शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

ऊरुसातील दुकानाचा वाद चिघळण्याची शक्यता

By admin | Updated: January 5, 2016 00:19 IST

दुल्हा रहेमानशहाच्या दर्गा परिसरात ऊरुसानिमित्त (यात्रा) लागलेल्या दुकानाच्या रात्रीच्या वेळेबाबत पोलीस, दुकानदार आणि काही विशिष्ट समाजाच्या नेत्यांमध्ये ...

पोलीस कायद्यावर ठाम : रात्री १२ पर्यंत दुकाने उघडे ठेवण्याची मागणीअचलपूर : दुल्हा रहेमानशहाच्या दर्गा परिसरात ऊरुसानिमित्त (यात्रा) लागलेल्या दुकानाच्या रात्रीच्या वेळेबाबत पोलीस, दुकानदार आणि काही विशिष्ट समाजाच्या नेत्यांमध्ये वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहे. दुकानदार आणि नेते दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यासाठी मागणी करीत आहे. प्रसंगी आक्रमक होतांना दिसत आहे. तर पोलिस शांतता अबादित राहण्याचे कारण देत शॉप अ‍ॅक्टच्या कायद्यावर ठाम आहेत. अचलपूूर हे अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळख आहे. येथे अनेक पौराणिक आणि पारंपरिक प्रथा अजूनही कायम आहेत हे शहर यांत्राचेही म्हणून ओळखले जाते. सर्वात मोठी व एक ते सव्वा महिना चालणारी ऊरूस (यात्रा) दुल्हा रहेमानशहाच्या दर्गा परिसरात असते. ऊरुस निमित्त वेगवेगळी दुकाने लागतात. २४ डिसेंबरपासून ऊरुसाला सुरुवात झाली आहे. येथे लागलेल्या दुकानांचे भाडे घेतले जाते काय किंवा कोण घेतो हे कुणीही ठामपणे सांगण्यासाठी समोर येत नाही. मात्र पहेलवान को पैसे दिया और रातभर दुकाने शुरू रखने की गॅरंटी उसने ली थी, असे काही दुकानदार दबक्या आवाजात सांगतात. यावर्षी पोलिसांनी शॉप अ‍ॅक्टचे वेळेनुसार रात्री १० वाजता दुकाने बंद झालीच पाहिजे. यासाठी चाप ओढला आहे. ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या आदेशाचे पोलीस कर्मचारी काटेकोर पालन करताना दिसतात. पण या आदेशाने दुकानदार हैरान झाले आहेत. यासाठी भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मो. अजर शेख यांनी पोलीस स्टेशन व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले. रात्री १० वाजेनंतर पोलिस दुकाने बंद करण्यास भाग पाडत असल्याचे दुकानदार व पोलिसात अनेकदा वाद होतात. त्यामुळे दुकानांभोवती जमाव जमा होऊन तणाव निर्माण होतांना दिसतो. पोलिस कारवाईवर ठाम आहेत. रविवारी ११ वाजता एका उपाहारगृह रात्री ११ वाजता पोलिसांनी बंद करायला सांगितले असता होटलचे संचालक मो. रिजवान,मो. इरफान हे दोघे भाऊ साथीदार इकबाल (परतवाडा) हे उपनिरीक्षक एस. के. फरकाडे यांचे अंगावर धावून गेले होते. त्यामुळे काही काळ तनावही निर्माण झाला होता. ११ आॅगस्ट रोजी अमित हत्याकांड झाल्यानंतर ठाणेदार चक्षूपाल बहादुरे ह्यांची तडकाफडकी बदली करण्यात येऊन त्यांची जागी नरेंद्र ठाकरे आले. त्यांनी तेव्हापासून रात्री १० वाजेनंतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश फर्मावला. त्यामुळे रात्री ११ वाजेनंतर शहरात सामसूम होत आहे. तोच आदेश ऊरुसात कायम ठेवला आहे.