शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर 'गुलाबी थंडी'

By admin | Updated: December 7, 2015 04:40 IST

पावसाळा संपल्यानंतर थंडीची चाहुल लागते. मात्र, अद्यापपर्यंत पाहिजे तशी थंडी पडलेली नाही. मागील वर्षांच्या

अमरावती : पावसाळा संपल्यानंतर थंडीची चाहुल लागते. मात्र, अद्यापपर्यंत पाहिजे तशी थंडी पडलेली नाही. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा थंडीची लाट १५ दिवस उशिरा आली असून २१ डिसेंबरनंतर गुलाबी थंडीचा आनंद अमरावतीकरांना घेता येणार आहे.दरवर्षी आॅक्टोबरच्या शेवटी थंडी जाणवते, मात्र, यंदा आॅक्टोबर व नोव्हेंबर गेला तरीही थंडी जाणवली नाही. डिसेंबरच्या सुरुवातीपासून हळूहळू थंडी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते, सोमवार ते रविवारपर्यंत कमाल तापमान ३० ते ३१ व किमान तापमान १३ ते १७ डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याचे संकेत आहे. दरम्यान वाऱ्याचा वेग ५ ते ७ किलोमीटर प्रतितास राहणार आहे. गुरुवारपासून आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून रात्रीच्या तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात रात्रीचे तापमान १२ ते १५ डिग्री सेल्सिअसदरम्यान राहील. यादरम्यान गुलाबी थंडीचा आनंद अमरावतीकरांना घेता येणार आहे. त्यानंतर बोचरी थंडीला सुरुवात होण्याचे संकेत आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा थंडी १५ दिवसा उशिरा आली आहे. आतापर्यंत थंडीचा प्रभाव नव्हता, मात्र, आता थंडी हळूहळू वाढत आहे. मागील वर्र्षी डिसेंबरमध्ये ७.५ ते १४ डिग्री सेल्सिअस तापमान होते. मात्र, यंदा ते १२ ते १७ डिग्रीदरम्यान आहे. यंदा थंडी कमी राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांचा आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांनी घ्यावी काळजीशेतीतज्ज्ञांच्या मते, ढगाळ वातावरण राहिल्यास हरभरा आणि तुरीच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अशा वातावरणात कृषितज्ज्ञांच्या मार्गदर्शनात तत्काळ फवारणी करावी. संत्रावर पांढरी माशी आणि कोळशीचा प्रकोप होऊ शकतो.ग्रामीण भागात पेटल्या शेकट्याथंडीचा प्रभाव शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक प्रमाणात जाणवतो. ओलीत शेती व मोकळा भाग असल्यामुळे थंड वारे वाहतात. त्यामुळे थंडीचा प्रकोप अधिक असतो. सद्यस्थितीत ग्रामीण भागातील नागरिक शेकट्या पेटवून गप्पा करताना आढळून येत आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा थंडी उशिरा आली आहे. सोमवार ते रविवार रात्रीच्या तापमानात थोडी वाढ होणार असून डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर थंडी वाढणार आहे. म्हणजेच गुलाबी थंडी पडणार आहे. यादरम्यान ढगाळ वातावरण राहिल्यास शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी. - अनिल बंड, हवामान तज्ज्ञ, श्री शिवाजी कृषि महाविद्यालय. अमरावती.