शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

वीजबिल भरायचे की, कर्जाची परतफेड करायची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:07 IST

शेतकरी वर्गात संभ्रमावस्था, वीजपुरवठा खंडित होण्याची भीती चांदूर बाजार : वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोना आजाराने शेतमालाचे भाव पडले. अस्मानी ...

शेतकरी वर्गात संभ्रमावस्था, वीजपुरवठा खंडित होण्याची भीती

चांदूर बाजार : वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोना आजाराने शेतमालाचे भाव पडले. अस्मानी व सुलतानी संकटाने भरडून गेलेल्या शेतकऱ्यांसमोर आता नवे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. थकीत वीज देयके भरावे की, नियमित कर्ज असा संभ्रम त्यांच्यात निर्माण झालेला आहे.

सन २०२० च्या मार्चपासून मानगुटीवर बसलेल्या कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना बसला आहे. आता कोरोनाची दुसरी लाटदेखील डोक्यावर घोंगावत आहे. यात नियमित कर्ज भरणाऱ्यांना अनुदान व कर्जाच्या परतफेडीसोबतच वीजपुरवठा खंडित झाल्यास काय, असा प्रश्न सतावत आहे. गतवर्षी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी घोषित केलेले अनुदान अद्यापही मिळालेले नसल्याची वस्तुस्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पाठवलेले अवाजवी कृषी व घरगुती वीज देयके भरावे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सुरुवातीला शासनातर्फे वीजबिल माफीबाबत चर्चा होती. आता वाढलेले वीजबिल भरणे शक्य नसल्यामुळे वीजबिल भरायचे आणि तेही वेळेच्या आत, अन्यथा वीज कनेक्शन कापले जातील, असा फतवा सरकारने काढला आहे.

बँकांकडूनही तगादा

मागील हंगामात घेतलेल्या कर्जाची परतफेड ३१ मार्चपूर्वी करण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी कर्जदारांना तगादा लावणे सुरू केले आहे. कोरोना महामारीमुळे पैशाची आवक नाही. वीजबिल भरले तर थकीत कर्जदार होण्याची भीती. कर्जाची परतफेड केली तर वीज कनेक्शन खंडित होण्याची भीती, अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे. शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याची घोषणा केली होती. शेतकऱ्यांनी घरातील दागिने विकून, गहाण ठेवून, नातेवाइकांकडून उसणे पैसे घेऊन कर्जाची परतफेड केली. मात्र, वर्षभराचा कालावधी लोटला तरी अनुदानाचा पत्ता नाही.

----------------------