शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
6
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
7
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
8
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
9
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
10
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
11
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
12
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
13
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
14
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
15
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
16
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
17
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
18
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
19
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
20
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
Daily Top 2Weekly Top 5

‘पाटबंधारे’त ओल्या पार्ट्या !

By admin | Updated: November 6, 2016 00:06 IST

उर्ध्व वर्धा पाटबंधारे व मालमत्ता उपविभागाच्या इमारतीच्या मागे दारूच्या रिकाम्या बाटल्या कचऱ्यात आढळल्याने एकच खळबळ उडाली.

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : परिसरात आढळल्या दारुच्या बाटल्यासंदीप मानकर अमरावतीउर्ध्व वर्धा पाटबंधारे व मालमत्ता उपविभागाच्या इमारतीच्या मागे दारूच्या रिकाम्या बाटल्या कचऱ्यात आढळल्याने एकच खळबळ उडाली.या परिसरात मद्यपी यथेच्छ दारू ढोसून ओल्या पार्ट्या झोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असून या परिसरात दारूच्या बाटल्या येतात कशा, हा प्रश्न उपस्थित होत आहे. या परिसरात फेरफटका मारला असता, हा गंभीर प्रकार निदर्शनास आला. येथे जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अभियंत्याचेसुध्दा कार्यालय आहे. कार्यालयाच्या अगदी बाजूलाच पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची वसाहतदेखील आहे. रोज ओल्या पार्ट्या करून विविध ब्रॅन्डच्या दारूच्या बॉटल्स खुलेआम या परिसरात बेवारसरीत्या आढळून आल्या. मात्र मद्यपी कोण? व दारुच्या पार्ट्या येथील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी तर होत नाही ना? की, बाहेरचे काही युवक या ठिकाणी येऊन मद्यप्राशन करतात याचा शोध घेणे गरजेचे झाले आहे. निष्क्रिय सुरक्षा गार्डअमरावती : हा प्रश्न अंबानगरीतील जनतेला पडला आहे. या ठिकाणी सायंकाळनंतर परिसर सुनसान होतो. त्यामुळे याच संधीचा फायदा घेऊन अंधारात मद्यप्राशन केले जात असेल तर कर्तव्यावर असलेले सुरक्षा गार्ड करतात तरी काय, असा प्रश्नही पुढे आला आहे. हा प्रकार गंभीर असून वरिष्ठ अभियंत्याच्या इमारतीच्या मागच्या बाजूला कचऱ्यात ह्या बॉटल्स, काही डिसपोजल ग्लास, मिनरल वॉटरच्या खाली बाटल्या, सिगारेटचे रिकामे पाकीट्स या ठिकाणी आढळलेत. त्यामुळे परिसरात अनेक दिवसांपासून खुलेआम ओल्या पार्ट्या झोडल्या जात असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून हा प्रकर बंद करण्यात यावा, ही मागणी होत आहे.पाटबंधारे विभागाच्या वसाहतीकडे दुर्लक्षयेथे पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. मध्यरात्रीपर्यंत या वस्तीकडे जाणारे प्रवेशव्दार उघडे राहते. त्यामुळे मद्यपींना येथे मद्यपान करणे सोईची ठरते. याच ठिकाणी जलसंपदा विभागाची नवीन इमारतसुद्धा आहे. बाजूलाच जलसंपदा विभागच्या वरिष्ठ अभियंत्यांचे निवास्थाने आहेत. तसेच येथे परंतु याकडे गस्तीवर नियमित चौकीदाराची नेमणूक करण्यात आलेली नाही. येथे ३५० कर्मचाऱ्यांची निवास्थाने असल्याची महिती आहे. त्यामुळे येथे नेहमीत सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी होत आहे.या प्रकरणाची माहिती घेतो. असा प्रकार खरेच होत असेल तर चौकशी करून कारवाई करण्यात येईल. बाहेरच्या लोकांचा या परिसरात वावर असेल तर त्यांचाही बंदोबस्त करण्यात येईल. - रवींद्र लांडेकर, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग अमरावती