शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत सिंचनाची सुविधा

By admin | Updated: March 19, 2016 00:16 IST

मागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जमिनीतील पाण्याचा स्तर खालावतो आहे. कोरडवाहू शेती मुख्यत: पावसावर अवलंबून असते.

शासनाचा निर्णय : उत्पन्नात होणार वाढ, आता मागेल त्याला शेततळेसुमित हरकुट चांदूरबाजारमागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जमिनीतील पाण्याचा स्तर खालावतो आहे. कोरडवाहू शेती मुख्यत: पावसावर अवलंबून असते. जलस्तरामध्ये घट होण्याचा विपरित परिणाम शेती उत्पन्नावर झाला आहे. शेतीच्या उत्पादनात वाढ करणे तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त आहेत. पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी जलसंवर्धन आणि पाणलोटच्या माध्यमातून सिंचनाची उपयुक्तता वाढविण्यासोबत संरक्षित आणि शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मागेल त्याला शेततळे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. शेततळ्यांच्या निर्मितीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. शेततळे ही योजना शेतकऱ्यांसाठी संजीवनी देणारी ठरेल. शेततळे कार्यक्रमाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. त्या शेतकऱ्यांची जमीन शेततळ्यांकरिता तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे. जेणेकरुन पावसाचे वाहून जाणारे पाणी शेततळ्यामध्ये भरणे अथवा पुनर्भरण करणे शक्य होईल. अर्जदार शेतकऱ्याने यापूर्वी सामुदायिक शेततळे शासकीय योजनेतून लाभ घेतलेला नसावा. दारिद्र्यरेषेखालील शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसांना निवड प्रक्रियेमध्ये ज्येष्ठता यादीत सूट व प्रथम प्राधान्य देण्यात येईल. याशिवाय प्रथम अर्ज करणाऱ्याची प्राधान्यक्रमाने निवड करण्यात येईल. ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेमुळे लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मोठी मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांना १५ बाय १५, २० बाय १५ व ३० बाय ३० आकाराचे शेततळे घेता येणार आहे. अनुदानाची कमाल मर्यादा ५० हजार इतकी राहणार आहे. यापेक्षा अधिक खर्च झाल्यास उर्वरित रक्कम लाभार्थ्याला खर्च करावी लागणार आहे. अधिकाधिक पाच शेतकऱ्यांचा गट करून त्यांना एकत्रितरीत्या सामुदायिक शेततळे करता येईल. त्यांना मिळणारे अनुदान, पाण्याचा वापर आणि पाण्याची हिस्सेदारी आदींबाबत संबंधित शेतकऱ्यांनी १०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार करून तो अर्जासोबत शेततळे करण्यास इच्छुकशेतकऱ्यांकडे जमिनीचा ७/१२, ८/अ चा उतारा, दारिद्र्य रेषेखालील कार्ड, आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या वारसाचा दाखला असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी योजना लाभदायक ठरू शकते.