शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
3
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
4
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
5
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
7
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
8
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
9
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
10
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
11
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
12
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
13
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
14
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
15
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
16
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
17
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
18
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
19
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
20
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट

मुख्य वनसंरक्षकांचे पद तीन महिन्यापासून रिक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:17 IST

नरेंद्र जावरे परतवाडा (अमरावती) : वनविभागातील मुख्यवनसंरक्षकांचे पद तीन महिन्यांपासून रिक्तच आहे, सध्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्याच्या बदल्यांच्या हंगामात प्रशासकीय अधिकाऱ्यांची ...

नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) : वनविभागातील मुख्यवनसंरक्षकांचे पद तीन महिन्यांपासून रिक्तच आहे, सध्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्याच्या बदल्यांच्या हंगामात प्रशासकीय अधिकाऱ्यांची चंगळ सुरू आहे. महत्वाचे पद रिक्त ठेवल्याने वनप्रशासनाचा कार्यभार ठप्प झालेला दिसून येते आहे.

विभागीय महसूल आयुक्ताच्या रँकचे मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक हे पद वनविभागात महत्त्वाचे मानल्या जाते. या कार्यालयातून वनविभागाचा कारभार चाललो. तत्कालीन मुख्यवनसंरक्षक डॉ. प्रवीण चव्हाण यांची पदोन्नती झाल्यानंतर जून महिन्यांपासून हे पद रिक्त आहे. या पदाचा तात्पुरता कार्यभार मेळघाट व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रसंचालक जयोती बॉनर्जी यांच्याकडे आहे. त्यासुद्धा उपवनसंरक्षक पदानंतर बढतीवर पुन्हा जिल्ह्याच्या ठिकाणी नव्याने आल्या आहेत. प्रादेशिक वनविभाग आणि व्याघ्र प्रकल्प सांभाळताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी प्रादेशिक वनविभागातून होणारे कामकाज ठप्प झालेले आहे.

बॉक्स

बदल्यांचे अधिकार, १० हजारांचा बॉंड चर्चेत

बदल्यांचे प्रस्ताव, यादी व बदली करण्याचे अधिकार उपवनसंरक्षक मुख्यालय यांना मिळाल्याने त्यांचे चांगलेच फावले आहे. वनरक्षक, वनपालांच्या बदल्यांमध्ये अर्थकारण झाल्याचे बोलले जात आहे. शिवाय एका साहेबांचा १० हजार रुपयांचा बाँड चर्चेत आला आहे. हा ''बॉन्ड'' पोहोचविण्याची जबाबदारी एका मर्जीतल्या आरएफओंकडे आहे. सध्या हा वनाधिकाऱ्यांचा लाडका असून आपल्या मर्जीनुसार वनरक्षकांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप करीत आहे.

बॉक्स

चांदूररेल्वे प्रादेशिकचा कारभार सामाजिककडे?

प्रादेशिक वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग हे वेगवेगळे असताना आरएफओ आशिष कोकाटे यांची बदली गतवर्षी अमरावती सामाजिक वनिकरण विभागात करण्यात आली. तरीसुद्धा भरारी पथकाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला चांदूर रेल्वेचा पदभार न देता, आशिष कोकाटे यांच्याकडेच आहे. पुन्हा वर्षभरात त्यांची बदली करण्यासाठी राजकीय दबावातून मोर्शी वनपरिक्षेत्राकरिता पदस्थापणेकरिता वनभवन यांच्याकडे शिफारस केलेली आहे. विशेष बाब म्हणजे त्यांनी विनंती अर्ज न देता राजकीय दबावातून त्यांच्या बदलीचा घाट रचला आहे.

बॉक्स

सात जणांचे प्रस्ताव

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना त्यांच्या जागेवर एक वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला असताना राजकीय दबाव, पती-पत्नी एकत्रीकरण, विश्वासातील असल्याने चंदर, कोकाटे, भुंबर, तापस, बैलुमे, कटारिया व लाड या सात वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या बदलीचे प्रस्ताव वनभवनला सादर केल्याची माहिती आहे. यासाठी मुख्यकसंरक्षक कार्यालयातील एका अधिकाऱ्याने पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे. काहीचे मोठे अर्थकारण यात दडल्याची चर्चा वनवर्तुळात बोलकी ठरली आहे.