शालेय विद्यार्थ्यांचे भावनिक आवाहन, कोरोना संक्रमितांच्या संख्येत कैकपटींनी वाढ (असायमेंट)
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढू लागल्याने लॉकडाऊन आहे. त्यामुळे शाळा बंद असून, शाळकरी मुले घरीच आहेत. कुटुंबातील सदस्य मास्क वापरासह कोरोनासंबंधी सूचनांचे पालन करतात का, याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता, बहुतांश पालक मास्कसह सूचनांकडे दुर्लक्ष करतात, त्यांना मास्क वापराबाबत आठवण द्यावी लागते, अशाच प्रतिक्रिया आल्या आहेत.
जिल्ह्यात दरदिवशी ८०० ते ९०० कोरोना संक्रमित निष्पन्न होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात बाधितांची संख्या ३२ हजार ८३५ झाली आहे. त्यातील ४८७ रुग्णांचा बळी गेला. रुग्णालयातील उपचारानंतर ............. जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना लसीकरण सुरू असले, तरी सर्वसामान्यांना लस मिळण्यास विलंब होत आहे. लसीचे दोन व एक बूस्टर डोज पूर्ण झाल्यानंतर अँटिबॉडीज शरीरात तयार होणार आहेत. त्यामुळे लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मास्क वापरणे, शारीरिक अंतर ठेवणे, सॅनिटायझर वापरणे, हात धुणे या उपाययोजना कोरोनापासून दूर ठेवण्यास मदत करतात. हीच बाब मध्यंतरी शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी सांगितली होती. घरातील सदस्यही याबाबत चर्चा करीत असल्याने आम्हाला या उपाययोजनांची माहिती झाली. त्यामुळे बाहेर जाताना आम्ही मास्क घालतो. घरी आल्यानंतर हात धुतो. कोणी याकडे दुर्लक्ष करीत असेल, तर त्यांनाही सूचनांची आठवण करून दिली असल्याचे मुलांनी सांगितले.
------------------
स्वत:ची काळजी घ्या आणि आई-बाबांचीही
- प्रथम तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. आई-वडील, भाऊ-बहीण, शेजाऱ्यांचीही काळजी घ्या. वडीलधाऱ्या मंडळींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसलीच, तर त्यांना तातडीने दवाखान्यात घेऊन जा. त्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्ययंत्रणा सज्ज आहे.
- आई-वडिलांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. बाहेर जाताना ते मास्क लावतात का? बाहेररून आल्यावर हातपाय स्वच्छ धुतले का, सॅनिटायझर वापरले का, हेही पाहा, असा सल्ला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या पत्रातून शालेय विद्यार्थ्यांना दिला आहे.
-------------------
कोरोना संक्रमितांचे प्रमाण गत १५ दिवसांपासून वाढले आहे. वाढत्या रुग्णसंख्येला अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना यश येण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा. कामानिमित्त बाहेर गेल्यावर सुरक्षित अंतराचे पालन करावे. सॅनिटायझरचा नियमित वापर करावा. घरी गेल्यानंतरही हात-पाय स्वच्छ धुवा. शक्य झाल्यास आंघोळ करूनच घरात प्रवेश करावा. या सूचनांचे पालन केले, तर कोरोनाला अटकाव करण्यास मोठी मदत होणार आहे.
- डॉ.दिलीप रणमले,जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती
-----------------
(मुलाचे फोटो घेणे अनिवार्य)
माझे वडील कर्मचारी असल्यामुळे आम्ही सक्तीने कोरोनाचे सर्व नियम पाळतो. आई बाजारपेठेत जाताना मास्क विसरली, तर तिला आठवण करून देतो. कोणी सूचनांकडे दुर्लक्ष करीत असेल, तर त्यांना सूचनांची आठवण करून दिली जाते.
- कार्तिक कोहळे, अमरावती.
-----------------
आई-वडील कामानिमित्त बाहेर जाताना मास्क विसरले, तर त्यांना आठवण करून देते. बाहेरून आल्यानंतर हात-पाय स्वच्छ करूनच ते घरात येतात. घरी येणाऱ्यांना कोरोनाच्या उपाययोजनांची आठवण करून दिली जाते.
- अंकिता रोकडे, बडनेरा
---------
कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आहेत. रुग्णसंख्याही वाढत आहे. त्यामुळे घरातील सदस्यांनी बाहेर जाताना मास्क वापरावा, असा माझा अट्टाहास असतो. सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांनाही आठवण करून दिली जाते.
- पियू मराठे, अमरावती.
--------------
वडील एमएसईबीत कंत्राटदार असल्याने त्यांचा अनेकांशी संपर्क येतो. बाहेर जाताना त्यांना मास्क आवर्जून घालायला लावतो. बाहेरून आल्यानंतर सॅनिटायझरने हात धुण्यास सांगितले जाते.
- साहिल राऊत, बडनेरा
-------------
मध्यंतरी कोरोना संसर्ग कमी झाल्याने मास्कसह इतर बाबींकडे दुर्लक्ष झाले होते, परंतु नंतर कोरोनाचा फैलाव वाढल्यामुळे आता लॉकडाऊन लागू केले. मास्कसह इतर सूचनांचे पालन करतात. कुटुंबातील सदस्य घराबाहेर जात असतील, तेव्हा आम्ही त्यांना मास्कही आठवण करून देताे.
- किरण पाटील, मोथा, चिखलदरा
--------------------
कोरोना संक्रमितांची संख्या वाढत असल्याने शाळा बंद झाल्या आहेत. आम्ही मास्क घालूनच बाहेर जातो. कुटुंबातील सर्वांना सूचनांचे पालन करण्याबाबत सांगितले जाते.
- शिवानी कासदेकर, जैतादेही, धारणी