शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
3
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
4
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
5
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
6
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
7
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
8
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
9
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
10
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
11
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
12
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
13
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
14
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
15
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
16
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
17
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
18
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
19
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
20
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
Daily Top 2Weekly Top 5

‘नवाब’ची सीआयडी चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 22:31 IST

नजीकच्या पोहरा जंगलातून स्थलांतरित नवाब नावाचा वाघ गायब झाल्याप्रकरणी सीआयडीमार्फत चौकशी करून यातील दोषींना जेरबंद करावे आणि यातील सत्यता बाहेर काढावी, अशी मागणी सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देसहायक वनसंरक्षकांची मागणी : प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पत्र

आॅनलाईन लोकमतअमरावती : नजीकच्या पोहरा जंगलातून स्थलांतरित नवाब नावाचा वाघ गायब झाल्याप्रकरणी सीआयडीमार्फत चौकशी करून यातील दोषींना जेरबंद करावे आणि यातील सत्यता बाहेर काढावी, अशी मागणी सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांनी केली आहे. जबाबदारी असलेल्या वनाधिकाऱ्यांनीच चौकशीची मागणी केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण आले असून, याबाबत वरिष्ठ कोणता निर्णय घेतात, याकडे वनविभागाच्या नजरा लागल्या आहेत.प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री भगवान यांच्याकडे २० मार्च रोजी एसीएफ कविटकर यांनी पत्र दिले. नागपूर येथील नेचर व वन्यजीव संस्थेचे त्यापूर्वी सुजोग चव्हाण यांनी २० फेब्रुवारी रोजी वन्यजीव विभागाकडे लेखी तक्रार दिली. त्यानुसार, नवाब वाघ हा नोव्हेंबर २०१७ पासून पोहरा जंगलात दिसला नाही. तो कटलाबोडी, बोर क्षेत्रात परतल्याचे कविटकर खोटे बोलत आहेत. नागपूर येथील एका वरिष्ठ वनाधिकाºयाने नवाब हा बोर, कटलाबोडी भागात असल्याचा कोेणताही पुरावा नसल्याचे सांगितले. त्याची वीजप्रवाहाने शिकार करण्यात आली असून, शिकारी हे एसीएफ कविटकर यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे याप्रकरणी कविटकर सारवासारव करीत असल्याचे सुजोग चव्हाण यांनी तक्रारीत नमूद केले होते.दरम्यान, तक्रारदाराने नवाबची वीजप्रवाहाने शिकार झाल्याचे आजतागायात का दडवून ठेवले? शिकाऱ्यांची नावे तक्रारदारांकडून घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी. तक्रारदारांचे भ्रमणध्वनी क्रमांक घेऊन २६ फेब्रुवारीच्या महिनाभरापूर्वी ते आजतागायत कॉल डिटेल्स घ्यावेत. तक्रारदाराने वनविभागाच्या कोणत्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीहून संपर्क साधला? याची चौकशी करावी आणि पुरावे आढळल्यास माझ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, असे कविटकर यांचे म्हणणे आहे. सुजोग चव्हाण यांच्या तक्रारीत तथ्य न आढळल्यास त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका कविटकर यांनी पत्राद्वारे मांडली आहे. नवाब वाघ गायब झाल्याप्रकरणी व्याघ्र प्रकल्प आणि वनविभाग असे द्वंद पेटले असून, खरेच नवाब गेला कुठे, हे स्पष्ट होईल.खोट्या तक्रारीमागे बड्या वनाधिकाऱ्याचा हातनवाब गायब झाल्याप्रकरणी सुजोग चव्हाण यांनी खोटी तक्रार दिली असून, यामागे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय कविटकर यांनी व्यक्त केला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कंत्राटी कर्मचारी दास जयदीप यांनी सोशल मीडियावर कुणाच्या इशाऱ्यावरून बातमी अपलोड केली, याचा शोध घेतल्यास वास्तविकता समोर येईल, असे अशोक कविटकर यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.एनजीओ सुजोग चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत काहीही तथ्य नाही. नवाव स्वगृही परतल्याचा अहवाल यापूर्वीच वरिष्ठांना पाठविला आहे. नवाब वाघाची शिकार झाल्याप्रकरणी तक्रारकर्त्याला ठोस पुरावे मागितले असून, ते अद्यापही मिळालेले नाहीत.- हेमंत मीणाउपवनसंरक्षक, अमरावती.