शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

मुलाच्या हत्येचा ठरला होता प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:25 IST

अमरावती : अपहरण प्रकरणात पोलिसांनी तत्परता दाखविली नसती, तर चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेहच त्यांच्या हाती पडला असता. अपहरणानंतर सतत ...

अमरावती : अपहरण प्रकरणात पोलिसांनी तत्परता दाखविली नसती, तर चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेहच त्यांच्या हाती पडला असता. अपहरणानंतर सतत रडत असल्याने या चिमुकल्याला संपविण्याचा अपहरणकर्त्यांचा कट रचला होता, अशी धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

अहमदनगर येथे हिनासह अन्य दोन आरोपींना तपास पथकाने शुक्रवारी ताब्यात घेतल्यानंतर तिने आसिफ शेख व फिरोज शेख यांच्या ताब्यात चिमुकला असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. हिनाच्या ताब्यात असताना तो रडला नाही. मात्र, आसिफ शेख व फिरोज शेख यांच्या ताब्यात गेल्यानंतर त्याचे रडणे थांबत नव्हते. रडायचा. आई-वडिलांकडे जाण्याचा हट्ट त्याने धरला. मुलगा रडला, तर पकडले जाऊ, अशी भीती आरोपींना होती. त्यामुळे ‘इस बच्चे को काट देते है’ असे ते आपसात बोलत असल्याचे खुद्द चिमुकल्याने पोलीस पथकासोबत आलेल्या काकांना सांगितले. काकांनी त्याला नेमके काय घडले, ते विचारले तेव्हा त्याने बोबड्या बोलाने ही हकीकत कथन केली.

चिमुकल्याचे बोलणे त्याच्या काकांनी ध्वनिमुद्रित केल्याचे पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी स्पष्ट केले. तपासातील विलंब मुलाच्या जिवावार बेतला असता, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.