शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

अमरावती -मुंबई एक्स्प्रेसच्या प्रतीक्षेत प्रवासी; रेल्वेचे ट्रॅफिक वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:10 IST

बडनेरा : कोरोना संसर्ग ओसरताच प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये वाढ करण्यात आली. जिल्ह्यातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. अमरावती ...

बडनेरा : कोरोना संसर्ग ओसरताच प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये वाढ करण्यात आली. जिल्ह्यातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. अमरावती मुंबई एक्स्प्रेसची डिमांड आहे. प्रवासीवर्ग तिच्या प्रतीक्षेत आहे. यासह इतरही महत्त्वाच्या रेल्वे गाड्या आता सुरू होण्याची प्रतीक्षा प्रवाशांना लागलेली आहे.

कोरोना काळात अमरावती जिल्ह्यातून जाणाऱ्या बऱ्याच महत्त्वाच्या रेल्वे गाड्या बंद केल्या होत्या. दुसरी लाट कमी होताच हळूहळू बंद केलेल्या रेल्वे गाड्या पुन्हा सुरू करण्यात आल्या. बडनेरा रेल्वे स्थानकाहून सद्यस्थितीत ६५ रेल्वे गाड्या विविध मार्गाकडे धावत आहेत. रेल्वे प्रवाशांची संख्यादेखील आधीच्या प्रमाणात अधिकपटीने वाढली आहे. कोरोनाकाळात रिकाम्या धावणाऱ्या गाड्या आता बऱ्यापैकी प्रवासी क्षमतेने धावत आहेत. जिल्ह्यातून मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अमरावती -मुंबई गाडीच्या प्रतीक्षेत प्रवासी वर्ग लागला आहे. बंद असणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वे गाड्या लवकरच सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळत आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वेने प्रवास करण्याकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. विदर्भातील लोक मोठ्या संख्येत मुंबई-पुण्याकडे कामकाजासाठी जातात. सुरक्षित व परवडणारा हा प्रवास असल्याने बहुतांश लोक रेल्वेला प्राधान्य देतात. त्यामुळेच अमरावती-मुंबई एक्स्प्रेस सुरू होण्याची प्रतीक्षा जिल्हावासीयांना लागलेली आहे.

------------------

बॉक्स

पॅसेंजर गाड्या केव्हा येणार पटरीवर?

जवळपासच्या ५० किलोमीटर अंतरावरील रेल्वे स्थानकाशी जुळून असणाऱ्या गावखेड्यांवरील प्रवाशांसाठी त्यांच्या कार्यालयीन, शेती संबंधातील, इतर दैनंदिन कामकाजासाठी शहरात येण्यासाठी पॅसेंजर रेल्वे गाड्या सोयीच्या व परवडणाऱ्या आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करा, अशी मागणी सर्वस्तरातून पुढे येत आहे. या मागणीचा रेल्वे प्रशासनाने प्राधान्याने विचार करावा. लोकप्रतिनिधींकडून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनादेखील सांगण्यात आले. मात्र, गाड्या सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे घोडे कुठे अडले, हेच समजू शकलेले नाही. इतर गाड्यांप्रमाणेच पॅसेंजर गाड्या सुरू केल्या पाहिजेत. कोरोना संसर्गाचे नियम पाळून आम्ही प्रवास करू, अशा प्रतिक्रिया आहेत.

------------------

* प्रवासी काय म्हणतात? *

प्रतिक्रिया-

कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. बंद असलेल्या रेल्वेगाड्या पूर्ववत केल्या आहेत. प्रवाशांची संख्या वाढती आहे. मात्र, काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्या अद्यापही बंद आहेत. त्यादेखील सुरू केल्यास प्रवाशांसाठी अधिक सोयीचे ठरेल.

- अमित कदम,

प्रवासी

--------------------

प्रतिक्रिया-

दीड वर्षापासून बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाने सुरू केल्या पाहिजे. या गाड्यांचा मोठा प्रवासीवर्ग आहे. गोरगरीब, सर्वसामान्यांसाठी त्याचे भाडेदेखील परवडण्याजोगे आहे. पॅसेंजर गाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.

- आनंद नाईक,

प्रवासी

--------–------------

* या गाड्या कधी सुरू होणार *

1) अमरावती - मुंबई एक्स्प्रेस

2) अमरावती- पुणे सुपरफास्ट

3) अमरावती- जबलपूर

4) अमरावती -सुरत

5) सर्वच पॅसेंजर रेल्वे गाड्या

--------------------

* सध्या सुरू असलेल्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्या*

1) महाराष्ट्र एक्स्प्रेस

2) विदर्भ एक्स्प्रेस

3) गीतांजली एक्स्प्रेस

4) हावडा मुंबई मेल

5) नवजीवन एक्स्प्रेस

6) कुर्ला -हटिया

7) अमरावती- तिरुपती एक्सप्रेस

8) हावडा -अहमदाबाद

-----------------------