शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

केंद्र सरकारचे धोरण देशाला अधोगतीकडे नेणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 20:34 IST

Amravati News केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणामुळे शिक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रात होत असलेला खासगी क्षेत्राचा शिरकाव ही बाब अत्यंत गंभीर आहे. ते धोरण देशाला अधोगतीकडे नेणार असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी केला.

ठळक मुद्देशिक्षण, आरोग्य कृषी क्षेत्रातील खासगी क्षेत्राचा प्रभाव गंभीर

अमरावती : केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणामुळे शिक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रात होत असलेला खासगी क्षेत्राचा शिरकाव ही बाब अत्यंत गंभीर आहे. सरकारचे ते धोरण देशाला अधोगतीकडे नेणार असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी केला. त्या बुधवारी अमरावती येथे ‘मीट द प्रेस’मध्ये बोलत होत्या. (Medha Patkar)

             शिक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रावर गत काही वर्षात खासगीकरणाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याबाबत सरकारने जी जबाबदारी घ्यायला हवी होती, ती घेतली जात नाही. कोरोना संकटकाळात केंद्र सरकारकडून ऑक्सिजन पुरवठ्याची आवश्यकता असताना राज्य सरकारला पाहिजे तशी मदत झाली नाही. सरकारने विमानतळ, बँकिंग या क्षेत्रात खासगीकरण केले आहे. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनचा फायदा घेत मोदी सरकारने तीन शेतकरी विरोधी कायदे पारित केलेत. शेती क्षेत्राचे खासगीकरण करण्याचा जो प्रयत्न केला जात आहे, यामुळे देशाची स्थिती दक्षिण आफ्रिकेसारखी होणार आहे. अन्न सुरक्षा योजनेचेही वाटोळे करण्याचे काम केंद्र सरकार करीत असल्याचा आरोप पाटकर यांनी केला.

२७ सप्टेंबरला बंदची हाक

केंद्रसरकारने उद्योगपतींचे हित जोपाण्यासाठीच तीन कृषी कायदे आणले आहेत. यामुळे शेती क्षेत्रात होणाऱ्या खासगीकरणामुळे बाजार समित्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. त्यामुळे किसान समन्वय समितीने २७ सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. यात जास्तीत शेतकरी, शेतमजूर, कामगार व अन्यही संघटनांनी सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यमान राज्यपालांची भूमिका ही राजकीय असल्याची मेधा पाटकर म्हणाल्यात.

टॅग्स :Medha Patkarमेधा पाटकर