शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

‘नवाब’ची सीआयडी चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 22:31 IST

नजीकच्या पोहरा जंगलातून स्थलांतरित नवाब नावाचा वाघ गायब झाल्याप्रकरणी सीआयडीमार्फत चौकशी करून यातील दोषींना जेरबंद करावे आणि यातील सत्यता बाहेर काढावी, अशी मागणी सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देसहायक वनसंरक्षकांची मागणी : प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पत्र

आॅनलाईन लोकमतअमरावती : नजीकच्या पोहरा जंगलातून स्थलांतरित नवाब नावाचा वाघ गायब झाल्याप्रकरणी सीआयडीमार्फत चौकशी करून यातील दोषींना जेरबंद करावे आणि यातील सत्यता बाहेर काढावी, अशी मागणी सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांनी केली आहे. जबाबदारी असलेल्या वनाधिकाऱ्यांनीच चौकशीची मागणी केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण आले असून, याबाबत वरिष्ठ कोणता निर्णय घेतात, याकडे वनविभागाच्या नजरा लागल्या आहेत.प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री भगवान यांच्याकडे २० मार्च रोजी एसीएफ कविटकर यांनी पत्र दिले. नागपूर येथील नेचर व वन्यजीव संस्थेचे त्यापूर्वी सुजोग चव्हाण यांनी २० फेब्रुवारी रोजी वन्यजीव विभागाकडे लेखी तक्रार दिली. त्यानुसार, नवाब वाघ हा नोव्हेंबर २०१७ पासून पोहरा जंगलात दिसला नाही. तो कटलाबोडी, बोर क्षेत्रात परतल्याचे कविटकर खोटे बोलत आहेत. नागपूर येथील एका वरिष्ठ वनाधिकाºयाने नवाब हा बोर, कटलाबोडी भागात असल्याचा कोेणताही पुरावा नसल्याचे सांगितले. त्याची वीजप्रवाहाने शिकार करण्यात आली असून, शिकारी हे एसीएफ कविटकर यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे याप्रकरणी कविटकर सारवासारव करीत असल्याचे सुजोग चव्हाण यांनी तक्रारीत नमूद केले होते.दरम्यान, तक्रारदाराने नवाबची वीजप्रवाहाने शिकार झाल्याचे आजतागायात का दडवून ठेवले? शिकाऱ्यांची नावे तक्रारदारांकडून घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी. तक्रारदारांचे भ्रमणध्वनी क्रमांक घेऊन २६ फेब्रुवारीच्या महिनाभरापूर्वी ते आजतागायत कॉल डिटेल्स घ्यावेत. तक्रारदाराने वनविभागाच्या कोणत्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीहून संपर्क साधला? याची चौकशी करावी आणि पुरावे आढळल्यास माझ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, असे कविटकर यांचे म्हणणे आहे. सुजोग चव्हाण यांच्या तक्रारीत तथ्य न आढळल्यास त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका कविटकर यांनी पत्राद्वारे मांडली आहे. नवाब वाघ गायब झाल्याप्रकरणी व्याघ्र प्रकल्प आणि वनविभाग असे द्वंद पेटले असून, खरेच नवाब गेला कुठे, हे स्पष्ट होईल.खोट्या तक्रारीमागे बड्या वनाधिकाऱ्याचा हातनवाब गायब झाल्याप्रकरणी सुजोग चव्हाण यांनी खोटी तक्रार दिली असून, यामागे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय कविटकर यांनी व्यक्त केला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कंत्राटी कर्मचारी दास जयदीप यांनी सोशल मीडियावर कुणाच्या इशाऱ्यावरून बातमी अपलोड केली, याचा शोध घेतल्यास वास्तविकता समोर येईल, असे अशोक कविटकर यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.एनजीओ सुजोग चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत काहीही तथ्य नाही. नवाव स्वगृही परतल्याचा अहवाल यापूर्वीच वरिष्ठांना पाठविला आहे. नवाब वाघाची शिकार झाल्याप्रकरणी तक्रारकर्त्याला ठोस पुरावे मागितले असून, ते अद्यापही मिळालेले नाहीत.- हेमंत मीणाउपवनसंरक्षक, अमरावती.