शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
2
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
3
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
4
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
5
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
6
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
7
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?
8
८वा वेतन आयोग लांबणीवर? कोट्यवधी आजी-माजी कर्मचारी अद्यापही प्रतीक्षेतच
9
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
10
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना
11
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
12
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी गुड न्यूज! महागाई भत्त्यात ३ ते ४% वाढ होण्याची शक्यता, किती पगार वाढणार?
14
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
15
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
16
"मुलाला नाच्या बनवायचंय का?", कथ्थक शिकणाऱ्या अभिनेत्याच्या आईवडिलांना हिणवायचे नातेवाईक, सांगितला बालपणीचा प्रसंग
17
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
18
साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक कुटुंबांचे आधारवड हरपले; पीडितांच्या कुटुंबीयांना रेल्वेत नोकरी
19
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
20
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का

‘भुताच्या यात्रे’त पेटला लाखोंचा कापूर

By admin | Updated: March 30, 2017 00:18 IST

तीनशे वर्षांपूर्वी अवधूत पंथाची स्थापना करणारे श्रीकृष्णाजी अवधुत महाराजांच्या पदस्पर्शाने पावन सावंगा विठोबानगरीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लाखोंचा कापूर पेटला.

सावंगा विठोबात भक्तांची मांदियाळी : गुढीपाडव्याच्या यात्रेला विशेष महत्त्व चांदूर रेल्वे : तीनशे वर्षांपूर्वी अवधूत पंथाची स्थापना करणारे श्रीकृष्णाजी अवधुत महाराजांच्या पदस्पर्शाने पावन सावंगा विठोबानगरीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लाखोंचा कापूर पेटला. लक्षावधी भक्तांनी या भुताच्या यात्रेत हजेरी लाऊन कृष्णाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. समतेचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या देव व भक्तांच्या ७० फूट उंच दोन झेंड्यांना गुढीपाडव्याला नवीन खोळ चढविण्यात आली. येथील दिव्य धार्मिक विधी भाविकांनी त्यांच्या हृदयात जपून ठेवत आराध्याचे आशीर्वाद घेतले. लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीकृष्णाजी अवधुत महाराजांच्या यात्रेला मंगळवारपासून म्हणजे गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली. दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. भाविकांनी आप्तजनांच्या वजनाएवढा कापूर जाळून नवस फेडला व भोजनदान केले. पारंपारिक झांज व मृदंगाच्या साथीने संपूर्ण परिसर अवधुती भजनात रंगला होता. मंदिराचे विश्वस्त गोविंद राठोड, हरिदास सोनवाल, वामन रामटेके, दिनकर मानकर, विनायक पाटील, रूपसिंग राठोड, दत्तुजी रामटेके, कृपासागर राऊत, अनिल बेलसरे, दिगंबर राठोड, पुंजाराम नेमाडे, स्वप्निल चौधरी यांनी महोत्सवासाठी प्रयत्न केले. ७० फूट झेंड्यांना नवी खोळदेव व भक्तांच्या प्रतिकात्मक दोन झेंड्यांना नवीन खोळ चढविण्यास दुपारी ४ वाजता सुरुवात झाली. चरणदास कांडलकर यांनी कृष्णाजी महाराजांच्या बोहलीचे दर्शन घेतले. विधीवत पूजनानंतर दोन झेंड्यांना पायांचा स्पर्श न करता दोरखंडाच्या सहायाने जुनी खोळ काढली व ते उंच टोकावर पोहचले. दोन्ही झेंड्यांना नवीन खोळ टाकत कांडलकर खाली उतरले. हा चित्तथरारक सोहळा दोन तास चालला.पाणीटंचाईची झळ सावंगा विठोबा ग्रापने गावकऱ्यांसह यात्रेकरूंसाठी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था न केल्याने सावंग्यात पाणीटंचाई जाणवत होती. ग्रापंने टँकरव्दारे पाणीपुरवठा केला. मात्र, अनेक ठिकाणी पाणी पोहोचले नसल्याची ओरड होती. महिलांसाठी प्रसाधनगृह नसल्याने गैरसोय झाली. आरोग्य विभागाने यात्रेकरूंच्या सोईसाठी अ‍ॅब्युलन्स व डॉक्टरांची व्यवस्था केली होती.चोख बंदोबस्तजिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ अविनाश पालवे यांनी १६ पोलीस अधिकारी व ११३ पोलीस कर्मचारी व दंगा नियंत्रण दलाच्या जवानांनी यात्रे दरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहिली. मंदिर प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे बंदोबस्त व भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविले.