शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कापणीपश्चात सोयाबीनचे नुकसान; १७ हजार तक्रारी, ११ हजार प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 10:59 IST

Amravati : अतिवृष्टीने सोयाबीन भिजले; गंजींमध्ये पाणी शिरल्याने ओढवले संकट

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : परतीच्या पावसाने काढणीवर आलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. शिवाय फुटलेला कापूस भिजला व खराब झाला. त्यामुळे बाधित पिकांचे पंचनामे करून परतावा मिळावा, यासाठी पीक विमा कंपनीकडे १७,४७६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. कंपनीद्वारा आतापर्यंत ११ हजार पूर्वसूचनांचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत.

पीक कापणीपश्चात पावसाने नुकसान झाल्यास परतावा मिळण्याची तरतूद पीक विम्यामध्ये आहे. यासाठी पीक नुकसानीचे ७२ तासांच्या आत संबंधित पीक विमा कंपनी किंवा कृषी विभागाकडे याची पूर्वसूचना द्यावी लागते. शुक्रवारी परतीच्या पावसाने सोंगणी व मळणी झालेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. शिवाय गंजी भिजल्या. या सोयाबीनला कोंब फुटण्याची शक्यता आहे मागच्या हंगामापासून फक्त एक रुपयात शेतकऱ्यांना सहभाग घेता येत असल्याने यावर्षी उच्चांकी म्हणजेच ५.१० लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. यापूर्वी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले असल्याने एक लाखावर शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केल्या आहेत. आता अतिवृष्टीने पुन्हा कापणीपश्चात नुकसान झाल्याने १७ हजारांवर शेतकऱ्यांनी कंपनीकडे परताव्यासाठी अर्ज केले आहेत. 

कंपनीकडे दाखल तालुकानिहाय तक्रारी अचलपूर ८८८, अमरावती १,३०९, अंजनगाव सुर्जी १,७७६, भातकुली १,०२५, चांदूर रेल्वे १,१५१, चांदूरबाजार ९७७, चिखलदरा ७१, दर्यापूर १,०३३, धामणगाव रेल्वे ७५०, धारणी २२९, मोर्शी १,४३३, नांदगाव खंडेश्वर ६,२९१, तिवसा ३३७, वरुड २०६ अशा एकूण १७,४७६ शेतकऱ्यांनी कंपनीकडे पूर्वसूचना पीकविमा कंपन्यांकडे दाखल केल्या आहेत.

टॅग्स :SoybeanसोयाबीनfarmingशेतीFarmerशेतकरीAmravatiअमरावती