शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

गणोरी भातकुली रस्त्याची दुर्दशा

By admin | Updated: June 14, 2015 00:17 IST

भातकुली हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे तहसील कार्यालयार्पंत सर्वच सोई उपलब्ध आहेत.

पायी चालणेही कठीण : गावकऱ्यांची डांबरीकरणाची मागणीभातकुली : भातकुली हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे तहसील कार्यालयार्पंत सर्वच सोई उपलब्ध आहेत. परंतु गणोरीवासीयांना त्याचा फायदा होत नाही. गणोरी हे गाव अद्यापही भातकुलीला पक्क्या रस्त्याने जोडलेले नाही. गणोरी-भातकुली रस्त्याच्या खडीकरणासाठी मंजूर झालेले ८० लक्ष रुपये पूर्णत: पाण्यात गेल्याची ओरड आहे. गणोरी हे गाव जिल्ह्यात प्रसिध्द आहे. ते महंमदखान महाराजांमुळे हिन्दू-मुस्लिम एकतेचे प्रतीक अशी या गावाची ओळख आहे. पण लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे अद्यापही हे गाव भातकुलीशी पक्क्या रस्त्याने जोडले गेले नाही. परलाम, उत्तमसरा, कवठा, निंभोरा, शिवणी, शिवगाव, बहाद्दरपूर, खरबी, खल्लार इत्यादी गावातील नागरिकांना भातकुलीला जायचे झाल्यास नाहक फेऱ्याने जावे लागतात. वास्तविक पाहता गणोरी-भातकुली हे रस्ता केवळ ४ कि.मी.चे अंतर आहे. म्हणजे अवघ्या ५ मिनिटांमध्ये भातकुली गाठणे सहज शक्य आहे. परंतु रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे २० ते २५ कि.मी. चा फेरा आगाऊ मारावा लागतो. गणोरी - भातकुली हा राज्य ग्रामीण मार्ग क्र. ८२ असून लवकरात लवकर या मार्गावर डांबरीकरण करण्यात यावे व तालुक्यातील जनतेला नाहक त्रासापासून मुक्त करावे, अशी मागणी गणोरी, परलाम, उत्तमसरा, कवठा, निंभोरा, शिवगाव, शिवणी, खरबी, बहाद्दरपूर येथील नागरिकांनी केली आहे. पुढे पावसाळा आहे. पावसाळ्यात या रस्त्याची अधिकच दुर्दशा होईल. नागरिकांना व वाहनधारकांना या मार्गाने जाणे-येणे कठीण होईल. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी या मार्गाने दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या व प्रवाशांच्यावतीने करण्यात आली आहे. (वार्ताहर)