शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

वरुड तालुक्यात खचलेल्या विहिरींची प्रकरणे प्रलंबित

By admin | Updated: June 18, 2016 00:07 IST

सन २०१३-१४ मध्ये अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरंच्या दुरस्तीसाठी शासनाने परिपत्रक काढून मनरेगामधून बांधकाम मंजूर करवून घेतले होते.

पंचायत समितीचे असहकार्य : १ हजार ६९ प्रकरणे प्रलंबितवरूड : सन २०१३-१४ मध्ये अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरंच्या दुरस्तीसाठी शासनाने परिपत्रक काढून मनरेगामधून बांधकाम मंजूर करवून घेतले होते. परंतु पंचायत समितीच्या असहकार्यामुळे खचलेल्या विहिरींची १ हजार ६९ प्रकरणे अद्यापही प्रलंबित असल्याचा आरोप आ.अनिल बोंडे यांनी तहसील कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश दिले. वरुड तालुक्यात २ हजार ९२२ विहिरी अनुदानास पात्र ठरविल्या होत्या. परंतु मनरेगामध्ये पंचायत सिमतीने १ हजार २५३ विहिरींचे कामे सुरू केले. यामध्ये केवळ १८४ विहिरी बांधून पूर्ण केल्या. खचलेल्या विहिरी बांधकाम पूर्ण करण्यात पं.स. अपयशी ठरल्याचा आरोप केला. तहसील कार्यालयात आ. अनिल बोंड ेयांनी आढावा घेतला. सन २०१३-१४ मध्ये अतिवृष्टीने खचलेल्या विहिरींच्या दुरुस्तीकरिता अनुदानासाठी शासनाने परिपत्रक काढून मनरेगामधून बांधकाम मंजूर करून घेतले होते. सर्व विभागाच्या विभागप्रमुखांना बैठकीत बोलावले होते. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी तत्पर असले पाहिजे. शेतकऱ्यांचा शिवरस्ता, शेतीमार्ग, या बाबतचे २५० प्रकरणे प्रलंबित असल्याचे अहवालावरून दिसून आले. शेतकऱ्यांना वारंवार तहसील कार्यालयामध्ये यावे लागते. प्रलंबित प्रकरणांसाठी लोकन्यायालय आयोजित करून सर्व प्रकरणे तातडीने निकाली काढावे. तालुक्यात घरकुलासाठी जमिनीचे पट्टे देण्याची प्रक्रिया गेल्या नऊ महिन्यांपासून ठप्प झाली. पट्टे देण्याबाबत गटविकास अधिकारी, तहसीलदारांनी संयुक्तपणे निर्णय घेऊन घरकुलासाठी जागा देण्यात यावी. जागा नसल्याने पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेनुसार लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांचा मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात यावा. गावागावांत आमआदमी विमा योजना, पंतप्रधान जीवन सुरक्षा योजना, पंतप्रधान विमा योजना ग्रामीण भागात १०० टक्के राबविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. नवीन तहसील कार्यालयाच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने निधी प्राप्तीनंतर प्रक्रिया सुरू होणार असाल्याचेही आ. बोंडे यांनी सांगितले. सर्व विभाग प्रमुखांना शेतकऱ्यास जनतेची तातडीने प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही ठणकावून सांगण्यात आले. यावेळी आढावा बैठकीला तहसीलदार आशिष बिजवल, नायब तहसीलदार सुनील रासेकर, कमलाकर देशमुख, दर्शन सहारे, पंकज चव्हाण, गटविकास अधिकारी बोपटे, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र फसाटे, ंसतोष निमगरे, नीलेश फुटाणे, रोशन कळमकर, सुधीर बेलसरे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)