शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

अमरावती -मुंबई एक्स्प्रेसच्या प्रतीक्षेत प्रवासी; रेल्वेचे ट्रॅफिक वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:10 IST

बडनेरा : कोरोना संसर्ग ओसरताच प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये वाढ करण्यात आली. जिल्ह्यातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. अमरावती ...

बडनेरा : कोरोना संसर्ग ओसरताच प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये वाढ करण्यात आली. जिल्ह्यातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. अमरावती मुंबई एक्स्प्रेसची डिमांड आहे. प्रवासीवर्ग तिच्या प्रतीक्षेत आहे. यासह इतरही महत्त्वाच्या रेल्वे गाड्या आता सुरू होण्याची प्रतीक्षा प्रवाशांना लागलेली आहे.

कोरोना काळात अमरावती जिल्ह्यातून जाणाऱ्या बऱ्याच महत्त्वाच्या रेल्वे गाड्या बंद केल्या होत्या. दुसरी लाट कमी होताच हळूहळू बंद केलेल्या रेल्वे गाड्या पुन्हा सुरू करण्यात आल्या. बडनेरा रेल्वे स्थानकाहून सद्यस्थितीत ६५ रेल्वे गाड्या विविध मार्गाकडे धावत आहेत. रेल्वे प्रवाशांची संख्यादेखील आधीच्या प्रमाणात अधिकपटीने वाढली आहे. कोरोनाकाळात रिकाम्या धावणाऱ्या गाड्या आता बऱ्यापैकी प्रवासी क्षमतेने धावत आहेत. जिल्ह्यातून मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अमरावती -मुंबई गाडीच्या प्रतीक्षेत प्रवासी वर्ग लागला आहे. बंद असणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वे गाड्या लवकरच सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळत आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वेने प्रवास करण्याकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. विदर्भातील लोक मोठ्या संख्येत मुंबई-पुण्याकडे कामकाजासाठी जातात. सुरक्षित व परवडणारा हा प्रवास असल्याने बहुतांश लोक रेल्वेला प्राधान्य देतात. त्यामुळेच अमरावती-मुंबई एक्स्प्रेस सुरू होण्याची प्रतीक्षा जिल्हावासीयांना लागलेली आहे.

------------------

बॉक्स

पॅसेंजर गाड्या केव्हा येणार पटरीवर?

जवळपासच्या ५० किलोमीटर अंतरावरील रेल्वे स्थानकाशी जुळून असणाऱ्या गावखेड्यांवरील प्रवाशांसाठी त्यांच्या कार्यालयीन, शेती संबंधातील, इतर दैनंदिन कामकाजासाठी शहरात येण्यासाठी पॅसेंजर रेल्वे गाड्या सोयीच्या व परवडणाऱ्या आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करा, अशी मागणी सर्वस्तरातून पुढे येत आहे. या मागणीचा रेल्वे प्रशासनाने प्राधान्याने विचार करावा. लोकप्रतिनिधींकडून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनादेखील सांगण्यात आले. मात्र, गाड्या सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे घोडे कुठे अडले, हेच समजू शकलेले नाही. इतर गाड्यांप्रमाणेच पॅसेंजर गाड्या सुरू केल्या पाहिजेत. कोरोना संसर्गाचे नियम पाळून आम्ही प्रवास करू, अशा प्रतिक्रिया आहेत.

------------------

* प्रवासी काय म्हणतात? *

प्रतिक्रिया-

कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. बंद असलेल्या रेल्वेगाड्या पूर्ववत केल्या आहेत. प्रवाशांची संख्या वाढती आहे. मात्र, काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्या अद्यापही बंद आहेत. त्यादेखील सुरू केल्यास प्रवाशांसाठी अधिक सोयीचे ठरेल.

- अमित कदम,

प्रवासी

--------------------

प्रतिक्रिया-

दीड वर्षापासून बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाने सुरू केल्या पाहिजे. या गाड्यांचा मोठा प्रवासीवर्ग आहे. गोरगरीब, सर्वसामान्यांसाठी त्याचे भाडेदेखील परवडण्याजोगे आहे. पॅसेंजर गाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.

- आनंद नाईक,

प्रवासी

--------–------------

* या गाड्या कधी सुरू होणार *

1) अमरावती - मुंबई एक्स्प्रेस

2) अमरावती- पुणे सुपरफास्ट

3) अमरावती- जबलपूर

4) अमरावती -सुरत

5) सर्वच पॅसेंजर रेल्वे गाड्या

--------------------

* सध्या सुरू असलेल्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्या*

1) महाराष्ट्र एक्स्प्रेस

2) विदर्भ एक्स्प्रेस

3) गीतांजली एक्स्प्रेस

4) हावडा मुंबई मेल

5) नवजीवन एक्स्प्रेस

6) कुर्ला -हटिया

7) अमरावती- तिरुपती एक्सप्रेस

8) हावडा -अहमदाबाद

-----------------------