शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

कोरोनाकाळात मिरची शेतीने आणली समृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:37 IST

पाऊण एकरात साडेचार लाखांचे उत्पादन, राजुऱ्याच्या युवकाला बेभरवशाच्या पिकाने दिला हातराजुरा बाजार : मिरची बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या राजुऱ्यातील युवकाने ...

पाऊण एकरात साडेचार लाखांचे उत्पादन, राजुऱ्याच्या युवकाला बेभरवशाच्या पिकाने दिला हातराजुरा बाजार : मिरची बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या राजुऱ्यातील युवकाने याच पिकाच्या बळावर कोरोनाकाळात पावणेचार लाखांचे उत्पादन घेतले आहे. धोका पत्करून व बाजाराचे अवलोकन करून कोणताही व्यवसाय समृद्धी देतो, हे या नवशेतकऱ्याने दाखवून दिले. तुषार बहुरूपी असे सदर युवकाचे नाव आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही तरी कण्याच्या शोधात असलेल्या तुषारला कोरोनाकाळातील लॉकडाऊनने घरी बसविले. मात्र, हीच त्याच्यासाठी संधी ठरली. तो शेतीकडे वळला. वडिलोपार्जित नऊ एकर शेतातील संत्राझाडे वगळता तीन एकरात कपाशी व पाऊण एकर क्षेत्रावर मिरचीची लागवड त्याने केली.१५ एप्रिलला मिरचीचे '' नवतेज'' बियाणे टाकून रोपे तयार केल्यानंतर जून महिन्यात पाऊण एकरात त्यांची लागवड केली. राजुऱ्याचा मिरची बाजार सुरू होताच ७२०० रुपये असा उच्चांकी दर मिळाला. मिरचीचे पाऊण एकरात १२५ क्विंटल उत्पादन झाले. कीटकनाशके, खते, मजुरीचा खर्च वगळता ३ लाख ७५ हजार रुपये निव्वळ नफा तुषारने कमावला. सध्या मात्र दर कमालीचे घसरले असल्याने तोडा केलेली मिरची सुकवून विकण्याचा त्याचा मानस आहे. परिसरात मिरचीवाला तुषार अशी ओळख त्याने निर्माण केली आहे.

---------------

धोका पत्करलाकोरोनाकाळात मिरची मार्केट चालू होईल की नाही, मिरची व्यापारी घेतील की नाही, याची शाश्वती नसताना, तुषारने धोका पत्करून मिरचीची लागवड केली. स्वतः शेतात फवारणी, खते मजुरी करून मजुरीचे पैसे वाचविले. अनुभवी मिरची उत्पादक शेतकऱ्यांकडून धडे घेतले. त्याच्या परिश्रमाचे चीज झाले आहे.

---------------

भाजीपालावर्गीय पिकांमध्ये रिस्क घ्यावीच लागते. कोण म्हणते, शेती परवडत नाही? शेतीशी प्रामाणिक राहून परिश्रम घेतल्यास नक्कीच यशस्वी होऊ शकतो, असा माझा अनुभव आहे.

- तुषार बहुरूपी, मिरची उत्पादक, राजुरा बाजार