शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

साहित्यिकांच्या शब्दात बंदुकीची शक्ती

By admin | Updated: November 30, 2014 22:56 IST

साहित्यिकांना बंदूक घेण्याची गरज नाही, त्यांच्या शब्दातच ती शक्ती असते. बंदूक घेणाऱ्यांना धैर्य देण्याचे काम ते करत असतात, असे मत सुप्रसिध्द भागवतकार किशोरजी व्यास यांनी व्यक्त केले.

किशोरजी व्यास : स्व. राम शेवाळकरांच्या स्मारकाचे लोकार्पणअचलपूर : साहित्यिकांना बंदूक घेण्याची गरज नाही, त्यांच्या शब्दातच ती शक्ती असते. बंदूक घेणाऱ्यांना धैर्य देण्याचे काम ते करत असतात, असे मत सुप्रसिध्द भागवतकार किशोरजी व्यास यांनी व्यक्त केले.येथील माळवेशपुऱ्यातील शेवाळकर सभागृहात साहित्यिक राम शेवाळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण किशोरजी व्यास यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृष्णाशास्त्री आर्वीकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून स्वानंद पुंड, अधिव्यख्याता किशोर फुले उपस्थित होते. किशोरजी व्यास हे आपल्या भाषणात भावविवश झाले होते. ते म्हणाले की, याच ठिकाणी मी भागवत कथेवर प्रवचन करीत होतो. ते श्रोता म्हणून ऐकत होते. ते सात दिवस आनंदाचे होते. इतक्या लवकर हा प्रसंग येईल, असे वाटत नव्हते. परंतु स्थित प्रज्ञेप्रमाणे परमेश्वर जे करेल ते पहावे लागते. नानासाहेब (राम शेवाळकर) पूज्य साहित्यिक होते. महान परंपरेचे पाईक होते. हे त्यांच्या नसातच नव्हते, तर त्यांच्या डीएनएतही होते. नानासाहेब मोठे व्यक्ते होते. मोठे साहित्यिक होते हे मान्य, पण ते स्वच्छ माणूस होते. त्यांचा एक पैलू म्हणजे सत्य व संस्कृती यासाठी ते ठाम होते.वेळ पडेल तेव्हा साहित्यिकांनी आक्रमक व्हावे, याचे उदाहरण देताना व्यास म्हणाले की, मुंबईच्या एका नेत्याने जेव्हा साहित्यिकाविषयी अनुद्गार काढले तेव्हा दुसऱ्याच दिवशी नानासाहेब उपाख्य राम शेवाळकरांनी शासनाने दिलेला पुरस्कार परत केला. तेव्हा ऐन दिवाळीच्या दिवशी कांची कोठीच्या शंकराचार्यांना अटक करण्यात आली. तेव्हा त्याचा निषेध करण्यासाठी नागपूरच्या रस्त्यावर झालेल्या आंदोलनात ते अग्रस्थानी होते. असे सत्याकरिता, धर्मासाठी नीतीमूल्य जोपासणारे साहित्यिक फार कमी आहेत. नानासाहेब गुणांची खाण होते. आपले सद्गुण कोठे वापरावे हा विवेक लागतो, तो त्यांच्यात होता. समाजातील वातावरण बदलण्यासाठी साहित्यिकांची फळी निर्माण करण्यासाठी त्यांनी एक तशी फळी उभी केली आहे. त्यांचा महाभारताचा व्यासंग व संस्कृत भाषेचे पांडित्य असे ते चालते-बोलते विद्यापीठ होते. भाषणातून त्यांनी नानासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. नानासाहेब शब्दप्रभू- किशोर फुलेकिशोर फुले म्हणाले, त्यांच्या जगण्यातून महाराष्ट्रात सुगंध पसरला. शब्दांचा सामर्थ्य असणारे ते शब्दप्रभू होते. त्यांच्या शब्दांना रांगोळीची जोड नव्हती, जगण्याची ओढ होती.