शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
3
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
4
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
5
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
6
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
7
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
8
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
9
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

अपहरणाच्या अफवेने पोलिसांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2016 00:02 IST

कॉटन मार्केट परिसरातून तीन बालक बेपत्ता झाल्याची तक्रार आई-वडील नोंदवीत असतानाच ते तीन बालक गाडगेनगर पोलीस ठाण्यात पोहोचले.

आनंदाश्रू : पालकानंतर बालकही पोहचले ठाण्यातअमरावती : कॉटन मार्केट परिसरातून तीन बालक बेपत्ता झाल्याची तक्रार आई-वडील नोंदवीत असतानाच ते तीन बालक गाडगेनगर पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र, या अपहरणाच्या बनावट घटनेमुळे पोलिसांची ताराबंळ उडाली होती, हे विशेष.गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बजरंग नगरातील रहिवासी ८ ते ११ वयोगातील बालक हे कॉटन मार्केट परिसरातील एका व्यावसायिकांकडे शितपेयाचे कॅरेट ट्रकांमध्ये चढविण्याचे काम करतात. दररोजप्रमाणे ते तीन बालके मंगळवारी सकाळी काम करण्यासाठी गेले. मात्र, रात्र होऊनही ते तिन्ही बालके घरी न पोहचल्याने आई-वडिलांना चिंता वाटू लागली होती. तिन्ही बालकांच्या आई-वडिलांनी नातेवाईक आणि ओळखीतील नागरिकांच्या घरी शोधाशोध सुरु केली. मात्र, तिन्ही बालके कोठेही आढळून आले नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी बालकांच्या आई-वडिलांनी गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. ते तक्रार देत असतानाच अचानक ते तिन्ही बालके पोलीस ठाण्यात दाखल झाली. ते रात्रभर कुठे होते, याबाबत ठाणेदार अर्जून ठोसरे यांनी बालकांनी विचारणा केली असता एका अज्ञात व्यक्तीने आम्हाला नास्ता करण्याचे आमिष दाखवून सोबत नेले आणि तिन्ही जणांनी मिळून आमचे हातपाय बांधले व एका पोत्यात टाकून वाहनात घेऊन गेल्याचे त्या बालकांनी पोलिसांना सांगितले. मात्र, त्यांनी ज्या ठिकाणी आम्हाला ठेवले होते. त्या ठिकाणी एक चाकू सापडला आणि आम्ही आमची सुटका करून घेतल्याचे बालकांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर आम्ही बडनेरा रेल्वे पोलीस ठाण्यात मदत मागण्यासाठी गेलो. तेथून पोलिसांनी दुपारी आम्हाला अमरावतीत पाठविले. बालकांनी अपहरणाचा असा बनाव सांगताच पोलिसांची तारांबळ उडाली.बालकांनी अपहरणाची खोटी माहिती पोलिसांना दिली. त्याची विचारपूस करण्यात आल्यावर ते बालक मंगळवारी कामावर पैसे मिळाल्यानंतर फिरायला गेले होते. बुधवारी ते परत अमरावतीत आले. आई-वडिलांच्या भीतीमुळे त्यांनी अपहणाची खोटी कहाणी पोलिसांना सांगितली. - अर्जुन ठोसरे, प्रभारी ठाणेदार, गाडगेनगर पोलीस ठाणे.