शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

आधी वृक्षारोपण, नंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: June 19, 2016 23:59 IST

राज्य शासनाने १ जुलै रोजी ‘एकच लक्ष, दोन कोटी वृक्ष’ ही संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.

निर्णय : सीसीएफ, आरएफओंचा समावेशअमरावती : राज्य शासनाने १ जुलै रोजी ‘एकच लक्ष, दोन कोटी वृक्ष’ ही संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आधी वृक्षलागवड नंतर बदल्यांची प्रक्रिया’या बाबीला मुख्य सचिवांनी प्राधान्य दिले आहे.१ ते ७ जुलै दरम्यान वनमहोत्सव साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ जुलै रोजी दोन कोटी वृक्षारोपणाचा संकल्प केला आहे. वनविभागाव्यतिरिक्त राज्य शासनाने अन्य ४३ विभागांना वृक्षारोपणाचे ‘लक्ष्य’ दिले आहे. दरम्यान येथील प्रादेशिक वनविभागाने वनपाल, वनरक्षकांच्या बदल्या लक्षात घेत वृक्षारोपणासाठी आवश्यक वनकर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी पाठवू नयेत, असे निर्देश दिले आहेत. राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य असले तरी जिल्ह्यात ४ लाख ८५ हजार वृक्षलागवडीचा लक्ष्यांक आहे. १ जुलै रोजी सर्व प्रशासकीय अधिकारी मुख्यालयी नव्हे तर वृक्षलागवडस्थळी हजर राहतील, असे शासनादेश आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पालकमंत्री, खासदार, आमदार अन्य लोकप्रतिनिधींना वृक्षारोपणात सहभागी व्हावे लागणार आहे. वृक्षारोपणात रोहयो मजुरांना सहभागी केल्यास त्यांना १ जुलै रोजी वेतन देण्याची तयारी विभागीय आयुक्तांनी केली आहे. वृक्षरोपणात हयगय अथवा कुचराई केल्यास संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश आहेत. १ जुलै रोजीच्या अनुषंगाने वृक्षारोपणाची तयारी करण्यात आली आहे. या उपक्रमात सामाजिक, शैक्षणिक संस्थांचा सहभाग राहणार आहे. अन्य संस्थाना वृक्षारोपणात सहभागी व्हायचे असल्यास संपर्क साधवा.- प्रदीप मसराम,उपवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण