शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
3
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
4
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
5
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
6
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
7
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
8
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
9
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
10
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
11
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
12
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
13
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
14
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
15
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
16
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
17
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
18
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
19
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
20
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...

आम आदमी विमा योजनेत सेवामूल्याच्या नावावर लूट

By admin | Updated: July 23, 2014 23:24 IST

दरवर्षीप्रमाणे शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या आम आदमी विमा योजनेंतर्गत शाळांमधून विद्यार्थ्यांना योजनेचा शैक्षणिक लाभ मिळवून देण्याकरिता नोंदणी केली जाते. ही नोंदणी करताना काही शाळांमधून नोंदणीच्या

सुमित हरकुट - चांदूरबाजारदरवर्षीप्रमाणे शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या आम आदमी विमा योजनेंतर्गत शाळांमधून विद्यार्थ्यांना योजनेचा शैक्षणिक लाभ मिळवून देण्याकरिता नोंदणी केली जाते. ही नोंदणी करताना काही शाळांमधून नोंदणीच्या नावावर दुप्पट सेवामूल्य आकारले जात असल्याचे समोर आले आहे. शासनातर्फे भूमिहीन व अल्पभूधारक शेतकऱ्यांकरिता अनेक योजना राबविल्या जातात. अशातच २००७-०८ पासून सुरू झालेल्या आम आदमी विमा योजनेचासुद्धा सहभाग आहे. या योजनेत इयत्ता ९ ते १२ वी पर्यंतच्या पात्र विद्यार्थ्यांना ज्यांचे पालक भूमिहीन, शेतमजूर, १ हेक्टर बागायती, २ हेक्टर कोरडवाहू क्षेत्र धारण करीत असेल अशा विद्यार्थ्यांना १० महिन्यांपर्यंत १०० रूपये प्रतिमाह प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेकरिता लाभार्थ्यांकडून २० रूपये व २२.५० रूपये सेवामूल्य घेण्यात यावा, असा शासन निर्णय असताना तालुक्यातील काही शाळांत विद्यार्थ्यांकडून दुप्पट रक्कम आकारली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.महाआॅनलाईन संस्थेने याकरिता सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्यामध्ये अंदाजे ३६ लक्ष लाभार्थींची नोंदही झालेली आहे व यापुढील टप्पा ३६ लक्ष लाभार्थींची माहिती अपडेट करणे आहे. यामध्ये प्रत्येक लाभार्थीकरिता २० ते साडेबावीस रूपये सेवामूल्य आकारणी घेण्यात यावी, असा शासन निर्णय असतानाही अनेक शाळांमध्ये ४० रूपये आकारले जात आहे. त्यामुळे या योजनांमार्फत लाभार्थींची लूट होत असल्याचे समोर येत आहे. शासन या योजना सर्वसामान्यांच्या हिताकरिता राबवितात. परंतु यामधील कार्य करणाऱ्या संस्थाच या योजनांचा बट्ट्याबोळ करीत आहे. शासन निर्णयामध्ये विवरणपत्र ५ व ६ वर सेवामूल्य वीस ते साडेबावीस रूपये घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले असतानाही विद्यार्थ्यांकडून दुप्पट सेवामूल्य नेमके कशासाठी घेतले जात आहे व या दुप्पट सेवाशुल्क घेण्यामागे शाळा अथवा ई-सेतू केंद्र जबाबदार आहे. याची चौकशी होणे मात्र गरजेचे आहे. शाळांमध्ये घेतले जात असलेले दुप्पट सेवाशुल्क कोणाच्या निर्देशानुसार, असा प्रश्न लाभार्थी पालकांना पडला आहे. विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती योजनेत डल्ला मारणाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे.