शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

परतवाडा बसस्थानकातून पळविले जातात प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 13:01 IST

Amravati News खासगी ट्रॅव्हल्सच्या आपसी स्पर्धेतून पाच दिवसांपूर्वी झालेला राडा पाहता परतवाडा बसस्थानक परिसरात प्रवासी पळविण्याचा खेळ बंद झाला असेल, असे सामान्यांना वाटत असेल, तर ते सर्वथा चूक आहे.

ठळक मुद्देएसटी प्रशासनाला कुणी जुमानेनापोलिसांचा धाक संपला

नरेंद्र जावरे

 लोकमत न्यूज नेटवर्क  अमरावती : खासगी ट्रॅव्हल्सच्या आपसी स्पर्धेतून पाच दिवसांपूर्वी झालेला राडा पाहता परतवाडा बसस्थानक परिसरात प्रवासी पळविण्याचा खेळ बंद झाला असेल, असे सामान्यांना वाटत असेल, तर ते सर्वथा चूक आहे. तो जीवघेणा खेळ राजरोसपणे सुरूच आहे. बसस्थानकाच्या दोनशे मीटर अंतरापुढे खासगी वाहने लावावीत, हा नियम पायदळी तुडवला जात असून, त्या गळेकापू स्पर्धेतून मोठी अप्रिय घटना घडण्याची भीती वर्तविली जात आहे.

             पूर्वीच तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला कोरोना काळात प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. सततच्या लॉकडाऊनमुळे एसटीचे अर्थचक्र थांबले. त्यामुळे या बंद काळात चालक - वाहकांच्या वेतनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. दुसरीकडे आजही बस गाड्यांमध्ये डिझेल टाकण्याची ऐपत महामंडळाची नाही. या सर्व संकटांचा सामना करीत असताना खासगी ट्रॅव्हल्स संचालकांनी आपली वाहने थेट बसस्थानक परिसरात लावून प्रवासी पळविण्याचा घाट घातला आहे. याच स्पर्धेतून एका ट्रॅव्हल्सवर प्रचंड दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. ट्रॅव्हल्स संचालकांची ती कृती प्रवाशांमध्ये दहशत निर्माण करणारी ठरली आहे. दुसरीकडे सर्व प्रकारचे नियम धाब्यावर बसवून सुरू असलेली अरेरावी कुणाच्या आशीर्वादाने, असा प्रश्न जुळ्या शहरातील नागरिकांना पडला आहे.

शेकडो तक्रारी, केराची टोपली

परतवाडा शहरातून अमरावती, नागपूर, अकोला, पुणे, मध्यप्रदेशच्या खंडवा, इंदूर, बैतूल अशा दूरपर्यंत खासगी ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणात धावतात त्यासाठी असलेले सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले आहे. परतवाडा बसस्थानकापुढे या खासगी ट्रॅव्हल्स लावून प्रवासी पळविले जातात. यासंदर्भात परतवाडा आगारातून पोलीस ठाणे, आरटीओ व प्रशासनाकडे शेकडो तक्रारी करण्यात आल्या. मात्र, कुठल्याच प्रकारे कारवाई केली जात नसल्याचे वास्तव चित्र आहे.

तोडफोडीनंतरही दादागिरी सुरूच

प्रवासी नेण्यासाठी आपला क्रमांक आहे, यावरूनच हा वाद शिगेला पोहचला होता. मोठ्या प्रमाणात दगडफेक करीत ट्रॅव्हल संचालकांनी दहशत पसरली होती. त्यामुळे पोलीस प्रशासन जागृत झाले आणि वाहन २०० मीटर दूर लावल्या गेली. परंतु, दुसऱ्याच दिवसापासून पुन्हा परिस्थिती “जैसे थे‘ असल्याचे चित्र शुक्रवारी दुपारी पहायला मिळाले. त्यामुळे आरटीओ व पोलिसांची हप्तेखोरी की धाक संपला? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

टप्पा वाहतूक कोणाच्या आदेशाने?

परतवाडा अमरावती या मार्गावर सर्वाधिक प्रमाणात खासगी ट्रॅव्हल दिवसभर धावत आहेत. ही टप्पा वाहतुकीची परवानगी आरटीओच्या कुठल्या अधिकाऱ्याने ट्रॅव्हल संचालकांना दिली, हे मात्र अनुत्तरित आहे. याच कारणातून परतवाड्यात मोठा राडा होण्याची भीती वर्तवली जात असून त्यावर कारवाईची मागणी होत आहे.

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक