्ती

By admin | Updated: November 30, 2014 22:56 IST

साहित्यिकांना बंदूक घेण्याची गरज नाही, त्यांच्या शब्दातच ती शक्ती असते. बंदूक घेणाऱ्यांना धैर्य देण्याचे काम ते करत असतात, असे मत सुप्रसिध्द भागवतकार किशोरजी व्यास यांनी व्यक्त केले.

किशोरजी व्यास : स्व. राम शेवाळकरांच्या स्मारकाचे लोकार्पणअचलपूर : साहित्यिकांना बंदूक घेण्याची गरज नाही, त्यांच्या शब्दातच ती शक्ती असते. बंदूक घेणाऱ्यांना धैर्य देण्याचे काम ते करत असतात, असे मत सुप्रसिध्द भागवतकार किशोरजी व्यास यांनी व्यक्त केले.येथील माळवेशपुऱ्यातील शेवाळकर सभागृहात साहित्यिक राम शेवाळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण किशोरजी व्यास यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृष्णाशास्त्री आर्वीकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून स्वानंद पुंड, अधिव्यख्याता किशोर फुले उपस्थित होते. किशोरजी व्यास हे आपल्या भाषणात भावविवश झाले होते. ते म्हणाले की, याच ठिकाणी मी भागवत कथेवर प्रवचन करीत होतो. ते श्रोता म्हणून ऐकत होते. ते सात दिवस आनंदाचे होते. इतक्या लवकर हा प्रसंग येईल, असे वाटत नव्हते. परंतु स्थित प्रज्ञेप्रमाणे परमेश्वर जे करेल ते पहावे लागते. नानासाहेब (राम शेवाळकर) पूज्य साहित्यिक होते. महान परंपरेचे पाईक होते. हे त्यांच्या नसातच नव्हते, तर त्यांच्या डीएनएतही होते. नानासाहेब मोठे व्यक्ते होते. मोठे साहित्यिक होते हे मान्य, पण ते स्वच्छ माणूस होते. त्यांचा एक पैलू म्हणजे सत्य व संस्कृती यासाठी ते ठाम होते.वेळ पडेल तेव्हा साहित्यिकांनी आक्रमक व्हावे, याचे उदाहरण देताना व्यास म्हणाले की, मुंबईच्या एका नेत्याने जेव्हा साहित्यिकाविषयी अनुद्गार काढले तेव्हा दुसऱ्याच दिवशी नानासाहेब उपाख्य राम शेवाळकरांनी शासनाने दिलेला पुरस्कार परत केला. तेव्हा ऐन दिवाळीच्या दिवशी कांची कोठीच्या शंकराचार्यांना अटक करण्यात आली. तेव्हा त्याचा निषेध करण्यासाठी नागपूरच्या रस्त्यावर झालेल्या आंदोलनात ते अग्रस्थानी होते. असे सत्याकरिता, धर्मासाठी नीतीमूल्य जोपासणारे साहित्यिक फार कमी आहेत. नानासाहेब गुणांची खाण होते. आपले सद्गुण कोठे वापरावे हा विवेक लागतो, तो त्यांच्यात होता. समाजातील वातावरण बदलण्यासाठी साहित्यिकांची फळी निर्माण करण्यासाठी त्यांनी एक तशी फळी उभी केली आहे. त्यांचा महाभारताचा व्यासंग व संस्कृत भाषेचे पांडित्य असे ते चालते-बोलते विद्यापीठ होते. भाषणातून त्यांनी नानासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. नानासाहेब शब्दप्रभू- किशोर फुलेकिशोर फुले म्हणाले, त्यांच्या जगण्यातून महाराष्ट्रात सुगंध पसरला. शब्दांचा सामर्थ्य असणारे ते शब्दप्रभू होते. त्यांच्या शब्दांना रांगोळीची जोड नव्हती, जगण्याची ओढ होती.