शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

कापणीपश्चात सोयाबीनचे नुकसान; १७ हजार तक्रारी, ११ हजार प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 10:59 IST

Amravati : अतिवृष्टीने सोयाबीन भिजले; गंजींमध्ये पाणी शिरल्याने ओढवले संकट

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : परतीच्या पावसाने काढणीवर आलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. शिवाय फुटलेला कापूस भिजला व खराब झाला. त्यामुळे बाधित पिकांचे पंचनामे करून परतावा मिळावा, यासाठी पीक विमा कंपनीकडे १७,४७६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. कंपनीद्वारा आतापर्यंत ११ हजार पूर्वसूचनांचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत.

पीक कापणीपश्चात पावसाने नुकसान झाल्यास परतावा मिळण्याची तरतूद पीक विम्यामध्ये आहे. यासाठी पीक नुकसानीचे ७२ तासांच्या आत संबंधित पीक विमा कंपनी किंवा कृषी विभागाकडे याची पूर्वसूचना द्यावी लागते. शुक्रवारी परतीच्या पावसाने सोंगणी व मळणी झालेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. शिवाय गंजी भिजल्या. या सोयाबीनला कोंब फुटण्याची शक्यता आहे मागच्या हंगामापासून फक्त एक रुपयात शेतकऱ्यांना सहभाग घेता येत असल्याने यावर्षी उच्चांकी म्हणजेच ५.१० लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. यापूर्वी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले असल्याने एक लाखावर शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केल्या आहेत. आता अतिवृष्टीने पुन्हा कापणीपश्चात नुकसान झाल्याने १७ हजारांवर शेतकऱ्यांनी कंपनीकडे परताव्यासाठी अर्ज केले आहेत. 

कंपनीकडे दाखल तालुकानिहाय तक्रारी अचलपूर ८८८, अमरावती १,३०९, अंजनगाव सुर्जी १,७७६, भातकुली १,०२५, चांदूर रेल्वे १,१५१, चांदूरबाजार ९७७, चिखलदरा ७१, दर्यापूर १,०३३, धामणगाव रेल्वे ७५०, धारणी २२९, मोर्शी १,४३३, नांदगाव खंडेश्वर ६,२९१, तिवसा ३३७, वरुड २०६ अशा एकूण १७,४७६ शेतकऱ्यांनी कंपनीकडे पूर्वसूचना पीकविमा कंपन्यांकडे दाखल केल्या आहेत.

टॅग्स :SoybeanसोयाबीनfarmingशेतीFarmerशेतकरीAmravatiअमरावती